शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

कोरोनाची धास्ती पण पालक म्हणतात, ऑफलाईन परीक्षाच योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:41 IST

बीड : राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना ...

बीड : राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना ऑफलाईन परीक्षेच्या निर्णयामुळे काही पालक धास्तावले असलेतरी ऑनलाईन परीक्षा गुणवत्तेला मारक आहेत. कोरोनाबाबत दक्षता घेत होम सेंटरवर परीक्षा घेतल्यास अडचणी येणार नाहीत, असे त्यांचे मत आहे.

कोरोनामुळे काही महिने ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. यातही अनेक अडचणी आल्या. त्यानंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. उपस्थितीचे प्रमाणही वाढत गेले. कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे शिक्षकांपुढे तर पूर्ण अभ्यास करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांपुढे होते. यातच कोरोना संसर्ग कमी होत चालल्याने सुरळीतपणा येत असताना राज्यात काही ठिकाणी पुन्हा काेरोनाचा उद्रेक झाला. बीड जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ५५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत. त्यापैकी १७ हजार ६२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

रुग्णसंख्या वाढू लागल्याने शासन व प्रशासनाने कठोर निर्णय घेण्यासाठी पावले उचलली. तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु बैठक व्यवस्था, पसरणारा कोरोना संसर्ग, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे. मात्र, शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे बहुतांश पालकांनी स्वागत केले आहे. तर काही पालक ऑनलाईनऐवजी ऑफलाईन परीक्षेचा निर्णय घेतल्याने आमच्या पाल्याचा जीव धोक्यात घालायचा का? असा सवाल करीत आहेत.

--------

दहावी-बारावीतील पालकांच्या प्रतिक्रिया

ऑनलाईनमुळे अभ्यास करणाऱ्या मुलांचे नुकसान झाले असते. सगळीकडेच ऑनलाईन परीक्षा शक्य नाही. कोरोनाची भीती आहे. मात्र, दक्षता घेऊन ऑफलाईन परीक्षाच योग्य आहेत. - दगडू खांडे.

----------

पुरेशा नेटवर्कचा अभाव आजही आहे. कोरोनाची भीती आहे. परंतु, हॉलमध्ये विद्यार्थी संख्या दहाच्या प्रमाणात ठेवून परीक्षा घ्यायला हव्यात. कॉपी पुरविणाऱ्यांपासून संसर्ग टाळण्यासाठी उपाय करावेत. - राजेंद्र आघाव.

------

परीक्षा ऑफलाईन होणे गरजेचे होते. ॲन्ड्राइड फोन, नेटवर्क, तांत्रिक अडचणी आहेतच. ऑफलाईन परीक्षा ज्या-त्या शाळेत घेतल्या तर तेच विद्यार्थी राहतील, अडचणी येणार नाहीत. दुसऱ्या भागातील संपर्क टाळता येईल. - गणेश आजबे.

----------

ऑफलाईन परीक्षेत मुलांचा आत्मविश्वास टिकून राहतो. ऑनलाईनमध्ये पेज सेंड न होणे, हँग होणे यामुळे मुलांमध्ये नैराश्य आले असते. दडपण राहिले असते. ऑफलाईन परीक्षाच योग्य आहेत. - श्रीराम तागड.

------

मुलांना ऑनलाईन परीक्षेचा अनुभव नाही. ऑफलाईन परीक्षाच याेग्य आहेत. मात्र, सोशल डिस्टन्स तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन सर्वांनीच करणे गरजचे आहे. - सविता राजेंद्र काळे.

-----

कोरानाचे संकट मोठे आहे. जे मुलांच्या हिताचे आहे, ते महत्त्वाचे आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी सेंटर कोणतेही आले तर अडचण नाही. सगळेच ऑनलाईन होऊ शकत नाही. परीक्षेनंतर मुलांना कोरोना लस देण्याचा विचार व्हावा. - राजेश सुपेकर.

--------

कोरोनाचा धोका वाटतो. भविष्याचा विचार करता ऑफलाईन परीक्षा योग्यच आहे. ऑनलाईन शक्य नाही. मुलांना बोर्डाच्या परीक्षेचा सराव आवश्यक आहे. बारावीला भीती राहणार नाही. - महेश सातपुते.

----------

मोबाईलवर, संगणकावर परीक्षा कशी घेणार? नियमित होतात तशा परीक्षा व्हाव्यात. वर्ष वाया चालले. कोरोनाबाबत सर्वांनीच काळजी घेतली तर काहीच हरकत नाही. ऑफलाईन परीक्षाच योग्य वाटते. - रमेश मोरे.

------

विद्यार्थी संख्या

दहावी ४५०००

बारावी ४१०००

------

होम सेंटरच ठरणार पर्याय

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर बैठक व्यवस्थेची अडचण राहणार आहे. एका परीक्षा कक्षात २५ विद्यार्थी असतात. मात्र, निम्म्या संख्येने बैठक व्यवस्था करावयाची असल्यास परीक्षा केंद्रे अपुरी पडतील. तसेच आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी ज्या शाळेत आहे, तेथेच परीक्षा घेण्याचा (होम सेंटर) हा पर्याय पुढे येऊ शकतो. असा निर्णय झाल्यास पालकांमध्ये असलेली कोरोनाची धास्तीदेखील कमी होऊ शकते.

-----