शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

बोंडअळीने ४० टक्के पांढरं सोनं घटलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:30 AM

यंदा दमदार पाऊस झाल्याने पांढºया सोन्याचे पीक जोमात येईल अशी आशा लावून बसलेल्या शेतकºयांचा सैंद्रिय बोंडअळीने भ्रमनिरास केला आहे. जिल्ह्यात ४० टक्के कापसाला फटका बसला असून कृषी विभागाच्या प्रारंभिक सर्वेक्षणातही ही बाब पुढे आली आहे. कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील शेतकºयांना कापसानेही दगा दिल्याने ते पुरते बेजार झाले आहेत.

ठळक मुद्देशेतक-यांचा भ्रमनिरासकाहींनी कपाशी उपटून काढली, तर काहींनी रोटावेटर फिरवले

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : यंदा दमदार पाऊस झाल्याने पांढ-या सोन्याचे पीक जोमात येईल अशी आशा लावून बसलेल्या शेतकºयांचा सैंद्रिय बोंडअळीने भ्रमनिरास केला आहे. जिल्ह्यात ४० टक्के कापसाला फटका बसला असून कृषी विभागाच्या प्रारंभिक सर्वेक्षणातही ही बाब पुढे आली आहे. कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील शेतक-यांना कापसानेही दगा दिल्याने ते पुरते बेजार झाले आहेत.

जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ६५५ हेक्टरवर कापूस लागवड झाली. सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावली. नंतर मात्र ३० पेक्षा जास्त दिवसांचा खंड झाला. त्यामुळे कापूस उत्पादक हवालदिल झाले होते. हातची पिके जाण्याची भिती निर्माण झाली होती. त्यांनतर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले. शेतक-यांच्या जीवात जीव आला.

परंतु, परतीच्या पावसाने कापसाच्या वाती केल्या. यातच सैंद्रिय बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रदुर्भाव झाल्याने कापूस उत्पादनात घटीची चिन्हे दिसू लागली. पहिल्या वेचणीतच अळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या पिकाला फटका बसला. काही ठिकाणी तर कपाशीच्या शेतात रुटर फिरविले जात आहेत. एका बॅगला दीड क्विंटल एवढाच उतारा मिळाल्याचे केज तालुक्यातील शेतकरी सांगत आहेत. इतरत्रही तसाच अनुभव शेतक-यांना येत आहेत. हाती आलेले पीक गेल्याने भ्रमनिरास झालेल्या शेतक-यांनी कापूस उपटण्यास सुरुवात केली आहे.

फरतड कापसाचा परिणामवेचणीनंतर फरतड कापूस घेणा-या शेतक-यांचे प्रमाण जास्त आहे. हा फरतड कापूसच कापसाला धोका ठरला आहे. मागील वर्षी कापूस उत्पादनात वाढ झाली होती. मात्र, फरतड कापसामुळे बोंडअळीची साखळी वाढत गेली. त्याचा विपरित परिणाम यावर्षी कापसावर झाल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगतिले.