शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे नशीब बदलणार केंद्र-राज्य सरकार; केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहानांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 12:32 IST

शेतकऱ्यांनी पारंपरिक सोयाबीन-कापूस यांसारख्या पिकांबरोबरच फळे, फुले आणि सेंद्रिय शेतीकडे वळावे

परळी : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कोणतीही कसर ठेवणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ग्रामीण भागातील शेतीमालाला कमी भाव मिळण्याची आणि मोठ्या शहरांत जास्त भाव मिळण्याची दरी कमी करण्यासाठी सरकारी एजन्सींमार्फत थेट बाजारपेठांपर्यंत शेतमाल पोहोचविण्याचा प्रयत्न होणार असल्याची महत्त्वाची घोषणाही त्यांनी केली.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हे परळी तालुक्यातील सिरसाळा येथे मयंक गांधी यांच्या ग्लोबल विकास ट्रस्टतर्फे आयोजित भव्य शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यास मराठवाडा व मराठवाड्याबाहेरूनही मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. चौहान म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सुखी व समृद्ध करण्याचा संकल्प राबवला जात आहे. शेतकरी सुखी तर देश सुखी राहणार आहे. कोणत्याही घरात गरिबी राहू देणार नाही. नुकसानीची भरपाई देताना ते म्हणाले, झालेल्या नुकसानीचा एक-एक रुपया शेतकऱ्यांना दिला जाईल. शेतकऱ्यांनी पारंपरिक सोयाबीन-कापूस यांसारख्या पिकांबरोबरच फळे, फुले आणि सेंद्रिय शेतीकडे वळावे लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.

बियाणे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याबाबत विचार सुरू आहे. ग्लोबल विकास ट्रस्ट व मयंक गांधी यांनी केलेले कृषी प्रयोग देशभर राबवण्यात येतील आणि केंद्र सरकार या संस्थेसोबत मिळून शेतकऱ्यांचे नशीब बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या परिसरात कृषी प्रदर्शन भरवण्यात आले होते. कृषी क्षेत्राशी संलग्न असलेल्या ठिबक सिंचन, ट्रॅक्टर, शेतीविषयक अवजारे व साहित्याचे स्टॉल उभारण्यात आले होते, या ठिकाणी शेतकऱ्यांची सकाळपासूनच गर्दी होती. कार्यक्रमास जलनायक मयंक गांधी, विक्रम श्रॉफ, रवी झुनझुनवाला, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे डॉ. इंद्रमणी त्रिपाठी, डॉ. हरिश्चंद्र वंगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवलिंग रुद्राक्ष यांनी केले.

शेतकऱ्यांशी थेट संवादया मेळाव्याचे खास आकर्षण ठरले ते केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी व्यासपीठावरून खाली उतरून थेट शेतकऱ्यांशी साधलेला संवाद. त्यांना भेटण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी झुंबड उडाली होती. उपस्थित शेतकऱ्यांनी मी शेतकरी, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार, असा उल्लेख असलेल्या पांढऱ्या टोप्या परिधान केल्या होत्या आणि कृषिमंत्र्यांनीही तीच टोपी परिधान करून शेतकऱ्यांमध्ये मिसळून गेले.

परळीबद्दल लोक चुकीचे बोलतातजलनायक मयंक गांधी म्हणाले, बाहेर परळी शहराबद्दल लोक चुकीचे बोलतात, पण परळीकरांसारखे चांगले लोक देशात कुठेही नाहीत. त्यांनी पारंपरिक शेतीबरोबर फळे-फुले शेती करण्याची गरज असल्याचे सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Central, state governments to transform farmers' fortunes: Agriculture Minister Chauhan.

Web Summary : Union Agriculture Minister Chauhan assured aid for rain-hit farmers and efforts to connect farmers directly to markets. He urged diversification towards fruits, flowers, and organic farming. He also hinted at direct transfer of seed subsidies. He lauded Global Vikas Trust's agricultural experiments.
टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान