शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जयदत्तअण्णांना विजयी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 23:45 IST

स्व.गोपीनाथराव मुंडेंनी असंख्य लोकांना गुलाल लावण्याचे काम केले आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या अनुभवी उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांचे सभेत आवाहन : आमदारांच्या वज्रमुठीमुळेच विकास, राष्टÑवादीवर केली कडाडून टीका

बीड : मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कारभार केला नाही तर संसार केला. बीड जिल्ह्यातील आमदारांची एकमूठ वज्रमूठ होती म्हणून बीड जिल्ह्याचा विकास झाला. राष्ट्रवादी चांगल्या माणसाला संपवण्याचे काम करते हा इतिहास आहे. या इतिहासाची उजळणी करूनच नेते आणि पदाधिकारी स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. म्हणूनच राष्ट्रवादीचे लोक भाजपा-शिवसेनेत येत आहेत. स्व.गोपीनाथराव मुंडेंनी असंख्य लोकांना गुलाल लावण्याचे काम केले आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या अनुभवी उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.रायमोहा येथे बीड मतदारसंघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री पंकजा मुंडे यांची गुरुवारी जाहीर सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या.पंकजा मुंडे म्हणाल्या, आ.सुरेश धस यांना भाजपात घेतले आणि तेथून पुढे मेगा भरतीला सुरूवात झाली आता आमचा पक्ष हाऊसफुल्ल झाला आहे. गेल्या पाच वर्षात बीड जिल्ह्याचा विकास करताना मतभेद केला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, बाळासाहेब जगताप, संगिता चव्हाण, डॉ.योगेश क्षीरसागर, सर्जेराव तांदळे, दशरथ वनवे, राजेंद्र मस्के, मुन्ना फड, बाळासाहेब अंबुरे, बप्पासाहेब घुगे, नितीन धांडे, सागर बहीर, रोहीत क्षीरसागर, हर्षद क्षीरसागर, गणपत डोईफोडे, अरूण बोंगाणे, गणेश उगले, वसंत सानप, हनुमान पिंगळे, जगदीश काळे, जयश्री मुंडे, मधुसूदन खेडकर, भारत सोन्नर, सतीश सुरवसे, राजेंद्र बांगर, संपदा गडकरी, प्रकाश खेडकर, परमेश्वर सातपुते, गणेश उगले इत्यादींची उपस्थिती होती.कार्यकर्ता केंद्रस्थानीबीड जिल्ह्यातील कार्यकर्ता हा मला केंद्रस्थानी आहे. घरचे लोक मला सोडून गेले, अडचणीच्या काळात तेव्हा कार्यकर्ता फाटके कपडे घालून काम करत होता. त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न मी करत आहे. जिल्ह्यात सहाही आमदार महायुतीचे निवडून आले पाहिजेत, बीडमधून जयदत्त क्षीरसागरांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, आम्ही सर्व युती म्हणून एका दिशेने जाणार आहोत. राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. आमच्या पंखाला बळ देताना विजयाची जोड लावा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडPankaja Mundeपंकजा मुंडेJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर