शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

‘जायभायवाडीत बालविवाह करणार नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:20 IST

जायभायवाडी येथे बालविवाह करायचा नाही असा निधार ग्रामस्थांनी केला

लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : जायभायवाडी येथे बालविवाह करायचा नाही असा निधार ग्रामस्थांनी केला. ‘जायभायवाडीतील ऊसतोड कामगाराच्या अल्पवयीन मुलीचा विवाह रोखल्याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित झाल्यानंतर शांतीवन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक नागरगोजे यांनी जायभायवाडी या गावाला भेट दिली. तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर ग्रामस्थांनी हा एखमुखी निर्णय घेतला. बालविवाह रोखलेल्या मुलीला शिक्षणासाठी दत्तक घेत असून तिच्या लग्नाची जबाबदारी उचलत असल्याचे नागरगोजे यावेळी म्हणाले.जायभायवाडी ऊसतोड मजुराच्या मुलीचा होणारा बालविवाह ग्रामपरिवर्तक जालिंदर वनवे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने रोखला होता. ही बाब पत्रकार अनिल महाजन यांनी नागरगोजे यांना कळविली होती. दीपक नागरगोजे यांनी जायभायवाडीतील ऊसतोड कामगारांशी संवाद साधला. येथील सर्व मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही तसेच बालविवाहाला बळी पडू नये म्हणून गावातील सर्व मुलींच्या शैक्षणकि पालकत्वाची जबाबदारी शांतीवन घेईल असा शब्द नागरगोजे यांनी दिला. तसेच ज्या मुलीचा बालविवाह थांबविण्यात आला, तिच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची सर्व जबाबदारी शांतीवन घेत असल्याचे सांगितले.ज्या दिवशी मुलगी शांतीवन संस्थेत दाखल होईल त्याच दिवशी तिच्या नावाने २५ हजार रुपयांची बचत ठेव संस्थेच्या वतीने ठेवली जाईल, असा शब्दही नागरगोजे यांनी यावेळी दिला.यावेळी जमलेल्या ऊसतोड कामगारांना त्यांनी मार्गदर्शन केले. गावामध्ये पाणी जर असेल तर आपणाला आपल्या शेतामध्ये पिके चांगली घेता येतील व ऊसतोडणीसाठी स्थलांतरसुद्धा करावे लागणार नाही. आपल्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका. परिवर्तनासाठी पाणी आणि शिक्षण या दोन बाबी लक्षात ठेवल्या तर आपलं गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असेही ते म्हणाले.यावेळी गावातील सर्व महिला व पुरुष, मुले, मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरपंच डॉ.सुंदर जायभाये यांनी गावामध्ये सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. प्रास्ताविक ग्रामपरिवर्तक जालिंदर वनवे यांनी केले. श्रमातून पाणीदार झाल्यानंतर जायकवाडीने शैक्षणिक विकासाची वाट धरली असून,या पुढे गावात बालविवाह केला जाणार नाही, असा एकमुखी निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला.

टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिकgram panchayatग्राम पंचायत