शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

जयदत्तअण्णांना विजयी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 23:45 IST

स्व.गोपीनाथराव मुंडेंनी असंख्य लोकांना गुलाल लावण्याचे काम केले आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या अनुभवी उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांचे सभेत आवाहन : आमदारांच्या वज्रमुठीमुळेच विकास, राष्टÑवादीवर केली कडाडून टीका

बीड : मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कारभार केला नाही तर संसार केला. बीड जिल्ह्यातील आमदारांची एकमूठ वज्रमूठ होती म्हणून बीड जिल्ह्याचा विकास झाला. राष्ट्रवादी चांगल्या माणसाला संपवण्याचे काम करते हा इतिहास आहे. या इतिहासाची उजळणी करूनच नेते आणि पदाधिकारी स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. म्हणूनच राष्ट्रवादीचे लोक भाजपा-शिवसेनेत येत आहेत. स्व.गोपीनाथराव मुंडेंनी असंख्य लोकांना गुलाल लावण्याचे काम केले आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या अनुभवी उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.रायमोहा येथे बीड मतदारसंघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री पंकजा मुंडे यांची गुरुवारी जाहीर सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या.पंकजा मुंडे म्हणाल्या, आ.सुरेश धस यांना भाजपात घेतले आणि तेथून पुढे मेगा भरतीला सुरूवात झाली आता आमचा पक्ष हाऊसफुल्ल झाला आहे. गेल्या पाच वर्षात बीड जिल्ह्याचा विकास करताना मतभेद केला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, बाळासाहेब जगताप, संगिता चव्हाण, डॉ.योगेश क्षीरसागर, सर्जेराव तांदळे, दशरथ वनवे, राजेंद्र मस्के, मुन्ना फड, बाळासाहेब अंबुरे, बप्पासाहेब घुगे, नितीन धांडे, सागर बहीर, रोहीत क्षीरसागर, हर्षद क्षीरसागर, गणपत डोईफोडे, अरूण बोंगाणे, गणेश उगले, वसंत सानप, हनुमान पिंगळे, जगदीश काळे, जयश्री मुंडे, मधुसूदन खेडकर, भारत सोन्नर, सतीश सुरवसे, राजेंद्र बांगर, संपदा गडकरी, प्रकाश खेडकर, परमेश्वर सातपुते, गणेश उगले इत्यादींची उपस्थिती होती.कार्यकर्ता केंद्रस्थानीबीड जिल्ह्यातील कार्यकर्ता हा मला केंद्रस्थानी आहे. घरचे लोक मला सोडून गेले, अडचणीच्या काळात तेव्हा कार्यकर्ता फाटके कपडे घालून काम करत होता. त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न मी करत आहे. जिल्ह्यात सहाही आमदार महायुतीचे निवडून आले पाहिजेत, बीडमधून जयदत्त क्षीरसागरांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, आम्ही सर्व युती म्हणून एका दिशेने जाणार आहोत. राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. आमच्या पंखाला बळ देताना विजयाची जोड लावा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडPankaja Mundeपंकजा मुंडेJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर