शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागला; या गावात चार दिवसांपासून चुलच पेटली नाही !

By सोमनाथ खताळ | Updated: June 8, 2024 18:07 IST

पंकजाताई आमच्या देव आहेत. त्यांचा झालेला पराभव आमच्या जिव्हारी लागला असल्याने व आता त्यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशी आम्हा ग्रामस्थांची मागणी असल्याचे येथील हरिदास गिते यांनी सांगितले.

कडा : आष्टी शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या पांगुळगव्हाण गावातील लोकांनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना एकगठ्ठा मतदान केले. परंतु त्यांचा पराभव झाल्याने चार दिवसांपासून गावकऱ्यांनी अन्नत्याग केला असून गावात चूलदेखील पेटली नाही.आष्टी तालुक्यातील पांगुळगव्हाण या गावची लोकसंख्या १२०० च्या घरात आहे तर मतदान १००० इतके आहे. गावाने पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत ९२६ एवढे मतदान केले.

विशेष म्हणजे या गावात इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला एकही मतदान झाले नाही; पण एवढी निष्ठा ठेवून मेहनत घेत गावाने एकगठ्ठा मतदान करूनदेखील निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यामुळे या गावातील महिला, पुरुष, लेकराबाळांसह चार दिवसांपासून गावातील एकाही घरात चूल पेटवली नसल्याने उपाशीपोटी बसले आहेत. ताईचे राजकारणात पुनर्वसन झाल्याशिवाय गावात चूल पेटणार नसल्याचे नागरिक सांगत आहेत.

पंकजाताई आमच्या देव आहेत. त्यांचा झालेला पराभव आमच्या जिव्हारी लागला असल्याने व आता त्यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशी आम्हा ग्रामस्थांची मागणी असल्याचे येथील हरिदास गिते यांनी सांगितले.

आमची मुंडे कुटुंबावर निष्ठा आहे. पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव हा जिव्हारी लागला असून वरिष्ठ नेत्यांनी नियोजन करून ताईंना केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशी आमची मागणी असून शुक्रवारी गावातील मंदिरात लोकांनी अन्नत्याग आंदोलन केल्याचे गावचे सरपंच तुकाराम गिते यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४