शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

बीड जिल्ह्यात करोडोंचा गंडा घालणारे मोकाटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 01:17 IST

बीड : जादा व्याजदराचे आमिष दाखवून करोडो रूपयांचा गंडा घालणाऱ्या माजलगावच्या परिवर्तन आणि कळंबच्या शुभकल्याण मल्टीस्टेवर जिल्हाभर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप यातील एकाही आरोपीला शोधण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलेले नाही. यावरून या मल्टीस्टेटच्या संचालक मंडळाला ‘अर्थ’पूर्ण सहकार्य केले जात असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून ...

ठळक मुद्देशुभकल्याण व परिवर्तन मल्टीस्टचे संचालक मंडळ सापडेना

बीड : जादा व्याजदराचे आमिष दाखवून करोडो रूपयांचा गंडा घालणाऱ्या माजलगावच्या परिवर्तन आणि कळंबच्या शुभकल्याण मल्टीस्टेवर जिल्हाभर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप यातील एकाही आरोपीला शोधण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलेले नाही. यावरून या मल्टीस्टेटच्या संचालक मंडळाला ‘अर्थ’पूर्ण सहकार्य केले जात असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील वरपगाव येथे शुभकल्याण मल्टीस्टेटची मुख्य शाखा आहे. दिलीप आपेट हे त्याचे अध्यक्ष. जिल्ह्यातील शेकडो ठेवीदारांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून मोठी गुंतवणूक करुन घेतली. त्यानंतर अध्यक्षांसह संचालक मंडळाने धूम ठोकली. ठेवीदारांनी संबंधित शाखांकडे विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. शेवटी संतप्त ठेवीदारांनी पोलीस ठाणे गाठून अध्यक्षासह संचालक मंडळाविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली. आतापर्यंत बीडसह अंबाजोगाई, केज, नेकनूर, माजलगाव, परळी, गेवराई, वडवणी, आष्टी, धारुर येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

यामध्ये दिलीप आपेटसह भास्कर शिंदे, अजय आपेट, नागिनी शिंदे, विजय आपेट, कमलाबाई नखाते, शालिनी आपेट, अभिजित आपेट, प्रतिभा आंधळे, आशा बिरादार, बाबूराव सोनकांबळे या संचालकांसह शाखाधिकारी व इतर कर्मचाºयांचा आरोपींत समावेश आहे.

अशीच काहीशी परिस्थिती माजलगाव येथील परिवर्तन मल्टीस्टेटची आहे. भारत मरिबा अलझेंडे याने ही शाखा मल्टीस्टेट उभारली. बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी शाखा उभारून नागरिकांना जादा व्याजदराचे आमिष दाखविले. परंतु रक्कम परत मिळत नसल्याने गुंतवणुकदार मेटाकुटीस आले होते. अखेर माजलगाव येथील ठेवीदारांनी पोलीस ठाणे गाठून मल्टीस्टेटविरोधात फिर्याद दिली.

त्याप्रमाणे मल्टीस्टेटचा अध्यक्ष भारत अलझेंडे, उपाध्यक्ष संजय बाबुलालजी शर्मा यांच्यासह ज्योती टाकणखार, शेख फरीदा सुलताना शेख मजहर, सुशिला अलझेंडे, शुभांगी लोखंडे, उद्धव जाधव, अर्जून होके, शहाजी शिंंदे, अनिता प्रधान, विनोदकुमार जाजू, धर्मराज भिसे, सुरेखा खडके या संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात परिवर्तनविरोधात गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरू झाली.हक्काचा अधिकारी नसल्याने अडचणआर्थिक गुन्हे शाखेकडे सद्यस्थितीत जवळपास २२ तपास आहेत. गुन्ह्यांची संख्या पाहता आणि तपासाची किचकट प्रक्रिया पाहता येथे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यातच गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक भारत गाडे हे अनेक महिन्यांपासून रजेवर आहेत. काही काळ सपोनि मारूती शेळके यांनी ही शाखा सांभाळली. परंतु त्यांना याचा तपास लावण्यात अपयश आले. आता पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदेसह एक सपोनि व पोलीस उपनिरीक्षक या शाखेत नव्याने रूजू झाले आहेत. त्यांना या गुन्ह्यांचा अभ्यास करून तात्काळ तपास पूर्ण करण्याचे आव्हान आहे.

ठेवीदारांमध्ये पोलिसांबद्दल संतापगुन्हे दाखल होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी पोलिसांकडून अद्याप समाधानकारक तपास करण्यात आलेला नाही. त्यामुळे ठेवीदांरामधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.४संचालक मंडळाला पोलीस पाठिशी घालत असल्याचा अरोपही काही ठेविदारांनी केल्याचे सूत्रांकडून समजते. तसेच अनेकवेळा ठेवीदार पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना भेटलेही आहेत. परंतु याचा काहीच फायदा झाला नसून तपास पुढे सरकलेला नाही.

संचालकांना पाठबळसुतावरून स्वर्ग गाठणाºया पोलिसांना अद्याप या दोन्ही मल्टीस्टेटमधील एकाही संचालकाला अटक करण्यात यश आलेले नाही. आर्थिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन अधिकाºयांकडून त्यांना पाठबळ मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. जर असे नाही तर एवढ्या दिवस आरोपींना अटक का केली नाही, असा सवालही ठेवीदारांनी केला आहे.

टॅग्स :BeedबीडCrimeगुन्हाMarathwadaमराठवाडा