शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

बीडमध्ये आता १ लाख ३२ हजार क्विंटल तूर खरेदीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:56 AM

नाफेडच्या वतीने हमीदराने खरेदीसाठी जिल्ह्यात सुरु केलेल्या केंद्रांवर तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी मुदतवाढ दिली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या परंतु वंचित राहिलेल्या शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. मात्र या कालावधीत पाच दिवस सुट्या आल्याने जवळपास एक लाख ३२ हजार २३६ क्विंटल तूर खरेदीसाठी १७ दिवसांचाच अवधी मिळणार आहे.

ठळक मुद्दे१७ दिवसांची मुदतवाढ : १६ हजार ९२५ शेतकऱ्यांना दिलासा

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नाफेडच्या वतीने हमीदराने खरेदीसाठी जिल्ह्यात सुरु केलेल्या केंद्रांवर तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी मुदतवाढ दिली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या परंतु वंचित राहिलेल्या शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. मात्र या कालावधीत पाच दिवस सुट्या आल्याने जवळपास एक लाख ३२ हजार २३६ क्विंटल तूर खरेदीसाठी १७ दिवसांचाच अवधी मिळणार आहे.१ फेब्रुवारीपासून शासनाने नाफेडच्या वतीने हमीदराने तूर खरेदीसाठी जिल्ह्यात १५ केंद्र सुरु केले होते. कधी गोदाम तर कधी बारदाना तर कधी तांत्रिक अडचणींमुळे तूर खरेदीत अडथळे आले होते. ७७ दिवसात १५ हजार ७६४ शेतकºयांची १ लाख ६८ हजार ५४४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यानंतर १८ एप्रिलपासून खरेदी बंद केली होती. त्यामुळे १८ एप्रिलपर्यंत नोंदणी केलेल्या १५ हजार ७६४ शेतकºयांच्या तुरीचा प्रश्न निर्माण झाला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करुन तूर खरेदीसाठी मुदतवाढीची गरज असल्याचे शासन व प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते. अखेर देशाचे कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी तूर खरेदीला मुदतवाढ दिली. हा निर्णय घेण्यास पाच दिवसांचा अवधी लागला. मुदतवाढीचे आदेश २३ रोजी सायंकाळी मिळाल्याने २४ रोजी काही केंद्रांवरच तूर खरेदी होऊ शकली. बुधवारपासून खरेदीला वेग येईल, मात्र पुरेसा बारदाणा आणि गोदामांची उपलब्धता आवश्यक आहे.मुदतवाढीत पाच दिवस वाया१८ एप्रिलपासून तूर खरेदी बंद केल्याने केंद्रचालक निवांत होते. तर तीन दिवस ताटकळलेल्या शेतकºयांनी त्यांचा माल परत घरी नेला. विस्कळीत झालेली यंत्रणा सुस्थितीत आणण्यात आली. मुदतवाढीमुळे पुन्हा तूर खरेदी सुरु होत आहे.जवळपास १६ हजार ९२५ शेतकºयांची तूर १५ मेपर्यंत खरेदी करण्याचे मोठे आव्हान यंत्रणांपुढे आहे. तूर खरेदी वेगाने झाल्यास हे आव्हान पेलता येणार असलेतरी केंद्र सुरु झाल्यापासून गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदीची गती संथ राहिली आहे.केंद्रांच्या अडचणी१८ एप्रिलपर्यंत १ लाख ६८ हजार ५४४ क्विंटल तूर खरेदी झाली. त्यापैकी ९० हजार क्विंटल तूर गोदामाअभावी खरेदी केंद्रांवरच पडून आहे. मुदतवाढ मिळाली तरी खरेदी केलेली तूर कुठे ठेवायची असा पेच शिरुर, अंबाजोगाई, माजलगाव येथील केंद्र चालकांपुढे पडला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रBeedबीडagricultureशेती