शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बीड नगर परिषदेचा २८६ कोटींचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:58 AM

कोणतीही करवाढ न करता २०१८-१९ या वर्षाकरीता शहर विकासासाठी २८६ कोटींचा अर्थसंकल्प नगरपालिकेत बहुमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचा विचार या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कोणतीही करवाढ न करता २०१८-१९ या वर्षाकरीता शहर विकासासाठी २८६ कोटींचा अर्थसंकल्प नगरपालिकेत बहुमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचा विचार या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.

शहरातील समस्या ‘आ’ वासून नागरिकांपुढे उभ्या आहेत. सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा, परिसरांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, रस्ते व शहरातील रसत्यांवरील खड्डे, विद्युत पुरवठा, शाळा, सिग्नलची व शहरातील उद्यानांची झालेली दुरवस्था व इतर अनेक मूलभूत गरजा आहेत. यासाठी भरीव तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचेही डॉ.क्षीरगसार म्हणाले.

मागच्या वर्षी नगरपालिकेकडून ८६ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. या तुलनेत यावर्षीचा अर्थसंकल्पाची रक्कम १९७ कोटी रूपयांनी जास्त म्हणजे २८६ कोटी इतकी आहे. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते काँक्रिटीकरण, भूमिगत गटार योजना, शहरातील उद्यानांचे सुशोभिकरण, पथदिवे तसेच कचरा व्यवस्थापन या पायाभूत योजनांचा समावेश या अर्थसंकल्पात असल्याचेही डॉ.क्षीरसागर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, कोणतीही करवाढ नसल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र शहराचा गाडा हाकण्यासाठी कर भरण्याचे आवाहन न.प.कडून करण्यात आले आहे. बांधकाम परवानगीसाठी आॅनलाईन सुविधा केल्यामुळे नागरिकांची सोय झाली आहे. याचबरोबर शहरातील नवीन ४० हजार स्थावर संपत्तींची नोंद नगरपालिकेकडे नव्हती ती करण्यात आल्यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ झाल्याचेही क्षीसागर यांनी पत्रकार परिषेदेत स्पष्ट केले. यावेळी त्यांनी इतर मुद्यांवरही चर्चा केली.

यावेळी सभापती मुखीद लाला, विकास जोगदंड, गटनेते सादेक उज्जमा, विनोद मुळूक, भीमराव वाघचौरे, नरसिंग नाईकवाडे, गुरखुदे, गणेश वाघमारे, विनित काळे आदी उपस्थित होते.दरम्यान, यावर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील सर्व योजना मंजुर होतील व सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील, असे अश्वासनही शेवटी डॉ.क्षीरसागर यांनी दिले.

नगरापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष हे शहर विकासाच्या विरोधात आहे, त्यांच्याकडून वैयक्तिक विरोधासाठी शहराच्या विकास कामांमध्ये अडवणूक करण्यात येत आहे. विरोधी पक्षाला लोकशाही मूल्य काय असतात, हे माहिती नाही. विकास कामांमध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही.यापूर्वी देखील नगरपालिकेमध्ये शिवसेना - भाजप हे विरोधीपक्ष होते, मात्र त्यांनी विकास कामाला कधी विरोध केला नाही. विकासाच्या बाजूने कोण आहे, हे जनतेला माहिती आहे, असे सांगून त्यांनी विविध मुद्यांवरून काकू-नाना आघाडीवर अप्रत्यक्ष आरोप डॉ. क्षीरसागर यांनी केला.

पाणीपुरवठाशहरातील पाणीपुरवठा सुरळीत व नियमीत करण्यासाठी अमृत अभियान योजनेंतर्गंत ११४ कोटींची तरतूद आहे.उद्यानेखासबाग, यशंवत उद्यान, धांडे नगर, मोमीनपूरा व इतर ठिकाणच्या उद्यान निर्मीतीसाठी २.९४ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

भुयारी गटार योजनायावर्षी पहिल्या टप्प्यात भूमिगत गटार योजनेसाठी १६५.८० कोटी तर दुसºया टप्प्यातील योजनेसाठी ८३.१४ इतकी तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नगरापालिकेचा वाटा २५ टक्के असणार आहे.

विद्युत विभागशहरात १६०० विद्युत खांब व गरजेनूसार रोहित्र उभारण्यात येणार आहेत. शहरात एलईडी पथदिवे बसवण्यात येणार आहेत.

स्वच्छता विभागशहरातील कचरा व्यवस्थापन करण्यासाठी नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या धरतीवर प्रत्येक प्रभागात हे राबवण्यात येणार आहे. याद्वारे विजेत्या प्रभागाला अनुक्रमे १०, ५ आणि ३ लाख रूपयांचे बक्षीस मिळणार आहे. भाजीमंडई आणि प्रमुख चौकांमध्ये ५० मीटर अंतरावर डस्टबीन ठेवण्यात आल्या आहेत. शहरातील मलेरिया विभागासाठी धूर फवारणीकरिता नवीन माऊंटेड मशीन खरेदी करण्यात आली असून, याद्वारे धूर फवारणी करण्यात येणार आहे.

पालिकेतील राजकारणामुळे विकासाला खिळपालिकेची निवडणूक झाल्यापासून ते आजपर्यंत बीड पालिकेत राजकारण सुरू आहे. काका-पुतण्याचा वाद बीड शहरातील नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असल्याच्या भावना नागरिकांमधून व्यक्त होत होत्या. तसेच इतर पक्षांनीही या काका-पुतण्यावर कडाडून टिका केली होती. या दोघांच्या राजकारणामुळेच शहराच्या विकासाला खिळ बसल्याचा आरोपही केला जात होता, परंतु ते खोडून काढण्याचे आव्हान आता नगराध्यक्षांपुढे असणार आहे.