शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बीडकरांचे स्वप्न साकार झाले; आष्टी-नगर रेल्वेसेवेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्घाटन

By अनिल लगड | Updated: September 23, 2022 14:32 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवला आष्टी-नगर रेल्वेला हिरवा झेंडा

आष्टी ( बीड ): बीड जिल्हावासियांचे अनेक वर्षांचे रेल्वे सेवेचे स्वप्न अखेर आज साकार झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यू आष्टी-अहमदनगर रेल्वेसेवेस आज दुपारी हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन केले. 

आष्टी येथून सुटणाऱ्या पहिल्या डेमू पॅसेंजर ट्रेनला मुख्यमंत्री शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला. यासोबतच पहिल्या न्यू आष्टी ते अहमदनगर टप्प्यातील ६६ किलोमीटरची ब्रॉडगेज लाईन प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे. या मार्गावर सहा स्थानके आहेत. आठवड्यात रविवार सोडून सहा दिवस रेल्वे या मार्गावर धावेल.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बीडचे नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न आज साकार होतेय. आजचा दिवस आनंदाचा आहे. आज बीडमध्ये रेल्वे धावतेय. यात सर्वात जास्त पुढाकार मुंडे यांचा आहे. मागील पाच वर्षे मी सत्तेत असताना या कामाचा आढावा घेत होतो. आता आपले सरकार आहे. आता राज्य सरकार डबल इंजिनने काम करत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

यावेळी न्यू आष्टी रेल्वे स्थानकावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, सुजय विखे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, आ.सुरेश धस, भीमराव धोंडे, शिवाजी कर्डीले, आ.बाळासाहेब आजबे, आ. नमिता मुंदडा, आ.लक्ष्मण पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मान्यवरांची भाषणे स्व. गोपीनाथ मुंडे यांचा पहिला प्रश्न असायचा : रावसाहेब दानवेआज खूप आनंद झाला आहे. मराठवाडा, विदर्भ मागास भाग आहे. यासाठी फडणवीस यांनी मागे जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला. बीडच्या रेल्वेसाठी स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांचा पहिला प्रश्न असायचा. आता मार्च 2023 पर्यंत ही रेल्वे बीडला नेणार आहोत. तसेच वंदे भारत ट्रेनचे लातूर कारखान्यात काम चालू आहे, असेही दानवे म्हणाले 

गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकार - खा. प्रीतम मुंडेपाच दशके रेल्वेची वाट पहात होता. त्या रेल्वेचे स्वागत. स्व. गोपीनाथ मुंढे यांचे स्वप्न आज खऱ्या अर्थाने साकार झाले. महाविकास आघाडीने ४०० कोटी थकविले. आता या सराकरने २४२ कोटी दिले आहेत. यावरच भागणार नाही. ही रेल्वे आष्टीवरून परळी आणि मुंबईला गेली तरच बीड जिल्ह्याचा विकास होणार आहे, असेही खा. मुंडे म्हणाल्या. 

...म्हणून बीड जिल्हा शांत आहे: पंकजा मुंडे या प्रसंगी आज जो माणूस पाहिजे ते गोपीनाथ मुंढे साहेब रेल्वेचा झेंडा दाखवायला नाहीत. म्हणून आज बीड जिल्हा शांत आहे. ही रेल्वे जेंव्हा धडघडणार तेव्हा स्व. मुंडे यांचे नाव प्रत्येकाच्या ह्रदयात धडधडणार आहे. ही रेल्वे कोण्या एका पक्षाची नाही. पण खरे श्रेय पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे आहे.

फडणवीस, मुंडे भगिनींनी पाठपुरावा केला: राधाकृष्ण विखेस्व. मुंडे यांचे आज स्वप्न आज साकार होतेय. आज मुंडे साहेब असायला हवे होते. फडणवीस, मुंडे भगिनींनी पाठपुरावा केला. त्याला यश आले. नगरच्या विकासात बीडचा मोठा वाटा आहे. ही रेल्वे परळीपर्यंत जावी. पंतप्रधान मोदींचे सरकार जनतेच्या मनातील आहे. फडणवीस यांची मेहनत मोठी आहे. नगर- बीड पुन्हा जोडला जातोय.

रेल्वे मार्गाची थोडक्यात माहिती: २६१ किलोमीटर - अहमदनगर- बीड- परळी नवीन ब्रॉडगेज लाइन रेल्वेमार्ग६६ किलोमीटर - अहमदनगर- आष्टी रेल्वेमार्गाचे काम आतापर्यंत झाले१९५ किलोमीटर - अहमदनगर- आष्टी रेल्वेमार्गाचे काम होणे बाकी३५४ कोटी -- मंजूर झाले त्यावेळची प्रकल्पाची किंमत४८०५ कोटी- नवीन ब्रॉडगेज लाइन प्रकल्पाची अंदाजे किंमत५० टक्के वाटा- भारत सरकार५० टक्के वाटा- राज्य सरकार१७ मोठे पूल- या रेल्वेमार्गावर६३ लहान पूल- या रेल्वे मार्गावर आहेत.३४ रस्ते- पुलाखालील आहेत.१२ रस्ते - पुलावरील आहेत 

टॅग्स :BeedबीडEknath Shindeएकनाथ शिंदेraosaheb danveरावसाहेब दानवेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPankaja Mundeपंकजा मुंडे