शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

बंद रेल्वेचा लालपरीला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:42 IST

परळी : कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने बीड जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे ७ जूनपासून राज्य ...

परळी : कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने बीड जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे ७ जूनपासून राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरू झाली आहे. तर परभणी, लातूरकडे जाणारी रेल्वे सेवा बंद असल्याने प्रवासी पर्याय म्हणून एस. टी. बसचा आधार घेत आहेत. पर्यायाने एस. टी. च्या उत्पन्नात भर पडत आहे.

बारापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी परळीत देशातून विविध ठिकाणचे भाविक येतात. मात्र, लॉकडाऊनमुळे येणाऱ्यांची संख्या रोडावली होती. आता येत्या काळात संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाच्या येथील आगारातून दररोज बसच्या २२ फेऱ्या सुरू केल्या असून यातून पहिल्या दिवशी सोमवारी परळी बस आगारास ७० हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे. तर मंगळवारी परळी येथून बीडकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवासी संख्या चांगली होती. लॉकडाऊनमुळे परभणी, लातूरकडे जाणाऱ्या रेल्वे बंद असल्याने परळीहून बसने परभणी, लातूरकडे प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे . मंगळवारी परळी बस स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी होती. सकाळी बसमधून ४४ प्रवासी बीडकडे रवाना झाले. परळी बस स्थानकातून बीडला बसच्या पाच फेऱ्या सुरू केल्या आहेत. परभणी व लातूर येथेही प्रत्येकी पाच बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. परळी-अंबाजोगाई २, परळी- सोनपेठ २ व अन्य ठिकाणी मिळून एकूण २२ बस फेऱ्या सुरू केल्या आहेत.

परळीतून रोज एसटीच्या फेऱ्या - २२

रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या - ३५०

धावणाऱ्या रेल्वेंची संख्या - ०६

प्रवासी - २५०

बसने परभणी, लातूर, बीडला गर्दी

राज्य परिवहन महामंडळाच्या परळी आगारातून सुटणाऱ्या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवासभाडे कमी असलेतरी रेल्वे बंद असल्याने परभणी, लातूरकडे जाणाऱ्या बसेसमध्ये गर्दी दिसून येत आहे. तर औरंगाबाद, जालन्याकडे जाणारे प्रवासी बीडमार्गे जात असल्याने बहुतांश बसेसची प्रवासी सेवा पूर्ण क्षमतेने होत आहे.

हैदराबाद, औरंगाबाद रेल्वेला प्रतिसाद

परळी रेल्वे स्थानकातून नांदेड -बंगळुरू, बंगळुरू -नांदेड , औरंगाबाद- हैदराबाद, हैदराबाद- औरंगाबाद, काकीनाडा -शिर्डी , शिर्डी - काकीनाडा या सहा रेल्वे धावत आहेत. यापैकी औरंगाबाद- हैदराबाद, हैदराबाद -औरंगाबाद या रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तर पनवेल आणि पुणे या रेल्वे गाड्या बंद आहेत.

अत्यावश्यक कामासाठीच प्रवास

नोकरीच्या कामानिमित्त एस. टी. महामंडळाच्या बसने सोमवारपासून येणे-जाणे सुरू केले आहे. मंगळवारी बीडकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवासी संख्या जास्त होती.

-विजयकुमार खोसे, प्रवासी परळी.

परळी -आंबाजोगाई बस सुरू झाल्याने सोय झाली. लॉकडाऊनमध्ये दुचाकीवरून पॅथॉलॉजीचे नमुने घेऊन जावे लागत होते. बसचा प्रवास चांगला आहे. भीती काही नाही. -

अनिल बांगर, बसप्रवासी, परळी

परळी स्थानकातून सॅनिटाइझ केलेल्या बसेस रोज सोडण्यात येत आहेत. कोरोनाचे नियम व सोशल डिस्टन्स पाळण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी महामंडळाच्या बसने प्रवास करावा. नागपूर, भुसावळ, बोरीवली, पुणे या बससेवा दोन दिवसांत सुरु करणार आहोत.

- प्रवीण भोंडवे, आगार प्रमुख, परळी वैजनाथ.

सध्या हैदराबादकडे जाणारे प्रवासी अधिक आहेत. स्थानकात सॅनिटाइझ, मास्क बंधनकारक आहे. कन्फर्म तिकिट असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जातो. वेटिंगवर असणाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही. कोरोनामुळे मर्यादित सामानासह लोक प्रवास करतात. तसेच खाद्यपदार्थही स्वत:च घरून आणतात.

- जितेंद्रकुमार मीणा, रेल्वे स्थानक प्रमुख, परळी.

मंगळवारी बीड- माजलगाव बसमध्ये प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद दिसून आला.

-