परळी: मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू ठरलेले मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी परळी तालुक्यातील मिरवट येथील हरिनाम सप्ताह सोहळ्याला भेट दिली. यावेळी जरांगे पाटील यांनी राजकीय घडामोडींवर आपली रोखठोक मते मांडत भाजप आणि महायुतीवर निशाणा साधला.
माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी भाजपवर तीव्र शब्दात प्रहार केला. "भाजपवाले फार मोठे कलाकार आहेत. त्यांनी आधी महाविकास आघाडी संपवली आणि आता एकनाथ शिंदे व अजित पवार यांचाही काटा काढला आहे," असा खळबळजनक दावा त्यांनी केला. अजित पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "अजितदादांनी नासके आणि पापी लोक सोबत ठेवले, म्हणूनच मराठा समाज त्यांच्यापासून दुरावला. पुण्यासारख्या ठिकाणी त्यांना जे अपयश मिळाले, ते केवळ मराठा मतदारांच्या नाराजीमुळेच मिळाले आहे."
निवडणुकांपासून अलिप्त राहण्याचा पवित्रा कायमनुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करताना जरांगे पाटील यांनी सांगितले की, "मराठा समाज दुरावल्याचा थेट फटका या निवडणुकीत बसला आहे." मात्र, आपण स्वतः निवडणुकीच्या राजकारणात पडणार नाही, हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. "मी विधानसभा, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकीत नव्हतो, आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीतही मी अलिप्तच राहणार आहे," असे त्यांनी जाहीर केले.
एकजुटीचा मंत्र आणि कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 'मराठा-दलित-मुस्लिम' या समीकरणाचा पुनरुच्चार केला. "हे तीन समाज एकत्र आले की सगळ्यांचा धुरळा उडतो," असे ते म्हणाले. तसेच, परळी तालुक्यातील कुणबी प्रमाणपत्रांच्या तक्रारींबाबत आपण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी ह.भ.प. विष्णू महाराज उखळीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाला उपस्थित राहून जरांगे पाटील यांनी अध्यात्मिक ऊर्जा घेतली आणि समाजाला एकजुटीने राहण्याचे आवाहन केले.
Web Summary : Manoj Jarange Patil accused BJP of political manipulation, ousting allies after using them. He criticized Ajit Pawar for associating with corrupt individuals, leading to electoral setbacks. Jarange emphasized Maratha-Dalit-Muslim unity and vowed to address Kunbi certificate issues, staying away from elections.
Web Summary : मनोज जरंगे पाटिल ने बीजेपी पर राजनीतिक हेरफेर का आरोप लगाया, सहयोगियों का इस्तेमाल करने के बाद उन्हें बाहर कर दिया। उन्होंने अजित पवार की भ्रष्ट व्यक्तियों के साथ जुड़ने के लिए आलोचना की, जिससे चुनावी झटके लगे। जरंगे ने मराठा-दलित-मुस्लिम एकता पर जोर दिया और कुनबी प्रमाण पत्र के मुद्दों को संबोधित करने का संकल्प लिया, चुनावों से दूर रहे।