शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

कोरोनाची धास्ती पण पालक म्हणतात, ऑफलाईन परीक्षाच योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:41 IST

बीड : राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना ...

बीड : राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना ऑफलाईन परीक्षेच्या निर्णयामुळे काही पालक धास्तावले असलेतरी ऑनलाईन परीक्षा गुणवत्तेला मारक आहेत. कोरोनाबाबत दक्षता घेत होम सेंटरवर परीक्षा घेतल्यास अडचणी येणार नाहीत, असे त्यांचे मत आहे.

कोरोनामुळे काही महिने ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. यातही अनेक अडचणी आल्या. त्यानंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. उपस्थितीचे प्रमाणही वाढत गेले. कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे शिक्षकांपुढे तर पूर्ण अभ्यास करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांपुढे होते. यातच कोरोना संसर्ग कमी होत चालल्याने सुरळीतपणा येत असताना राज्यात काही ठिकाणी पुन्हा काेरोनाचा उद्रेक झाला. बीड जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ५५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत. त्यापैकी १७ हजार ६२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

रुग्णसंख्या वाढू लागल्याने शासन व प्रशासनाने कठोर निर्णय घेण्यासाठी पावले उचलली. तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु बैठक व्यवस्था, पसरणारा कोरोना संसर्ग, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे. मात्र, शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे बहुतांश पालकांनी स्वागत केले आहे. तर काही पालक ऑनलाईनऐवजी ऑफलाईन परीक्षेचा निर्णय घेतल्याने आमच्या पाल्याचा जीव धोक्यात घालायचा का? असा सवाल करीत आहेत.

--------

दहावी-बारावीतील पालकांच्या प्रतिक्रिया

ऑनलाईनमुळे अभ्यास करणाऱ्या मुलांचे नुकसान झाले असते. सगळीकडेच ऑनलाईन परीक्षा शक्य नाही. कोरोनाची भीती आहे. मात्र, दक्षता घेऊन ऑफलाईन परीक्षाच योग्य आहेत. - दगडू खांडे.

----------

पुरेशा नेटवर्कचा अभाव आजही आहे. कोरोनाची भीती आहे. परंतु, हॉलमध्ये विद्यार्थी संख्या दहाच्या प्रमाणात ठेवून परीक्षा घ्यायला हव्यात. कॉपी पुरविणाऱ्यांपासून संसर्ग टाळण्यासाठी उपाय करावेत. - राजेंद्र आघाव.

------

परीक्षा ऑफलाईन होणे गरजेचे होते. ॲन्ड्राइड फोन, नेटवर्क, तांत्रिक अडचणी आहेतच. ऑफलाईन परीक्षा ज्या-त्या शाळेत घेतल्या तर तेच विद्यार्थी राहतील, अडचणी येणार नाहीत. दुसऱ्या भागातील संपर्क टाळता येईल. - गणेश आजबे.

----------

ऑफलाईन परीक्षेत मुलांचा आत्मविश्वास टिकून राहतो. ऑनलाईनमध्ये पेज सेंड न होणे, हँग होणे यामुळे मुलांमध्ये नैराश्य आले असते. दडपण राहिले असते. ऑफलाईन परीक्षाच योग्य आहेत. - श्रीराम तागड.

------

मुलांना ऑनलाईन परीक्षेचा अनुभव नाही. ऑफलाईन परीक्षाच याेग्य आहेत. मात्र, सोशल डिस्टन्स तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन सर्वांनीच करणे गरजचे आहे. - सविता राजेंद्र काळे.

-----

कोरानाचे संकट मोठे आहे. जे मुलांच्या हिताचे आहे, ते महत्त्वाचे आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी सेंटर कोणतेही आले तर अडचण नाही. सगळेच ऑनलाईन होऊ शकत नाही. परीक्षेनंतर मुलांना कोरोना लस देण्याचा विचार व्हावा. - राजेश सुपेकर.

--------

कोरोनाचा धोका वाटतो. भविष्याचा विचार करता ऑफलाईन परीक्षा योग्यच आहे. ऑनलाईन शक्य नाही. मुलांना बोर्डाच्या परीक्षेचा सराव आवश्यक आहे. बारावीला भीती राहणार नाही. - महेश सातपुते.

----------

मोबाईलवर, संगणकावर परीक्षा कशी घेणार? नियमित होतात तशा परीक्षा व्हाव्यात. वर्ष वाया चालले. कोरोनाबाबत सर्वांनीच काळजी घेतली तर काहीच हरकत नाही. ऑफलाईन परीक्षाच योग्य वाटते. - रमेश मोरे.

------

विद्यार्थी संख्या

दहावी ४५०००

बारावी ४१०००

------

होम सेंटरच ठरणार पर्याय

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर बैठक व्यवस्थेची अडचण राहणार आहे. एका परीक्षा कक्षात २५ विद्यार्थी असतात. मात्र, निम्म्या संख्येने बैठक व्यवस्था करावयाची असल्यास परीक्षा केंद्रे अपुरी पडतील. तसेच आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी ज्या शाळेत आहे, तेथेच परीक्षा घेण्याचा (होम सेंटर) हा पर्याय पुढे येऊ शकतो. असा निर्णय झाल्यास पालकांमध्ये असलेली कोरोनाची धास्तीदेखील कमी होऊ शकते.

-----