शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची धास्ती पण पालक म्हणतात, ऑफलाईन परीक्षाच योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:41 IST

बीड : राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना ...

बीड : राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना ऑफलाईन परीक्षेच्या निर्णयामुळे काही पालक धास्तावले असलेतरी ऑनलाईन परीक्षा गुणवत्तेला मारक आहेत. कोरोनाबाबत दक्षता घेत होम सेंटरवर परीक्षा घेतल्यास अडचणी येणार नाहीत, असे त्यांचे मत आहे.

कोरोनामुळे काही महिने ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. यातही अनेक अडचणी आल्या. त्यानंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. उपस्थितीचे प्रमाणही वाढत गेले. कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे शिक्षकांपुढे तर पूर्ण अभ्यास करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांपुढे होते. यातच कोरोना संसर्ग कमी होत चालल्याने सुरळीतपणा येत असताना राज्यात काही ठिकाणी पुन्हा काेरोनाचा उद्रेक झाला. बीड जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ५५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत. त्यापैकी १७ हजार ६२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

रुग्णसंख्या वाढू लागल्याने शासन व प्रशासनाने कठोर निर्णय घेण्यासाठी पावले उचलली. तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु बैठक व्यवस्था, पसरणारा कोरोना संसर्ग, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे. मात्र, शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे बहुतांश पालकांनी स्वागत केले आहे. तर काही पालक ऑनलाईनऐवजी ऑफलाईन परीक्षेचा निर्णय घेतल्याने आमच्या पाल्याचा जीव धोक्यात घालायचा का? असा सवाल करीत आहेत.

--------

दहावी-बारावीतील पालकांच्या प्रतिक्रिया

ऑनलाईनमुळे अभ्यास करणाऱ्या मुलांचे नुकसान झाले असते. सगळीकडेच ऑनलाईन परीक्षा शक्य नाही. कोरोनाची भीती आहे. मात्र, दक्षता घेऊन ऑफलाईन परीक्षाच योग्य आहेत. - दगडू खांडे.

----------

पुरेशा नेटवर्कचा अभाव आजही आहे. कोरोनाची भीती आहे. परंतु, हॉलमध्ये विद्यार्थी संख्या दहाच्या प्रमाणात ठेवून परीक्षा घ्यायला हव्यात. कॉपी पुरविणाऱ्यांपासून संसर्ग टाळण्यासाठी उपाय करावेत. - राजेंद्र आघाव.

------

परीक्षा ऑफलाईन होणे गरजेचे होते. ॲन्ड्राइड फोन, नेटवर्क, तांत्रिक अडचणी आहेतच. ऑफलाईन परीक्षा ज्या-त्या शाळेत घेतल्या तर तेच विद्यार्थी राहतील, अडचणी येणार नाहीत. दुसऱ्या भागातील संपर्क टाळता येईल. - गणेश आजबे.

----------

ऑफलाईन परीक्षेत मुलांचा आत्मविश्वास टिकून राहतो. ऑनलाईनमध्ये पेज सेंड न होणे, हँग होणे यामुळे मुलांमध्ये नैराश्य आले असते. दडपण राहिले असते. ऑफलाईन परीक्षाच योग्य आहेत. - श्रीराम तागड.

------

मुलांना ऑनलाईन परीक्षेचा अनुभव नाही. ऑफलाईन परीक्षाच याेग्य आहेत. मात्र, सोशल डिस्टन्स तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन सर्वांनीच करणे गरजचे आहे. - सविता राजेंद्र काळे.

-----

कोरानाचे संकट मोठे आहे. जे मुलांच्या हिताचे आहे, ते महत्त्वाचे आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी सेंटर कोणतेही आले तर अडचण नाही. सगळेच ऑनलाईन होऊ शकत नाही. परीक्षेनंतर मुलांना कोरोना लस देण्याचा विचार व्हावा. - राजेश सुपेकर.

--------

कोरोनाचा धोका वाटतो. भविष्याचा विचार करता ऑफलाईन परीक्षा योग्यच आहे. ऑनलाईन शक्य नाही. मुलांना बोर्डाच्या परीक्षेचा सराव आवश्यक आहे. बारावीला भीती राहणार नाही. - महेश सातपुते.

----------

मोबाईलवर, संगणकावर परीक्षा कशी घेणार? नियमित होतात तशा परीक्षा व्हाव्यात. वर्ष वाया चालले. कोरोनाबाबत सर्वांनीच काळजी घेतली तर काहीच हरकत नाही. ऑफलाईन परीक्षाच योग्य वाटते. - रमेश मोरे.

------

विद्यार्थी संख्या

दहावी ४५०००

बारावी ४१०००

------

होम सेंटरच ठरणार पर्याय

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर बैठक व्यवस्थेची अडचण राहणार आहे. एका परीक्षा कक्षात २५ विद्यार्थी असतात. मात्र, निम्म्या संख्येने बैठक व्यवस्था करावयाची असल्यास परीक्षा केंद्रे अपुरी पडतील. तसेच आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी ज्या शाळेत आहे, तेथेच परीक्षा घेण्याचा (होम सेंटर) हा पर्याय पुढे येऊ शकतो. असा निर्णय झाल्यास पालकांमध्ये असलेली कोरोनाची धास्तीदेखील कमी होऊ शकते.

-----