शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बीड, परळी देशाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:28 IST

पूर्वीपासूनच बीड जिल्हा आणि परळी हे देशाच्या राजकारणाचे केंद्र बिंदू ठरले आहेत. कोणत्याही गोष्टीचा शुभारंभ मोठं मोठे नेते येथूनच करतात कारण हा जिल्हा सर्व सामान्य जनतेचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आहे. शेतकऱ्यांनी पशुपालनाचा व्यवसाय जोडधंदा म्हणून केल्यास तो अधिक फायदेशीर ठरेल असे मत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपंकजा मुंडे : संगणकीकृत पशुगणनेचा परळीत राज्यस्तरीय शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : पूर्वीपासूनच बीड जिल्हा आणि परळी हे देशाच्या राजकारणाचे केंद्र बिंदू ठरले आहेत. कोणत्याही गोष्टीचा शुभारंभ मोठं मोठे नेते येथूनच करतात कारण हा जिल्हा सर्व सामान्य जनतेचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आहे. शेतकऱ्यांनी पशुपालनाचा व्यवसाय जोडधंदा म्हणून केल्यास तो अधिक फायदेशीर ठरेल असे मत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रथमच संगणकीकृत विसाव्या पशूगणनेचा प्रारंभ पंकजा मुंडे यांच्या हस्ते रविवारी झाला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर तर प्रमुख पाहूणे म्हणून आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप, सह आयुक्त डॉ. सुनील राऊतमारे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पशु संवर्धन अधिकारी संतोष पालवे उपस्थित होते.पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्यस्तरीय संगणकीकृत पशुगणनेचा शुभारंभ परळीतून होत आहे. यामुळे आपल्याकडील पशुधन, त्यांना असणारे आजार आपल्याला माहित होतील व त्यावर उपाय शोधणे सोपे होईल. एखादी योजना करता येणार आहे. यासाठी आपल्या कडील पशुधनाची नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले. येत्या काळात पशुसंवर्धन आणि ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून चांगली संयुक्त योजना राबविण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.महादेव जानकर म्हणाले, पशुपालकांनी गणना करून घेणे आवश्यक आहे. येत्या काळात मुख्यमंत्री पशुपालक योजना कार्यान्वित होणार आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय संगणकीकृत पशुगणनेचा कार्यक्रम आम्ही परळीत घ्यायचा ठरवला आहे. परळी हे राज्यात अनेक गोष्टींचे केंद्र झाले आहे, तसे भविष्यातील देशाच्या खूप मोठ्या लोकनेत्यांचेही ते केंद्र असणार आहे, असेही जानकर यांनी सांगितले.प्रारंभी गोमातेची पूजा करण्यात आली. धारूर येथील राज्यातील पहिल्या शेळी पालक उत्पादक कंपनीचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. प्रास्तविक पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप यांनी केले.

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेPoliticsराजकारण