शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

आतापर्यंत कपाशीला पाने दिसली असती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:05 IST

‘मृगाला बरसला असता तर कपाशी दोन पानांवर दिसली असती, आणि पुढची पिके घ्यायला सोपे गेले असते’, अशा प्रतिक्रिया लांबलेल्या पावसाबद्दल शेतकरी व्यक्त करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील सहा महिन्यांपासून टंचाई आणि दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या बीड जिल्ह्याला यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा होती. परंतू जूनचे १९ दिवस झालेतरी पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ‘मृगाला बरसला असता तर कपाशी दोन पानांवर दिसली असती, आणि पुढची पिके घ्यायला सोपे गेले असते’, अशा प्रतिक्रिया लांबलेल्या पावसाबद्दल शेतकरी व्यक्त करत आहेत.मागील वर्षी सरारीच्या तुलनेत ५० टक्केच पाऊस झाला होता. त्यामुळे खरिपाबरोबरच रबीचा हंगामही वाया गेला. डिसेंबरपासून ग्रामीण भागात पाणी टंचाई सुरु झाली. उन्हाळ्यातील चार महिने दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागल्या. तापमानही ४४ अंशापर्यंत गेल्याने यंदाचा उन्हाळा असह्य झाला. त्यामुळे जून कधी येतो आणि पाऊस कधी बरसतो, याची प्रत्येक जण चातकाप्रमाणे वाट पाहत होता. ६-७ जूनदरम्यान मान्सूनपूर्व पावसाने किरकोळ स्वरुपात हजेरी लाली तरीही आशा उंचावल्या होत्या.खरिप हंगामाची तयारी सुरु केली. मशागती आटोपल्या, मात्र पाऊस नसल्याने शोतकरी चिंतेत आहेत. १९ जूनपर्यंत पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. मागील वर्षीदेखील २० जूनपासून पेरण्या सुरु झाल्या होत्या.मात्र, यंदा १९ जूनपर्यंत पूरक पाऊसच झालेला नसल्याने २० जूनपासून पेरण्यांची आशाही मावळली आहे. त्यात मूग, उडदाचा विषय संपलेला आहे. हवामान खात्याच्या अनुमानानुसार २२ पासून चांगल्या पावसाचा अंदाज आहे. जर तसे झाले तर जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पेरण्या सुरु होऊ शकतात.पाऊस लांबल्याने उत्पादकतेवर परिणाम१ ते १९ जूनदरम्यान मृगाचा पाऊस झाला असता तर कपाशी, मूग, उडदाची लागवड पूर्ण झाली असती. या पावसामुळे सोयाबीन, तूर, मका, बाजरीला पोषक वातावरण राहिले असते. मात्र पाऊस लांबल्याने सोयाबीन, तूर पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो, असे कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

टॅग्स :cottonकापूसMonsoon Specialमानसून स्पेशलdroughtदुष्काळAgriculture Sectorशेती क्षेत्र