शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वाळू घाटांवरील कामगारांची होणार कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यातील माजलगाव व गेवराई तालुक्यातील सात वाळू घाटांचा लिलाव झालेला आहे. त्या ठिकाणावरून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यातील माजलगाव व गेवराई तालुक्यातील सात वाळू घाटांचा लिलाव झालेला आहे. त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा व वाहतूक केली जाते. मात्र, मोठी गर्दी होत असल्यामुळे कोरोना संसर्ग त्यांच्यापासून वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात होती. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना सर्व घाटांवरील कामगारांची कोरोना तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन, पांचाळेश्वर, सुळेगाव, नागझरी व माजलगाव तालुक्यातील आडोळा व गव्हाणथडी या वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला होता. त्या ठिकाणावरून रोज मोठ्या प्रमाणात वाळू उपसा व वाहतूक केली जाते. दरम्यान, या ठिकाणी वाळू उपसा करण्यासाठी व वाहतुकीसाठी असलेल्या कामगारांची संख्यादेखील मोठी आहे. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये या ठिकाणावरून वाळू पुरवठा केला जातो. या कामगारांच्या व वाहनचालकांच्या माध्यमातून कोरोना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाळू घाटांवर उपसा करणाऱ्या कामगारांना तसेच वाहतुकीसाठी जाणाऱ्या वाहन चालाकांना कोरोना तपासणी करणे बंधनकारक केले आहे. कोरोना तपासणी केल्यानंतर निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल तरच वाळू घाटवर प्रवेश मिळणार आहे. या प्रमाणपत्राची वैधता सात दिवस असणार आहे. कामगारांची कोरोना तपासणी करण्याची जबाबदार संबंधित वाळू घाटाच्या कंत्राटदाराची असणार आहे. त्यांनी वाळू घाटावरील सर्व कामगारांची कोरोना तपासणी तत्काळ करून घ्यावी तसेच वाळू घाटावर असलेल्या कामगाराकडे जर कोरोना तपासणी केलेले प्रमाणपत्र नसेल तर संबंधित वाळू घाटाच्या कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारादेखील जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिला आहे.

कामगारांनी नियमांचे पालन करावे

वाळू घाटावर काम करणाऱ्या कामगारांनी तसेच वाहन चालकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, कंत्राटदारांनी सॅनिटाझरची व्यवस्था घाटावर करावी. सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. तर...तहसीलदरांवर होणार कारवाई

वाळू घाटावरील उपस्थित मजूर, वाहन चालक लिलावधारक व त्यांचे नियुक्त कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर त्याचे निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेले कामगार व इतर लोकघाटावर आहेत का, याची तपासणी वेळोवेळी खात्री करून, त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठावावा. नियमांचा भंग झाल्याचे निदर्शनास आले तर संबंधित तहसीलदारांवर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

===Photopath===

290421\061429_2_bed_11_29042021_14.jpg

===Caption===

वाळ‌ू घाटावरील कामगार