शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

बीड, परळी देशाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:28 IST

पूर्वीपासूनच बीड जिल्हा आणि परळी हे देशाच्या राजकारणाचे केंद्र बिंदू ठरले आहेत. कोणत्याही गोष्टीचा शुभारंभ मोठं मोठे नेते येथूनच करतात कारण हा जिल्हा सर्व सामान्य जनतेचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आहे. शेतकऱ्यांनी पशुपालनाचा व्यवसाय जोडधंदा म्हणून केल्यास तो अधिक फायदेशीर ठरेल असे मत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपंकजा मुंडे : संगणकीकृत पशुगणनेचा परळीत राज्यस्तरीय शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : पूर्वीपासूनच बीड जिल्हा आणि परळी हे देशाच्या राजकारणाचे केंद्र बिंदू ठरले आहेत. कोणत्याही गोष्टीचा शुभारंभ मोठं मोठे नेते येथूनच करतात कारण हा जिल्हा सर्व सामान्य जनतेचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आहे. शेतकऱ्यांनी पशुपालनाचा व्यवसाय जोडधंदा म्हणून केल्यास तो अधिक फायदेशीर ठरेल असे मत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रथमच संगणकीकृत विसाव्या पशूगणनेचा प्रारंभ पंकजा मुंडे यांच्या हस्ते रविवारी झाला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर तर प्रमुख पाहूणे म्हणून आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप, सह आयुक्त डॉ. सुनील राऊतमारे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पशु संवर्धन अधिकारी संतोष पालवे उपस्थित होते.पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्यस्तरीय संगणकीकृत पशुगणनेचा शुभारंभ परळीतून होत आहे. यामुळे आपल्याकडील पशुधन, त्यांना असणारे आजार आपल्याला माहित होतील व त्यावर उपाय शोधणे सोपे होईल. एखादी योजना करता येणार आहे. यासाठी आपल्या कडील पशुधनाची नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले. येत्या काळात पशुसंवर्धन आणि ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून चांगली संयुक्त योजना राबविण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.महादेव जानकर म्हणाले, पशुपालकांनी गणना करून घेणे आवश्यक आहे. येत्या काळात मुख्यमंत्री पशुपालक योजना कार्यान्वित होणार आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय संगणकीकृत पशुगणनेचा कार्यक्रम आम्ही परळीत घ्यायचा ठरवला आहे. परळी हे राज्यात अनेक गोष्टींचे केंद्र झाले आहे, तसे भविष्यातील देशाच्या खूप मोठ्या लोकनेत्यांचेही ते केंद्र असणार आहे, असेही जानकर यांनी सांगितले.प्रारंभी गोमातेची पूजा करण्यात आली. धारूर येथील राज्यातील पहिल्या शेळी पालक उत्पादक कंपनीचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. प्रास्तविक पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप यांनी केले.

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेPoliticsराजकारण