शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Beed: कलेक्टर साहेब, शस्त्र परवान्याबाबत हा दुजाभाव का? कोणाचा निलंबित तर कोणाचा रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 19:29 IST

राजकीय नेत्यांना पळवाट : उपमुख्यमंत्र्यांसमोर सांगितले ३४० परवाने रद्द

बीड : मयत, वयोवृद्ध अशा लोकांचे शस्त्र परवाना रद्द करण्यात आले आहेत. तसेच गुन्हे दाखल असलेल्या काही लोकांचेही रद्द केले. परंतु, मोजक्या काही राजकीय नेत्यांचे परवाने रद्दऐवजी निलंबित करून त्यांना पळवाट देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मात्र प्रशासनाने रद्द केल्याचा दावा केला, तो पवार यांनी माध्यमांना सांगितले. परंतु, जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी हे परवाने रद्द करताना दुजाभाव केल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी वादात सापडण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील १२८१ लोकांकडे शस्त्र परवाना होता. काही लोक जिल्ह्याबाहेर वास्तव्यास होते तर काही लोक मयत असतानाही त्यांच्या नावावर परवाना होता. काही लोकांवर गुन्हे दाखल असतानाही त्यांच्याकडे शस्त्र परवाना असल्याचे समोर आले होते. पोलिस अधीक्षकांनी याची यादी तयार करून ती जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवली. त्यानंतर त्यांनी नोटीस बजावल्या. त्याप्रमाणे आतापर्यंत ३४० शस्त्र परवाने रद्द, निलंबित, सरेंडर करण्यात आले आहेत. परंतु, शस्त्र परवान्याबाबत कारवाया करताना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी काही लोकांना पळवाट दिल्याचे समोर आले आहे. काही लोकांवर गुन्हे दाखल असतानाही त्यांचे परवाने रद्द केले, तर काही लोकांचे केवळ निलंबित करण्यात आले आहेत. भविष्यात अर्ज करून ते नियमित करता येऊ शकतात, असे एका अधिकाऱ्याने खासगीत सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी ही पळवाट का काढली? असा प्रश्न आहे.

निलंबित, रद्दचे नियम काय?गुन्हा दाखल असलेल्या काही लोकांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. परंतु, अशाच प्रकारे काहींचे निलंबित करण्यात आले आहेत. ३४० मधील ६५ लोकांचा यात समावेश आहे. परंतु, जिल्हाधिकारी पाठक यांनी निलंबित आणि रद्द यांच्याबाबतीत नियम काय लावले? हे मात्र समजू शकले नाही. जिल्हाधिकारी अविनाश पाठक, आरडीसी शिवशंकर स्वामी यांच्याशी संपर्क केला, परंतु दोघांचेही फोन बंद होते, त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही.

सहकार, सामाजिक, राजकीय लोकांचा समावेशजे ६५ परवाने निलंबित केले आहेत, अशांमध्ये राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सहकार क्षेत्रातील व्यक्ती आदींचा समावेश आहे. हे धनदांडगे असल्यानेच त्यांना रद्दऐवजी निलंबनाची पळवाट दिल्याचे सांगण्यात आले.

इतर परवान्यांवर कधी निर्णय?राज्यात सर्वांत जास्त शस्त्र परवाने बीडमधूनच वाटल्याचे समोर आले होते. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी चार दिवसांपूर्वी याचा आढावा घेतला. माध्यमांशी बोलताना त्यांनी ३४० परवाने रद्द केल्याचे सांगितले. तसेच उर्वरित परवान्यांबाबतही लवकरच कारवाई करू, असे सांगितले होते. परंतु, सध्या तरी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाकडून यावर काहीच पावले उचलली जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या