शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तन मल्टीस्टेटचा चेअरमन न्यायालयाला शरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST

माजलगाव : सुमारे १० कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात मागील तीन वर्षांपासून फरार परिवर्तन मल्टीस्टेट व सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्थेचा ...

माजलगाव

: सुमारे १० कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात मागील तीन वर्षांपासून फरार परिवर्तन मल्टीस्टेट व सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्थेचा चेअरमन विजय उर्फ भारत अलझेंडे मंगळवारी येथील न्यायालयात स्वतः शरण आला. त्यामुळे ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

येथील परिवर्तन मल्टीस्टेट व सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विजय उर्फ भारत अलझेंडे हे करोडो रुपयांचा अपहार करून मागील तीन वर्षांपासून फरार होता. त्यांनी मल्टीस्टेटच्या १३ शाखा सुरू केल्या होत्या, तर एक सहकारी पतसंस्था होती. ही मल्टीस्टेट ज्यादा व्याजदर देत असल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणावर येथे ठेवी ठेवल्या होत्या. या ठिकाणी मोठा अपहार झाल्याने मागील तीन वर्षांपासून चेअरमन अलझेंडे फरार होता.

त्याच्यावर १३ ठिकाणी अपहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मंगळवारी ४ वाजता अलझेंडे हा येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयात स्वतः होऊन हजर झाला.

अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधिश अरविंद वाघमारे यांच्या न्यायालयाने अलझेंडे याची २३ तारखेपर्यंत जिल्हा तुरूंगात रवानगी केली.

परिवर्तन मल्टीस्टेटमध्ये करोडो रूपयांचा अपहार झाल्यानंतर अनेक पेन्शनधारक रस्त्यावर आले तर अनेकांच्या मुला- मुलींचे लग्न मोडले. विजय उर्फ भारत अलझेंडे हा न्यायालयाला शरण आल्याने या ठिकाणच्या ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

===Photopath===

090321\purusttam karva_img-20210309-wa0028_14.jpg

===Caption===

विजय अलझेंडे मंगळवारी माजलगाव येथील न्यायालयात स्वत: शरण आला.