शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

कोरोनाची धास्ती पण पालक म्हणतात, ऑफलाईन परीक्षाच योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:41 IST

बीड : राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना ...

बीड : राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना ऑफलाईन परीक्षेच्या निर्णयामुळे काही पालक धास्तावले असलेतरी ऑनलाईन परीक्षा गुणवत्तेला मारक आहेत. कोरोनाबाबत दक्षता घेत होम सेंटरवर परीक्षा घेतल्यास अडचणी येणार नाहीत, असे त्यांचे मत आहे.

कोरोनामुळे काही महिने ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. यातही अनेक अडचणी आल्या. त्यानंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. उपस्थितीचे प्रमाणही वाढत गेले. कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे शिक्षकांपुढे तर पूर्ण अभ्यास करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांपुढे होते. यातच कोरोना संसर्ग कमी होत चालल्याने सुरळीतपणा येत असताना राज्यात काही ठिकाणी पुन्हा काेरोनाचा उद्रेक झाला. बीड जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ५५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत. त्यापैकी १७ हजार ६२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

रुग्णसंख्या वाढू लागल्याने शासन व प्रशासनाने कठोर निर्णय घेण्यासाठी पावले उचलली. तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु बैठक व्यवस्था, पसरणारा कोरोना संसर्ग, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे. मात्र, शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे बहुतांश पालकांनी स्वागत केले आहे. तर काही पालक ऑनलाईनऐवजी ऑफलाईन परीक्षेचा निर्णय घेतल्याने आमच्या पाल्याचा जीव धोक्यात घालायचा का? असा सवाल करीत आहेत.

--------

दहावी-बारावीतील पालकांच्या प्रतिक्रिया

ऑनलाईनमुळे अभ्यास करणाऱ्या मुलांचे नुकसान झाले असते. सगळीकडेच ऑनलाईन परीक्षा शक्य नाही. कोरोनाची भीती आहे. मात्र, दक्षता घेऊन ऑफलाईन परीक्षाच योग्य आहेत. - दगडू खांडे.

----------

पुरेशा नेटवर्कचा अभाव आजही आहे. कोरोनाची भीती आहे. परंतु, हॉलमध्ये विद्यार्थी संख्या दहाच्या प्रमाणात ठेवून परीक्षा घ्यायला हव्यात. कॉपी पुरविणाऱ्यांपासून संसर्ग टाळण्यासाठी उपाय करावेत. - राजेंद्र आघाव.

------

परीक्षा ऑफलाईन होणे गरजेचे होते. ॲन्ड्राइड फोन, नेटवर्क, तांत्रिक अडचणी आहेतच. ऑफलाईन परीक्षा ज्या-त्या शाळेत घेतल्या तर तेच विद्यार्थी राहतील, अडचणी येणार नाहीत. दुसऱ्या भागातील संपर्क टाळता येईल. - गणेश आजबे.

----------

ऑफलाईन परीक्षेत मुलांचा आत्मविश्वास टिकून राहतो. ऑनलाईनमध्ये पेज सेंड न होणे, हँग होणे यामुळे मुलांमध्ये नैराश्य आले असते. दडपण राहिले असते. ऑफलाईन परीक्षाच योग्य आहेत. - श्रीराम तागड.

------

मुलांना ऑनलाईन परीक्षेचा अनुभव नाही. ऑफलाईन परीक्षाच याेग्य आहेत. मात्र, सोशल डिस्टन्स तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन सर्वांनीच करणे गरजचे आहे. - सविता राजेंद्र काळे.

-----

कोरानाचे संकट मोठे आहे. जे मुलांच्या हिताचे आहे, ते महत्त्वाचे आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी सेंटर कोणतेही आले तर अडचण नाही. सगळेच ऑनलाईन होऊ शकत नाही. परीक्षेनंतर मुलांना कोरोना लस देण्याचा विचार व्हावा. - राजेश सुपेकर.

--------

कोरोनाचा धोका वाटतो. भविष्याचा विचार करता ऑफलाईन परीक्षा योग्यच आहे. ऑनलाईन शक्य नाही. मुलांना बोर्डाच्या परीक्षेचा सराव आवश्यक आहे. बारावीला भीती राहणार नाही. - महेश सातपुते.

----------

मोबाईलवर, संगणकावर परीक्षा कशी घेणार? नियमित होतात तशा परीक्षा व्हाव्यात. वर्ष वाया चालले. कोरोनाबाबत सर्वांनीच काळजी घेतली तर काहीच हरकत नाही. ऑफलाईन परीक्षाच योग्य वाटते. - रमेश मोरे.

------

विद्यार्थी संख्या

दहावी ४५०००

बारावी ४१०००

------

होम सेंटरच ठरणार पर्याय

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर बैठक व्यवस्थेची अडचण राहणार आहे. एका परीक्षा कक्षात २५ विद्यार्थी असतात. मात्र, निम्म्या संख्येने बैठक व्यवस्था करावयाची असल्यास परीक्षा केंद्रे अपुरी पडतील. तसेच आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी ज्या शाळेत आहे, तेथेच परीक्षा घेण्याचा (होम सेंटर) हा पर्याय पुढे येऊ शकतो. असा निर्णय झाल्यास पालकांमध्ये असलेली कोरोनाची धास्तीदेखील कमी होऊ शकते.

-----