शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

शेतकऱ्यांना नव्हे तर विमा कंपन्यांना पोसण्यासाठी बीडचे मॉडेल ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:22 IST

बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी बीड जिल्ह्यातील ...

बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी बीड जिल्ह्यातील पीक विमा मॉडेल राज्यभर राबवण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, हे मॉडेल शेतकऱ्यांना नव्हे, तर विमा कंपन्यांना पोसण्यासाठी आहे. शासनाला जमा होणारा पैसा हा जिल्ह्याच्या हक्काचा असून तो बीडमधील शेतकऱ्यांच्या विकासासाठी खर्च केला जावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनीने २०२० सालचा खरीप हंगाम विमा भरून घेतला. यामध्ये जवळपास १७ लाख ९० हजार शेतकऱ्यांचे ६० कोटी तसेच केंद्र व राज्य मिळून ७९८ कोटी रुपये भरणा केला होता. मात्र, त्यापैकी फक्त २० हजार ५३९ शेतकऱ्यांना १३ कोटी ४६ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. त्यामुळे मॉडेल २ नुसार कंपनीला २० टक्क्यांप्रमाणे जळपास १५९ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे, तर उर्वरित ६२५ कोटी रुपये शासनाकडे परत केले जाणार आहेत. मात्र, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाने संयुक्तपणे केले होते. त्यावेळी ४ लाख ३२ हजार शेतकरी बाधित असल्याचा अहवालात समोर आला होता. शासनाला परत केले जाणारे ६२५ कोटी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे असून, हा पैसा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजनेंतर्गत उपयोगात आणावा, अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया

सन २०२०-२१ सालाचे बीड जिल्ह्यात पीक विमा घेण्यास कृषी विमा कंपन्यांनी नकार दिला होता. त्यावेळी नुकतेच बीडचे पालकमंत्रीपद मिळालेल्या धनंजय मुंडे यांनी उद्धव ठाकरे सरकारकडून पीक विमा कंपनीला २० % खात्रीशीर नफा मिळवून देणारा करार केला. त्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनीने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा हप्ता भरून घेतला. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पातळीवर यामुळे कसलाही बदल होणार नाही. बीडसाठी लागू केलेल्या धोरणाने राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना किमान २०% नफ्याची खात्री दिली आहे. शेतकऱ्यांना मात्र, पीक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी पूर्वीचेच निकष कायम आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विमा रकमेपेक्षा कंपनीचा नफा राज्य सरकारला महत्त्वाचा वाटत आहे.

कालिदास आपेट, कार्याध्यक्ष, शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य.

...........................................

विमा मंजूर न करता कंपनीकडून २० टक्के नफा काढून घेत शासनाकडे ६२५ कोटी जमा केले जाणार आहे. हे पैसे शासनाकडे परत न करता या रकमेतून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी विशेष योजना राबवण्यात यावी, अन्यथा पैसे बीडचे शेतकरी भरणार आणि याचा वापर इतर जिल्ह्यांत होणार, असे करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होण्याची शक्यता असून, काही मंत्री आणि विमा कंपनीचे मिलीभगत असून, आम्ही याविरोधात सर्व शेतकरी संघटना शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत.

कुलदीप करपे, स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष जिल्हाध्यक्ष

..................

मागील वर्षापासून जवळपास १० हजार रुपये विविध पिकांच्या विम्यापोटी कंपनीत भरलेले आहेत. मात्र, दोन वर्षांपासून शासनाच्या अहवालानुसार नुकसान होऊनदेखील विमा देण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा टाकणारे हे बीड मॉडेल राज्यकर्ते आणि कंपनीच्या फायद्याचे असल्याचे दिसून येत आहे.

संजय शिंदे, शेतकरी, नेकनूर

===Photopath===

090621\09_2_bed_22_09062021_14.jpg

===Caption===

शेतकरी बीड