शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

परराज्यातील धान्यावरच बीडच्या मोंढ्याची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:01 IST

मागील वर्षीचे खरीप आणि रबी दोन्ही हंगाम पूरेशा पावसाअभावी वाया गेल्याने जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट जुलै उजाडल्यानंतरही दूर झालेले नाही. अशा परिस्थितीत गहू, ज्वारी आणि बाजरी या धान्याची परराज्यातून आवक होत आहे.

ठळक मुद्देस्थानिक आवक नगण्य : महिन्याला ४०० टन गव्हाची आवक

बीड : मागील वर्षीचे खरीप आणि रबी दोन्ही हंगाम पूरेशा पावसाअभावी वाया गेल्याने जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट जुलै उजाडल्यानंतरही दूर झालेले नाही. अशा परिस्थितीत गहू, ज्वारी आणि बाजरी या धान्याची परराज्यातून आवक होत आहे. आठवड्याला जवळपास जवळपास ६०० टन धान्य येथील मोंढा व किराणा बाजारात येत असून त्यावरच येथील उलाढाल कमी- अधिक प्रमाणात सुरु आहे.दुष्काळजन्य स्थितीमुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्यांची आवक कमी होत राहिली. पेरणी हंगामात शेती मशागतीसह बियाणे, खते खरेदीसाठी पैशांची तजवीज करावी लागते. त्यामुळे शेतकरी अधिकचे राखून ठेवलेले धान्य विक्रीला आणतात. त्यामुळे आवकही वाढलेली असते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. परंतू यंदा दोन्ही हंगामात निसर्गाची साथ मिळाली नाही. पहिल्या वेचणीतच कापूस संपला. तूर, हरभरा, सोयाबीन शासनाला तसेच बाजारात विकला. ज्वारी आणि बाजरीचा पेरा कमी असल्याने उत्पादनातही घट झाली. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना बाजारातून धान्य खरेदी करावे लागले. परिणामी सध्या बाजार समितीत स्थानिक धान्याची आवक नगण्य आहे. त्यामुळे स्टॉकिस्ट, आडत व्यापाऱ्यांनी परराज्यातील व्यापाºयांशी सौदे करुन धान्याचे व्यवहार केले. येथील मोंढ्यात ज्वारी, बाजरी आणि गहू परराज्यातून आवक होत आहे. ज्वारीची स्थानिक आवक फारशी नसल्याने कर्नाटक तसेच सोलापूर, बार्शी भागातून आयात होत आहे. कर्नाटक दुर्री ज्वारीचा २५ ते ४० रुपयांपर्यंत दर्जानुसार भाव आहे. राजस्थानच्या अलवर, दौसा, जयपूर भागातून तसेच उत्तर प्रदेश आणि गुजरात - महाराष्टÑ सीमावर्ती भागातून बाजरीची आवक होत आहे. २१५० ते २३०० रुपये क्विंटल भाव आहेत. मध्यंतरी उन्हाळ्यामुळे ग्राहकी कमी होती, मात्र वातावरणात थंडावा निर्माण होताच मागणी वाढण्याची शक्यता आहे. आठवड्याला ५० ते ६० टन बाजरीची आवक असल्याचे व्यापारी म्हणाले. बीड जिल्ह्यात मध्यप्रदेशातून गव्हाची आवक होत आहे. विविध नावाने ३० किलोचे सीलबंद कट्टे विक्रीस आहेत. साधारण प्रतीच्या गव्हाला २३००, मध्यम प्रतीचा गहू २६०० ते २७०० रुपये प्रती क्विंटल आहे. आठवड्यातून ४० ते ५० टन गव्हाची आवक येथील मोंढ्यात होत आहे. यात सिहोर मंडीतील दर्जेदार गहू ३८ ते ४० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. सोयाबीनची आवकही १५ दिवसात केवळ १०० क्विंटलच झाली. शेतकºयांकडे मालच नाही, स्टॉकिस्टच वेळप्रसंगी विक्रीस काढत आहेत. तूरची आठवड्याला ५० ते १०० क्विंटल आवक होत आहे. जुना हरभरा ३९०० ते ४३०० रुपये दराने विकला गेला. यामुळे बाजारात दरररोज शुकशुकाट असतो. खरेदी- विक्री होत नसल्याने उलाढालीवर परिणाम झाला आहे. यातच हमाल, चाळणा कामागरांना एखादी गाडी बाजारात आली तरच मोलमजुरी मिळते. स्थानिक आवक नसल्याने परराज्यातील धान्यावरच सध्या मोंढा बाजाराची मदार आहे.

टॅग्स :Beedबीडmarket yardमार्केट यार्डAgriculture Sectorशेती क्षेत्र