शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणात न्यायालयीन समितीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 22:07 IST

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम एल ताहलियानी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

Santosh Deshmukh Case ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन समिती गठीत करण्यात आली आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश एम.एल.ताहलियानी ही एत सदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. ताहलियानी यांनी या आधी दहशतवादी कसाब खटल्यातील न्यायाधीश म्हणून काम केले आहे. 

तसेच सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम एल ताहलियानी परभणी हिंसाचारावेळी कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचाही तपास करणार आहेत. या दोन्ही समित्या पुढील सहा महिन्यात अहवाल देणार आहेत. 

हिवाळी अधिवेशनात या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीसह न्यायालयीन चौकशी करणार असल्याचेही सांगितले होते. दरम्यान, आता न्यायालयीन चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या चौकशी समितीचे मुख्यालय हे बीड मध्ये असणार आहे, या प्रकरणी चौकशी समितीला कोणाचीही चौकशी करण्याचा अधिकार असणार आहे. 

ताहलियानी यांनी मुंबई २६/११ बॉम्ब हल्ल्याच्या खटल्यात न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले आहे, तसेच प्रसिद्ध दिवंगत गायक आणि संगीतकार गुलशन कुमार यांच्या हत्येच्या खटल्यावेळीदेखील न्यायाधीश म्हणून होते. तहलियानी हे निवृत्त झाले आहेत, पण राज्य सरकारने त्यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी दिली आहे.

एसआयटीने कोर्टात मोठे दावे केले

पवनचक्की कंपनीला मागितलेल्या दोन कोटींच्या लाच प्रकरणात संशयीत आरोपी वाल्मीक कराड याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. काल कराड याच्याविरोधात मकोका गुन्हा दाखल केला, आता एसआयटीने कराड याचा सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणाचा तपास करण्यासाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आज एसआयटीने वाल्मीक कराड याला कोर्टासमोर आणले. यावेळी एसआयटीने वाल्मीक कराड याच्याबाबत सात मोठे दावे केले आहेत. यामुळे आता कराड याच्या अडचणी आणखी वाढू शकतात. 

वाल्मीक कराड याला आज एसआयटीने कोर्टात हजर केले.  यावेळी एसआयटीने कोर्टाला महत्वाची माहिती दिली, खंडणी प्रकरण आणि हत्याप्रकरणाची इंटरलिंक असल्याचे सांगितले. ही हत्या खंडणी प्रकरणामुळेच झाल्याचा दावा एसआयटीने न्यायालयात केला. पवनचक्की कंपनी अवादाकडून खंडणी मागण्यात अडथळा ठरल्या प्रकरणी ही हत्या केल्याचा दावा एसआयटीने केला. 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणPoliceपोलिसCourtन्यायालय