शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

पाण्यासाठी प्रशासनाला चोळी-बांगडीचा आहेर देणार - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:39 AM

शिरूर कासार : शहराच्या चोहोबाजूने पाणीच पाणी असले तरी शहरातील नळयोजनेला मात्र कोरड पडली. एक महिन्यापासून पाणी पुरवठा बंद ...

शिरूर कासार : शहराच्या चोहोबाजूने पाणीच पाणी असले तरी शहरातील नळयोजनेला मात्र कोरड पडली. एक महिन्यापासून पाणी पुरवठा बंद असल्याने शहरातील नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. नगर पंचायतकडून हा प्रश्न सुटला नसल्याने आता उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी परवानगी देण्याची मागणी करीत तत्काळ पाणीपुरवठा सुरू न केल्यास चोळी-बांगडीचा आहेर देण्याचा इशारा दिला आहे. उपलब्ध असो वा नसो, शहराचा पाणीप्रश्न कायम राहतो. टंचाई काळात टँकरने पाणी मिळाले. मात्र, भर पावसाळ्यात आणि तेही नळयोजनेचा उथळा प्रकल्प तुडुंब भरला असताना एक महिन्यापासून शहर पाण्यावाचून राहिले आहे. आता मात्र संयमाचा बांध ओलांडला असून, थेट उघड्यावर नैसर्गिक विधीची रीतसर परवानगी मागत प्रशासनाची चांगलीच खिल्ली उडविली आहे. पाईप फुटला, वीज नाही, मोटार जळाली अशी वेगवेगळी कारणे सांगण्यात आली. झालेला अडथळा दूर करण्यासाठी मोठा वेळ जात असल्याने शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक पदाधिकारी मुदत संपल्याने लक्ष देण्याची गरज मानत नसल्याचे दिसून येते. पाणीप्रश्नावर कुणीच बोलत नसल्याने अखेर त्रासलेल्या नागरिकांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ॲड. नितीन देशमुख, शरद पवार, सुनील गाडेकर, शिवनाथ कातखडे, नीलेश ललवाणी, राजेश काटे, अभिलाश गाडेकर, महेश कातखडे, अशोक भांडेकर, मनोज परदेशी, आदींनी हे निवेदन दिले.

220921\00071745-img-20210922-wa0031.jpg

फोटो