शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

“तुम्हाला शेजारच्या घरी कोणी बोलावत नाही, आम्ही इतर राज्यात जातो तर पोटात का दुखते”: फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 17:30 IST

BJP DCM Devendra Fadnavis Beed: पुढच्या वेळेस अजित पवारांना सोबत घेऊन जाणार आहे. त्यामुळे आमच्या जागा आणखी वाढतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

BJP DCM Devendra Fadnavis Beed: पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला. तर काँग्रेसला छत्तीसगड आणि राजस्थान येथील सत्ता गमवावी लागली. काँग्रेसचे बीआरएसचे संस्थान खालसा करत तेलंगणमध्ये बाजी मारली. मात्र, महाराष्ट्रातील नेते, मंत्री दुसऱ्या राज्यात प्रचाराला जात असल्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. 

शासन आपल्या दारी कार्यक्रम परळी येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते पंकजा मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होते. विशेष म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या योजनांची माहिती देतानाच विरोधकांवर खोचक शब्दांत हल्लाबोल केला. 

कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही

येथे आल्यावर वैद्यनाथ आणि गोपीनाथ मुंडे अशा दोन नाथांचे दर्शन घेतले. गोपानाथ मुंडे यांच्या उर्जेमुळे आम्ही राजकारणात आहोत. बीडमधील १८ लाख शेतकऱ्यांना विमा मिळाला आहे. यासाठी धनंजय मुंडे यांनी प्रयत्न केले आहेत. अडचणीतील शेतकऱ्यांना सरकार मदत करेल. कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

आम्ही इतर राज्यात जातो तर पोटात का दुखते

आम्ही तिघे एकत्र आलो आहोत. आम्हाला राज्याचा विकास करायचा आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाला लागला. आम्ही जेथे गेलो तेथे चांगला निकाल लागला. आम्ही बाहेर गेल्यामुळे आमच्यावर टीका करतात. दुसऱ्या राज्यात कशाला प्रचाराला गेला म्हणतात. तुम्हाला कोणी शेजारच्या घरी बोलावते नाही, आम्ही इतर राज्यात जातोय तर तुमच्या पोटात का दुखते, असा खोचक सवाल करत, पुढच्या वेळेस अजित पवार यांना सोबत घेऊन जाणार आहे. त्यामुळे आमच्या जागा आणखी वाढतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत लवकरत केंद्र सरकारसोबत बैठक घेणार आहोत. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणण्यात आल्या आहेत. मराठवाड्याला आम्हाला दुष्काळमुक्त करायचे आहे. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देणार आहे. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत १० लाख महिलांना घर दिले जात आहे. आशा वर्कर्सच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली आहे. वैद्यनाथ विकास कामासाठी स्वत: पंतप्रधान मोदी यांच्याकडे जाऊन आराखडा मंजूर करुन आणणार आहे, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसState Governmentराज्य सरकारBJPभाजपा