शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

परिवर्तन मल्टीस्टेटचा चेअरमन न्यायालयाला शरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST

माजलगाव : सुमारे १० कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात मागील तीन वर्षांपासून फरार परिवर्तन मल्टीस्टेट व सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्थेचा ...

माजलगाव

: सुमारे १० कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात मागील तीन वर्षांपासून फरार परिवर्तन मल्टीस्टेट व सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्थेचा चेअरमन विजय उर्फ भारत अलझेंडे मंगळवारी येथील न्यायालयात स्वतः शरण आला. त्यामुळे ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

येथील परिवर्तन मल्टीस्टेट व सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विजय उर्फ भारत अलझेंडे हे करोडो रुपयांचा अपहार करून मागील तीन वर्षांपासून फरार होता. त्यांनी मल्टीस्टेटच्या १३ शाखा सुरू केल्या होत्या, तर एक सहकारी पतसंस्था होती. ही मल्टीस्टेट ज्यादा व्याजदर देत असल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणावर येथे ठेवी ठेवल्या होत्या. या ठिकाणी मोठा अपहार झाल्याने मागील तीन वर्षांपासून चेअरमन अलझेंडे फरार होता.

त्याच्यावर १३ ठिकाणी अपहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मंगळवारी ४ वाजता अलझेंडे हा येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयात स्वतः होऊन हजर झाला.

अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधिश अरविंद वाघमारे यांच्या न्यायालयाने अलझेंडे याची २३ तारखेपर्यंत जिल्हा तुरूंगात रवानगी केली.

परिवर्तन मल्टीस्टेटमध्ये करोडो रूपयांचा अपहार झाल्यानंतर अनेक पेन्शनधारक रस्त्यावर आले तर अनेकांच्या मुला- मुलींचे लग्न मोडले. विजय उर्फ भारत अलझेंडे हा न्यायालयाला शरण आल्याने या ठिकाणच्या ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

===Photopath===

090321\purusttam karva_img-20210309-wa0028_14.jpg

===Caption===

विजय अलझेंडे मंगळवारी माजलगाव येथील न्यायालयात स्वत: शरण आला.