शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणात न्यायालयीन समितीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 22:07 IST

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम एल ताहलियानी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

Santosh Deshmukh Case ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन समिती गठीत करण्यात आली आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश एम.एल.ताहलियानी ही एत सदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. ताहलियानी यांनी या आधी दहशतवादी कसाब खटल्यातील न्यायाधीश म्हणून काम केले आहे. 

तसेच सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम एल ताहलियानी परभणी हिंसाचारावेळी कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचाही तपास करणार आहेत. या दोन्ही समित्या पुढील सहा महिन्यात अहवाल देणार आहेत. 

हिवाळी अधिवेशनात या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीसह न्यायालयीन चौकशी करणार असल्याचेही सांगितले होते. दरम्यान, आता न्यायालयीन चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या चौकशी समितीचे मुख्यालय हे बीड मध्ये असणार आहे, या प्रकरणी चौकशी समितीला कोणाचीही चौकशी करण्याचा अधिकार असणार आहे. 

ताहलियानी यांनी मुंबई २६/११ बॉम्ब हल्ल्याच्या खटल्यात न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले आहे, तसेच प्रसिद्ध दिवंगत गायक आणि संगीतकार गुलशन कुमार यांच्या हत्येच्या खटल्यावेळीदेखील न्यायाधीश म्हणून होते. तहलियानी हे निवृत्त झाले आहेत, पण राज्य सरकारने त्यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी दिली आहे.

एसआयटीने कोर्टात मोठे दावे केले

पवनचक्की कंपनीला मागितलेल्या दोन कोटींच्या लाच प्रकरणात संशयीत आरोपी वाल्मीक कराड याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. काल कराड याच्याविरोधात मकोका गुन्हा दाखल केला, आता एसआयटीने कराड याचा सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणाचा तपास करण्यासाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आज एसआयटीने वाल्मीक कराड याला कोर्टासमोर आणले. यावेळी एसआयटीने वाल्मीक कराड याच्याबाबत सात मोठे दावे केले आहेत. यामुळे आता कराड याच्या अडचणी आणखी वाढू शकतात. 

वाल्मीक कराड याला आज एसआयटीने कोर्टात हजर केले.  यावेळी एसआयटीने कोर्टाला महत्वाची माहिती दिली, खंडणी प्रकरण आणि हत्याप्रकरणाची इंटरलिंक असल्याचे सांगितले. ही हत्या खंडणी प्रकरणामुळेच झाल्याचा दावा एसआयटीने न्यायालयात केला. पवनचक्की कंपनी अवादाकडून खंडणी मागण्यात अडथळा ठरल्या प्रकरणी ही हत्या केल्याचा दावा एसआयटीने केला. 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणPoliceपोलिसCourtन्यायालय