शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

बीड बायपासवरील उड्डाणपुलांच्या उंचीवरून संभ्रम! एक पूल १५ जानेवारीपर्यंत खुला होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 19:18 IST

संग्रामनगरसह देवळाई चौकातील उड्डाणपुलाच्या कामावरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

औरंगाबाद : बीड बायपासवर बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांच्या उंचीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. रस्त्याचे काम सुरू होऊन अडीच वर्षे झाली आहेत. अपघाताचा मार्ग म्हणून त्या रस्त्याची नोंद झाल्यानंतर शासनाने त्या रस्त्याला ३८३ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. तीन पुलांचे काम होत आले असले तरी काम पूर्ण झाल्यावर नेमकी वाहतूक कशी असणार, उड्डाणपुलांची उंची कमी तर नाही ना, यासारखे प्रश्न त्या रस्त्यांवरून जाणाऱ्यांना पडत आहेत. जी-२० परिषदेमुळे संग्रामनगरसमोरील पूल १५ जानेवारीपर्यंत वाहतुकीला खुला करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार सध्या काम सुरू आहे.

कोरोनाच्या दोन लाटा, शासनाकडून निधी न मिळणे, जलवाहिनी स्थलांतरित न करणे यांसह इतर संस्थांच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे अडथळे दूर करीत या बायपासचे काम सुरू असले तरी संग्रामनगरसह देवळाई चौकातील उड्डाणपुलाच्या कामावरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. संग्रामनगर पुलाचे लँडिंग आणि नवीन पुलाखालील अंडरपास यांचा उतार प्रतापनगरच्या नाल्याच्या दिशेने वळविण्यात येईल. असे पुलाचे डिझाइन आहे. देवळाई चौकातील पुलाखाली देखील साडेपाच मीटर उंची असेल, असा दावा करण्यात येत आहे. तिन्ही पुलांच्या खाली सव्वा ते पावणेदोन मीटरपर्यंत खोली करून वाहतुकीसाठी रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. हे सगळ्या तांत्रिक आराखड्यानुसार आहे. यात बदल होणार नाही. पुलाखालील अंडरपासचे पाणी प्रतापपगर नाल्यात पाइपने साेडण्यात येणार आहे.

कंत्राटदाराचा दावा असा....संग्रामनगरसमोरील विद्यमान रस्त्यापासून पुलाखाली २ मीटर खाेदकाम असेल. आरटीएलचे (रोड टॉप लेव्हल) मोजमाप करून ते संग्रामनगर उड्डाणपुलाच्या लँडिंगपर्यंत जुळविण्यात येणार आहे. पुलाखालून होणाऱ्या मार्गावरील पाणी प्रतापनगरच्या नाल्यापर्यंत १२०० मिलीमीटरच्या पाइपने सोडण्यात येणार आहे. देवळाई चौकातही साडेपाच मीटर उंची आरटीएलपासून असणार आहे. सगळे काही डिझाइनप्रमाणे आहे.- जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.

पीडब्ल्यूडीचा दावा असा...पुलाखालून वाहने जाण्यासाठी साडेपाच मीटरची उंची असणार आहे. हे स्टॅण्डर्ड प्रमाण आहे. तसे डिझाइन मंजूर केलेले आहे. चुकीचे किंवा तांत्रिक चुका असलेले काम कसे केले जाईल. काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक एकदम सुरळीतपणे राहील. कुठेही अडचण येणार नाही.- नरसिंग भंडे, कार्यकारी अभियंता, जागतिक बँक प्रकल्प

ईपीसी हायब्रीड अॅन्युटी मॉडेलनुसार कामईपीसी हायब्रीड अॅन्युटी मॉडेलनुसार काम सुरू असून, त्यात चार उड्डाणपुलांसह १७ किमी रस्त्याचा समावेश आहे.

कंत्राटदार कोण आहे...जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला २९१ कोटी व इतर ९२ कोटींच्या कामांचे कंत्राट २०२० मध्ये मिळाले आहे.

बायपासवर किती पुलांचे कामएमआयटी, संग्रामनगर, देवळाई चौक आणि केम्ब्रिज शाळेसमोर असे चार उड्डाणपूल या प्रकल्पात समाविष्ट असून, यापैकी तीन पुलांचे काम बायपासवर आहे. व्हीयूपी म्हणजे व्हेईकल अंडरपास व व्हीओपी म्हणजे व्हेईकल ओव्हरपास म्हणजे पुलावरून आणि खालून वाहतुकीसाठी केलेली व्यवस्था तेथे असणार आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग