शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

आजोळी आलेल्या चिमुरड्यांवर काळाचा घाला; हिटरचे उकळते पाणी अंगावर पडून तीन बालिकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 4:57 PM

हिटर कलंडल्याने उकळते पाणी अंगावर पडून उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मामाच्या गावी आलेल्या दोन मुलींसह त्यांच्या मामाच्या मुलीचा होरपळून अंत झाला.

ठळक मुद्देदोन दिवसापासून गेलेली वीज मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आल्याने नजरचुकीने चालू राहिलेल्या हिटरमधील पाणी उकळून बाहेर आले.

अंबाजोगाई : दोन दिवसापासून गेलेली वीज मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आल्याने नजरचुकीने चालू राहिलेल्या हिटरमधील पाणी उकळून बाहेर आले. त्यामुळे हिटर कलंडल्याने उकळते पाणी अंगावर पडून उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मामाच्या गावी आलेल्या दोन मुलींसह त्यांच्या मामाच्या मुलीचा होरपळून अंत झाला. ही हृदयद्रावक घटना अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. या दुर्घटनेत मामीदेखील गंभीर भाजली असून, त्यांच्यावर लातूर येथे उपचार सुरु आहेत.

दुर्गा बिभीषण घुगे (वय १०, रा. सोनपेठ, जि. परभणी), धनश्री पिंटू केदार (वय ८, रा. व्हट्टी, ता. रेणापूर, जि. लातूर) आणि आदिती संभुदेव भताने (वय ४) अशी या बालिकांची नावे आहेत. दुर्गा आणि धनश्री या दोघी उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी येथील त्यांचे मामा संभुदेव दत्तात्रय भताने यांच्याकडे आल्या होत्या. शुक्रवारी रात्री दुर्गा, धनश्री, आदिती आणि संभुदेव यांच्या पत्नी संगीता (वय २४) या घरात झोपल्या होत्या तर इतर कुटुंबीय बाहेर झोपले होते. गावात दोन दिवसांपासून वीज नसल्याने सकाळी सुरु केलेल्या पाण्याच्या हिटरचे बटन तसेच चालू अवस्थेत होते. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक वीज आली आणि हे हिटर सुरु झाले. त्यातील पाणी उकळून बाहेर आले.

हे पाणी पडून हिटर ठेवलेल्या स्टूलखालील सिमेंटचे गट्टू खचले आणि हिटर कलंडून उकळते पाणी जवळच गाढ झोपेत असणाऱ्या मुली आणि त्यांच्या मामींच्या अंगावर पडले. अचानक घडलेल्या या घटनेत चौघीही गंभीररीत्या भाजल्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून जागे झालेल्या कुटुंबियांनी त्यांना तात्काळ अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान आदितीचा मृत्यू झाला. प्रकृती चिंताजनक झाल्याने दुर्गा, धनश्री आणि संगीता यांना लातूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना मंगळवारी दुर्गाचा आणि बुधवारी धनश्रीचा मृत्यू झाला. त्यांच्या मामी संगीता भताने यांच्यावर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

बर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आदिती, दुर्गा, आणि धनश्री यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या  घटनेमुळे संपूर्ण भतानवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूhospitalहॉस्पिटलFamilyपरिवार