शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
5
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
6
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
7
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
8
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
9
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
10
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
11
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
12
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
13
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
14
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
15
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
16
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
17
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
18
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
19
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
20
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात

संतोष देशमुख प्रकरण: तिरंगा हॉटेलवरचा ‘घास’; वाल्मीकच्या गळ्याला ‘फास’, तिथेच शिजला कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 08:25 IST

‘तुम्ही सुदर्शन व साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करा नाही तर तुम्हाला ते सोडणार नाहीत’, असा सल्ला एकाने संतोष देशमुखांना दिला होता. तर दुसरीकडे, विष्णू चाटे म्हणाला की, ‘वाल्मिक अण्णांचा निरोप आहे की, संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा.’ 

लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह अन्य एकजण केज तालुक्यातील नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला गेले. त्याच ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला. 

चाटे आणि घुले यांच्यात झालेल्या संवादाचा प्रत्येक ‘शब्द’ आता सीआयडीने घेतलेल्या एका व्यक्तीच्या जबाबात आला आहे. त्यामुळेच वाल्मिक कराड हा हत्येत आरोपी तर झालाच पण या कटाचा मास्टरमाइंड असल्याचेही उघड झाले. या प्रकरणात ५ गोपनीय साक्षीदारांचा समावेश आहे.    

६ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोग येथील भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात सुदर्शन घुले दिसत होता. ८ डिसेंबर २०२४ रोजी घुले आणि अन्य एकजण टाकळी येथे भेटले. यावेळी घुले याने विष्णू चाटे याचा फोन आला असून तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला बोलावल्याचे सांगितले. चाटे हा अगोदरच तेथे होता. चाटे याने सुदर्शन घुले याला चांगलेच झापले होते. 

देशमुखांनाही सल्ला

मारहाणीचा व्हिडीओ पाहून एका व्यक्तीने सरपंच देशमुख यांना, ‘तुम्ही सुदर्शन व साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करा नाही तर तुम्हाला ते सोडणार नाहीत’ असा सल्ला दिला. यापूर्वी मलाही कराडने धमकी दिली होती. मी विरोध केल्याने खोट्या गुन्ह्यात अडकवले, असे जबाबात त्याने सांगितले आहे.   

असा झाला होता संवाद  

‘आम्ही कमवायचे, तुम्ही वाटोळे करायचे, स्वत:ची व आमची पण इज्जत  घालवलीस. तुला प्लँट बंद करायला पाठवले होते, तो तुम्ही बंद केला नाही, उलट हात हलवत परत आलास’ असे चाटे म्हणाला. त्यावर घुले म्हणाला की, ‘आम्ही कंपनी बंद करण्यासाठी गेलो होतो. तेथे संतोष देशमुख आला व त्याने कंपनी बंद करू दिली नाही.’ यावर चाटे म्हणाला, ‘वाल्मिक अण्णांचा निरोप आहे की, कामही बंद केले नाही. खंडणीही दिली नाही. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा.’ 

‘मारेकऱ्यांना कोणी पाठवले, खंडणी कोणासाठी होती?’

माझ्या वडिलांची हत्या ही खंडणीतूनच झाली आहे. परंतु, या लोकांना खंडणी मागायला कोणी पाठवले? त्यांना कोणाचा वरदहस्त होता? असा सवाल मयत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने केला. तसेच ही खंडणी कोणासाठी जात होती? याचीही चौकशी करून त्यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणीही वैभवीने केली आहे. 

हातपाय तोडा, पण... 

माझ्या बाबांना बेदम मारहाण करण्यात आली. ते हातपाय तोडा, पण गाव, मुलांसाठी जगू द्या, अशी विनवणी करत होते. परंतु, त्यांनी कसलीही दयामाया दाखवली नाही, ते निर्दयीपणे मारहाण करीतच राहिले,  असेही वैभवी म्हणाली. 

 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराड