शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
4
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
5
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
6
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
7
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
8
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
9
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
10
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
11
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
12
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
13
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
14
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
15
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
16
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
17
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
18
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
19
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
20
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?

शेतकऱ्यांचे नशीब बदलणार केंद्र-राज्य सरकार; केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहानांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 12:32 IST

शेतकऱ्यांनी पारंपरिक सोयाबीन-कापूस यांसारख्या पिकांबरोबरच फळे, फुले आणि सेंद्रिय शेतीकडे वळावे

परळी : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कोणतीही कसर ठेवणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ग्रामीण भागातील शेतीमालाला कमी भाव मिळण्याची आणि मोठ्या शहरांत जास्त भाव मिळण्याची दरी कमी करण्यासाठी सरकारी एजन्सींमार्फत थेट बाजारपेठांपर्यंत शेतमाल पोहोचविण्याचा प्रयत्न होणार असल्याची महत्त्वाची घोषणाही त्यांनी केली.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हे परळी तालुक्यातील सिरसाळा येथे मयंक गांधी यांच्या ग्लोबल विकास ट्रस्टतर्फे आयोजित भव्य शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यास मराठवाडा व मराठवाड्याबाहेरूनही मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. चौहान म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सुखी व समृद्ध करण्याचा संकल्प राबवला जात आहे. शेतकरी सुखी तर देश सुखी राहणार आहे. कोणत्याही घरात गरिबी राहू देणार नाही. नुकसानीची भरपाई देताना ते म्हणाले, झालेल्या नुकसानीचा एक-एक रुपया शेतकऱ्यांना दिला जाईल. शेतकऱ्यांनी पारंपरिक सोयाबीन-कापूस यांसारख्या पिकांबरोबरच फळे, फुले आणि सेंद्रिय शेतीकडे वळावे लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.

बियाणे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याबाबत विचार सुरू आहे. ग्लोबल विकास ट्रस्ट व मयंक गांधी यांनी केलेले कृषी प्रयोग देशभर राबवण्यात येतील आणि केंद्र सरकार या संस्थेसोबत मिळून शेतकऱ्यांचे नशीब बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या परिसरात कृषी प्रदर्शन भरवण्यात आले होते. कृषी क्षेत्राशी संलग्न असलेल्या ठिबक सिंचन, ट्रॅक्टर, शेतीविषयक अवजारे व साहित्याचे स्टॉल उभारण्यात आले होते, या ठिकाणी शेतकऱ्यांची सकाळपासूनच गर्दी होती. कार्यक्रमास जलनायक मयंक गांधी, विक्रम श्रॉफ, रवी झुनझुनवाला, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे डॉ. इंद्रमणी त्रिपाठी, डॉ. हरिश्चंद्र वंगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवलिंग रुद्राक्ष यांनी केले.

शेतकऱ्यांशी थेट संवादया मेळाव्याचे खास आकर्षण ठरले ते केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी व्यासपीठावरून खाली उतरून थेट शेतकऱ्यांशी साधलेला संवाद. त्यांना भेटण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी झुंबड उडाली होती. उपस्थित शेतकऱ्यांनी मी शेतकरी, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार, असा उल्लेख असलेल्या पांढऱ्या टोप्या परिधान केल्या होत्या आणि कृषिमंत्र्यांनीही तीच टोपी परिधान करून शेतकऱ्यांमध्ये मिसळून गेले.

परळीबद्दल लोक चुकीचे बोलतातजलनायक मयंक गांधी म्हणाले, बाहेर परळी शहराबद्दल लोक चुकीचे बोलतात, पण परळीकरांसारखे चांगले लोक देशात कुठेही नाहीत. त्यांनी पारंपरिक शेतीबरोबर फळे-फुले शेती करण्याची गरज असल्याचे सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Central, state governments to transform farmers' fortunes: Agriculture Minister Chauhan.

Web Summary : Union Agriculture Minister Chauhan assured aid for rain-hit farmers and efforts to connect farmers directly to markets. He urged diversification towards fruits, flowers, and organic farming. He also hinted at direct transfer of seed subsidies. He lauded Global Vikas Trust's agricultural experiments.
टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान