शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गव्हावर घाटेअळी, तांबेराचा प्रादुर्भावाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 17:11 IST

ढगाळ वातावरणामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यात रबी हंगामात ३ लाख ३३ हजार हेक्टरवर पेरा

बीड : गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्याचा परिणाम रबीच्या पिकावर दिसून येत आहे. बदलत्या वातावरणाने हरभऱ्यावर घाटेअळी आणि इतर पिकांवर तांबेरा व अन्य किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच, गहू व हरभरा पिकांना थंडीची आवश्यकता असते मात्र, ढगाळ वातावरणामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. 

यावर्षी रबी हंगामात ३ लाख ३३ हजार ६२० हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणी करण्यात आली आहे. ढगाळ वातावरणाने किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून, हरभऱा पिकांवर घाटेअळी व गहू ज्वारी पिकांवर तांबेरा रोग पडण्याची शक्यता आहे. या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज असून, फवारणीही करणे आवश्यक आहे. ढगाळ वातावरण असल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढू शकतो. त्यामुळे बुरशी नाशकाची फवारणी आवश्यक आहे. कीड रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील केले जात आहे. शिवाय, शेतकऱ्यांनीही पिकांची काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे कामकाज कृषी विभागाकडून सुरु आहे. 

पाऊस झाल्यास पिकांना फायदाढगाळ वातावरणामुळे पाऊस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोठा पाऊस झाल्यास खरीप हंगामातील कापूस पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळात पाऊस झाल्यास रबी पिकांना फायदा होणार आहे. 

वातावरण बदलानुसार शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे रबी हंगामातील पीक हाती लागावे यासाठी शेतकरी पिकांची काळजी घेत आहेत. मात्र, बदललेल्या वातावरणाचा फटका पिकांना बसणार असून, यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

असे आहे जिल्ह्यातील रबीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)ज्वारी    १५९७६९हरभरा    १३८०६७गहू    ३२५००मका    २८७९

ढगाळ वातावरणाचा हरभरा, गहू, ज्वारी, पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने फवारणी करावी. यामुळे कीड व अळीचा प्रादुर्भाव रोखता होईल. - सुभाष साळवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  (प्रभारी)  बीड

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीenvironmentपर्यावरण