शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

आतापर्यंत कपाशीला पाने दिसली असती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:05 IST

‘मृगाला बरसला असता तर कपाशी दोन पानांवर दिसली असती, आणि पुढची पिके घ्यायला सोपे गेले असते’, अशा प्रतिक्रिया लांबलेल्या पावसाबद्दल शेतकरी व्यक्त करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील सहा महिन्यांपासून टंचाई आणि दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या बीड जिल्ह्याला यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा होती. परंतू जूनचे १९ दिवस झालेतरी पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ‘मृगाला बरसला असता तर कपाशी दोन पानांवर दिसली असती, आणि पुढची पिके घ्यायला सोपे गेले असते’, अशा प्रतिक्रिया लांबलेल्या पावसाबद्दल शेतकरी व्यक्त करत आहेत.मागील वर्षी सरारीच्या तुलनेत ५० टक्केच पाऊस झाला होता. त्यामुळे खरिपाबरोबरच रबीचा हंगामही वाया गेला. डिसेंबरपासून ग्रामीण भागात पाणी टंचाई सुरु झाली. उन्हाळ्यातील चार महिने दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागल्या. तापमानही ४४ अंशापर्यंत गेल्याने यंदाचा उन्हाळा असह्य झाला. त्यामुळे जून कधी येतो आणि पाऊस कधी बरसतो, याची प्रत्येक जण चातकाप्रमाणे वाट पाहत होता. ६-७ जूनदरम्यान मान्सूनपूर्व पावसाने किरकोळ स्वरुपात हजेरी लाली तरीही आशा उंचावल्या होत्या.खरिप हंगामाची तयारी सुरु केली. मशागती आटोपल्या, मात्र पाऊस नसल्याने शोतकरी चिंतेत आहेत. १९ जूनपर्यंत पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. मागील वर्षीदेखील २० जूनपासून पेरण्या सुरु झाल्या होत्या.मात्र, यंदा १९ जूनपर्यंत पूरक पाऊसच झालेला नसल्याने २० जूनपासून पेरण्यांची आशाही मावळली आहे. त्यात मूग, उडदाचा विषय संपलेला आहे. हवामान खात्याच्या अनुमानानुसार २२ पासून चांगल्या पावसाचा अंदाज आहे. जर तसे झाले तर जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पेरण्या सुरु होऊ शकतात.पाऊस लांबल्याने उत्पादकतेवर परिणाम१ ते १९ जूनदरम्यान मृगाचा पाऊस झाला असता तर कपाशी, मूग, उडदाची लागवड पूर्ण झाली असती. या पावसामुळे सोयाबीन, तूर, मका, बाजरीला पोषक वातावरण राहिले असते. मात्र पाऊस लांबल्याने सोयाबीन, तूर पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो, असे कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

टॅग्स :cottonकापूसMonsoon Specialमानसून स्पेशलdroughtदुष्काळAgriculture Sectorशेती क्षेत्र