शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

‘जायभायवाडीत बालविवाह करणार नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:20 IST

जायभायवाडी येथे बालविवाह करायचा नाही असा निधार ग्रामस्थांनी केला

लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : जायभायवाडी येथे बालविवाह करायचा नाही असा निधार ग्रामस्थांनी केला. ‘जायभायवाडीतील ऊसतोड कामगाराच्या अल्पवयीन मुलीचा विवाह रोखल्याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित झाल्यानंतर शांतीवन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक नागरगोजे यांनी जायभायवाडी या गावाला भेट दिली. तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर ग्रामस्थांनी हा एखमुखी निर्णय घेतला. बालविवाह रोखलेल्या मुलीला शिक्षणासाठी दत्तक घेत असून तिच्या लग्नाची जबाबदारी उचलत असल्याचे नागरगोजे यावेळी म्हणाले.जायभायवाडी ऊसतोड मजुराच्या मुलीचा होणारा बालविवाह ग्रामपरिवर्तक जालिंदर वनवे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने रोखला होता. ही बाब पत्रकार अनिल महाजन यांनी नागरगोजे यांना कळविली होती. दीपक नागरगोजे यांनी जायभायवाडीतील ऊसतोड कामगारांशी संवाद साधला. येथील सर्व मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही तसेच बालविवाहाला बळी पडू नये म्हणून गावातील सर्व मुलींच्या शैक्षणकि पालकत्वाची जबाबदारी शांतीवन घेईल असा शब्द नागरगोजे यांनी दिला. तसेच ज्या मुलीचा बालविवाह थांबविण्यात आला, तिच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची सर्व जबाबदारी शांतीवन घेत असल्याचे सांगितले.ज्या दिवशी मुलगी शांतीवन संस्थेत दाखल होईल त्याच दिवशी तिच्या नावाने २५ हजार रुपयांची बचत ठेव संस्थेच्या वतीने ठेवली जाईल, असा शब्दही नागरगोजे यांनी यावेळी दिला.यावेळी जमलेल्या ऊसतोड कामगारांना त्यांनी मार्गदर्शन केले. गावामध्ये पाणी जर असेल तर आपणाला आपल्या शेतामध्ये पिके चांगली घेता येतील व ऊसतोडणीसाठी स्थलांतरसुद्धा करावे लागणार नाही. आपल्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका. परिवर्तनासाठी पाणी आणि शिक्षण या दोन बाबी लक्षात ठेवल्या तर आपलं गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असेही ते म्हणाले.यावेळी गावातील सर्व महिला व पुरुष, मुले, मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरपंच डॉ.सुंदर जायभाये यांनी गावामध्ये सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. प्रास्ताविक ग्रामपरिवर्तक जालिंदर वनवे यांनी केले. श्रमातून पाणीदार झाल्यानंतर जायकवाडीने शैक्षणिक विकासाची वाट धरली असून,या पुढे गावात बालविवाह केला जाणार नाही, असा एकमुखी निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला.

टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिकgram panchayatग्राम पंचायत