शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

“तुम्हाला शेजारच्या घरी कोणी बोलावत नाही, आम्ही इतर राज्यात जातो तर पोटात का दुखते”: फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 17:30 IST

BJP DCM Devendra Fadnavis Beed: पुढच्या वेळेस अजित पवारांना सोबत घेऊन जाणार आहे. त्यामुळे आमच्या जागा आणखी वाढतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

BJP DCM Devendra Fadnavis Beed: पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला. तर काँग्रेसला छत्तीसगड आणि राजस्थान येथील सत्ता गमवावी लागली. काँग्रेसचे बीआरएसचे संस्थान खालसा करत तेलंगणमध्ये बाजी मारली. मात्र, महाराष्ट्रातील नेते, मंत्री दुसऱ्या राज्यात प्रचाराला जात असल्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. 

शासन आपल्या दारी कार्यक्रम परळी येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते पंकजा मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होते. विशेष म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या योजनांची माहिती देतानाच विरोधकांवर खोचक शब्दांत हल्लाबोल केला. 

कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही

येथे आल्यावर वैद्यनाथ आणि गोपीनाथ मुंडे अशा दोन नाथांचे दर्शन घेतले. गोपानाथ मुंडे यांच्या उर्जेमुळे आम्ही राजकारणात आहोत. बीडमधील १८ लाख शेतकऱ्यांना विमा मिळाला आहे. यासाठी धनंजय मुंडे यांनी प्रयत्न केले आहेत. अडचणीतील शेतकऱ्यांना सरकार मदत करेल. कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

आम्ही इतर राज्यात जातो तर पोटात का दुखते

आम्ही तिघे एकत्र आलो आहोत. आम्हाला राज्याचा विकास करायचा आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाला लागला. आम्ही जेथे गेलो तेथे चांगला निकाल लागला. आम्ही बाहेर गेल्यामुळे आमच्यावर टीका करतात. दुसऱ्या राज्यात कशाला प्रचाराला गेला म्हणतात. तुम्हाला कोणी शेजारच्या घरी बोलावते नाही, आम्ही इतर राज्यात जातोय तर तुमच्या पोटात का दुखते, असा खोचक सवाल करत, पुढच्या वेळेस अजित पवार यांना सोबत घेऊन जाणार आहे. त्यामुळे आमच्या जागा आणखी वाढतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत लवकरत केंद्र सरकारसोबत बैठक घेणार आहोत. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणण्यात आल्या आहेत. मराठवाड्याला आम्हाला दुष्काळमुक्त करायचे आहे. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देणार आहे. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत १० लाख महिलांना घर दिले जात आहे. आशा वर्कर्सच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली आहे. वैद्यनाथ विकास कामासाठी स्वत: पंतप्रधान मोदी यांच्याकडे जाऊन आराखडा मंजूर करुन आणणार आहे, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसState Governmentराज्य सरकारBJPभाजपा