शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

वाल्मीक कराडची बी टीम अ‍ॅक्टिव्ह, पोलिसांनी चौकशी केली नाही; धनंजय देशमुखांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 09:18 IST

Beed Crime News : पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मीक कराड याला सीआयडीने अटक केली आहे.

Beed Crime News ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन दोन महिने उलटून गेले आहेत. पण अजूनही मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. दरम्यान, आता धनंजय देशमुख यांनी बीड पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. आरोपींची बी टीम बीडमध्ये अजूनही सक्रिय असल्याचा आरोप देशमुख ( Santosh Deshmukh ) यांनी केला.  पोलिसांकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही केला आहे.  'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये धनंजय देशमुख यांनी आरोप केले.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये आरोपींना मदत करणाऱ्यांना अजूनही पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही. त्यांच्याबाबत पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. 

"भारत तटस्थ नाही, आम्ही...!" ट्रम्प यांच्यासमोर रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर PM मोदी स्पष्टच बोलले

"ज्या ठिकाणी गुन्हे घडतात त्या ठिकाणी थांबवणे हे महत्वाचे आहे. माझ्या भावाची हत्या झाली. त्यामध्ये एक बी टीमही आहे, त्याची अजूनही चौकशी झालेली नाही.  याचा आम्ही पुन्हा तपास करणार आहे. या बी टीमकडून भविष्यात कुणालाही त्रास होऊ नये म्हणून प्रयत्न करणार आहे, असंही धनंजय देशमुख म्हणाले.

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता पर्यंत मुख्य चार आरोपींना अटक केली आहे. आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा सांगळे यांच्यासह अन्य आरोपींना पळून जाण्यासाडी गाडी आणि पैसे ा बी टीमने पुरवले आहेत असा आरोप करण्यात आला आहे. पण, त्यांच्यावर अजूनही कारवाई केली नसल्याचा आरोपही देशमुख यांनी केला. याबाबत पोलिसांकडे सर्व पाठपुरावा केला असल्याचेही देशमुख म्हणाले. 

महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी ५ सदस्यीय पथकाची नेमणूक

महादेव मुंडे हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नीने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची मागणी केली होती, याबाबत आता बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे.  या प्रकरणाच्या तापासासाठी पाच सदस्यीय पथकाची नेमणूक केली आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही दिवसापूर्वी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये त्यांनी एसआयटी किंवा सीआयडीची मागणी केली होती. 

महादेव मुंडे यांचा परळी तहसीला कार्यालयासमोर खून झाला होता. या हत्येला आता १५ महिने उलटले आहेत. पण, अजूनही आरोपी मोकाटच आहेत. या प्रकरणी आरोपींच्या अटकेच्या अनेकवेळा मागणी केली होती, पण पोलिसांनी कारवाई केली नव्हती. पण, आता जिल्हा पोलीस अधिक्षकांची बदली झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी पाच सदस्यीय पथकाची नेमणूक केली आहे. यामुळे आता या प्रकरणाच्या तापासाला गती येणार असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणPoliceपोलिस