शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

बीड जिल्ह्यास अवकाळीचा फटका पण टंचाईतून सुटका; चार दिवसात १६.५ मिमी पाऊस

By अनिल लगड | Updated: April 13, 2024 13:13 IST

अवकाळी पावसामुळे मागील पंधरवड्यात वाढलेला उष्णतेचा पारा काहीसा कमी झाला.

बीड : तापमानाचा पारा चाळीशीच्या पुढे तीव्र होत असताना मागील चार दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे दिलासा मिळाला. या पावसामुळे उन्हाळी ज्वारी, बाजरी तसेच भाजी पिकांचे नुकसान झाले. असे असलेतरी काही प्रमाणात चारा, पाण्याच्या टंचाईतून सुटका होणार आहे. जिल्ह्यात चार दिवसात सरासरी १६.५ मिमी पावसाची नोंद प्रशासनाकडे झाली. 

गुरूवारी जिल्ह्यातील धारुर, वडवणी व गेवराई तालुक्यात गारा बसरल्या. यामुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.धारूर तालुक्यातील सोनीमोहा, अंबेवडगाव, चौंडी, धुनकवड परीसरात मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले तर धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील लेंडी नदीला पूर आला.तर दुसरीकडे गेवराई तालुक्यातील फळबागांना फटका बसला. वीज कोसळून एक महिला ठार झाली तर एक मुलगा जखमी झाला. परळी तालुक्यात मागील चार दिवसात गाय, बैल, म्हैस पशुधन वीज पडल्याने दगावले. गुरूवार आणि शुक्रवारी अंबाजोगाई तालुक्यातही अवकाळीमुळे शेती पिकांसह फळबागांचे नुकसान झाले.

असा झाला चार दिवसात पाऊसतालुका- एकूण पाऊस (सरासरी मिमी)बीड - १२.२पाटोदा- ६.९आष्टी- २.६गेवराई- १४.१माजलगाव- १६.२अंबाजोगाई - २९.२केज- १४.४परळी- ४०.२धारूर- ४५.६वडवणी- १५.४शिरूर कासार- १.०एकूण सरासरी - १६.५ मिमी.

चारा- पाण्याची तात्पुरती सोयअवकाळी पावसामुळे मागील पंधरवड्यात वाढलेला उष्णतेचा पारा काहीसा कमी झाला. या पावसामुळे धारूर, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच येत्या काही दिवसात उगवण होणाऱ्या चाऱ्याची सोय होणार आहे. परंतू ही सोय काही दिवसांपुरतेच राहील असा अंदाज आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीBeedबीडRainपाऊस