शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

बीड जिल्हा परिषदेच्या सत्तेतून शिवसंग्राम पडणार बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:52 IST

जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत राहून काही उपयोग नाही. आमच्या लोकांना फूस लावून फक्त त्यांचंच भलं होत असेल तर अशा सत्तेत राहून उपयोग नसल्याने बीड जिल्हा परिषदच्या सत्तेमधून बाहेर पडण्याचा निर्णय आ.विनायक मेटे यांनी जाहीर केला.

ठळक मुद्देविनायक मेटेंनी जाहीर केला निर्णय : महायुतीत राहण्याबाबत ६ जानेवारीला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत राहून काही उपयोग नाही. आमच्या लोकांना फूस लावून फक्त त्यांचंच भलं होत असेल तर अशा सत्तेत राहून उपयोग नसल्याने बीडजिल्हा परिषदच्या सत्तेमधून बाहेर पडण्याचा निर्णय आ.विनायक मेटे यांनी जाहीर केला. तर महायुतीमध्ये राहण्याचा निर्णय ६ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे घेण्यात येणाऱ्या निर्धार मेळाव्यात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.शिवसंग्रामच्या राज्य कार्यकारणी मेळाव्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आ.मेटे यांनी ही माहिती दिली. यावेळी आ. भारती लव्हेकर, प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, प्रभाकर कोलंगडे, उदय आहेर, अविनाश खापे, जि.प.सदस्य अशोक लोढा, संदीप पाटील, दिलीप माने यांच्यासह इतर पदाधिकाºयांची उपस्थिती होती. यावेळी आ.मेटे म्हणाले स्व.गोपीनाथ मुंडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दामुळे शिवसंग्राम पक्ष महायुतीमध्ये सहभागी झाला होता. मात्र त्यावेळी दिलेली आश्वासने पाळण्यात आली नाहीत.इतर पक्षांप्रमाणे आम्हाला न्याय मिळाला नाही. तरीही आम्ही भाजपासोबत आहोत, तरी देखील दखल घेतली जात नसल्याने नाराज असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील काळात भाजपसोबत महायुतीत राहण्याविषयी निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन बीड जिल्हा परिषदमध्ये भाजपला पाठिंबा दिला होता. त्यावेळी देखील आम्ही केलेल्या मागणीप्रमाणे पदे मिळाली नाहीत, तसेच सदस्यांना योग्य वागणूक दिली जात नाही. अपमानित केले जाते.विकास निधीची योग्यरित्या वाटप होत नाही. अपेक्षाभंग झाल्याचे सांगून मेटे म्हणाले, हे वागणं म्हणजे भाजपचे मैत्रीचे लक्षण दिसत नाहीत. त्यामुळे जि. प. च्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय शिवसंग्राम प्रदेशाध्यक्षांनी घेतल्याचे मेटे म्हणाले. दरम्यान या निर्णयानंतर मात्र राजकीय समीकरणांवर चर्चा सुरु झाली.पंकजा मुंडेंनी भेट टाळलीजिल्हापरिषदेच्या मुद्द्यावर पत्रपरिषदेत आ. मेटे म्हणाले, पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी शिवसंग्रामच्या सर्व सदस्यांना मुंबईत बोलावले होते. त्यानंतर जि.प. च्या विषयावर बोलण्यासाठी वेळ देखील ठरली होती मात्र, पंकजा मुंडे यांनी भेट घेणे टाळल्याचा आरोप आ.मेटे यांनी यावेळी केला.मेळाव्यात मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठरावशिवसंग्रामच्या राज्य कार्यकारणी मेळाव्यात विविध ठराव घेण्यात आले. यामध्ये यावेळी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मराठा आरक्षण न्यायालयामध्ये टिकवण्याचे काम सर्वस्वी राज्य सरकारचे आहे. तसेच शेतकरी निवृत्ती, बेरोजगार, नदीजोड तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात ठराव घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा देखील ठराव यावेळी मांडण्यात आला. अभिनंदनाच्या ठरावाबाबत मेटे यांना ही दुट्टपी भूमिका नाही का असे पत्रकारपरिषदेत विचारले असता, घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करणे चुकीचे नसल्याचे मेटे म्हणाले.काय होईल याचा परिणाम ?बीड जिल्हा परिषदमध्ये आ. विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाचे ४ सदस्य निवडून आलेले आहेत.त्यापैकी जि. प. उपाध्यक्षा जयश्री मस्के या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपसोबतच राहतील.त्यामुळे तीन सदस्यांनी पाठिंबा काढून घेतला तरी देखील ३१ इतके संख्याबळ भाजपकडे राहणार आहे.प्रसंग पडला तर इतर राजकीय पक्षांचे गट सोबत घेऊन जिल्हा परिषदेत नवे समीकरण भाजप तयार करु शकते.मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर होणाºया निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषदVinayak Meteविनायक मेटे