शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

Beed: पूरस्थितीत गावकऱ्यांची धाडसी कामगिरी; मृत्यूच्या दारातून बाहेर काढला गतीमंद तरुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 14:42 IST

तुफानी प्रवाहात गतीमंद तरुणाच्या जीवावर बेतलेला प्रसंग; गावकऱ्यांनी दाखवला पराक्रम

-नितीन कांबळे

कडा (बीड): आष्टी तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असतानाच टाकळसिंग गावातील तरुणांनी दाखवलेल्या शौर्यकथेमुळे मोठा अनर्थ टळला. सोमवारी सकाळी पुराच्या पाण्यात एक गतीमंद तरुण वाहून जात असताना गावातील पाच जिगरबाज तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला सुखरूप बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, सततच्या पावसामुळे आष्टी तालुक्यातील कडा, खिळद, सुलेमान देवळा, शिराळ, देवीनिमगाव, धानोरा यांसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मोठमोठे पुल पाण्याखाली गेले असून वाहतूक ठप्प झाली आहे. अशा गंभीर परिस्थितीत टाकळसिंग परिसरात नदीच्या पुराच्या पाण्यात एक भोळसर तरुण वाहून जाताना दिसला.

क्षणाचाही विलंब न करता गावातील केदार जगताप, सोमा जगताप, सुनील जगताप, काका जगताप आणि राजू जगताप यांनी जिवाची पर्वा न करता कमरेला दोर बांधून पुराच्या पाण्यात उडी घेतली. तुफानी प्रवाहाशी झुंज देत त्यांनी त्या तरुणाला बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. सध्या त्या तरुणावर टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. मात्र, तो भोळसर असल्याने त्याची ओळख पटू शकलेली नाही. “या तरुणाला कोणी ओळखत असल्यास त्वरित आष्टी पोलिसांशी संपर्क साधावा,” असे आवाहन पोलिस हवालदार प्रवीण क्षीरसागर यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कडा, खिळद, सुलेमान देवळा, शिराळ, देवीनिमगाव, धानोरा, महेश मंदिर, केरूळ यासह अनेक गावांमधील मोठे पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. कडा-धामणगाव महामार्गावरील देवीनिमगाव पुलावरून, तसेच शिराळ परिसरातील पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्ग बंद करण्यात आले आहेत. इमनगाव तलाव ओव्हरफ्लो झाल्याने आष्टी-मिरजगाव मार्गावरही अडथळा निर्माण झाला आहे.

नदीकाठच्या परिसरातील शेतं पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नगर-बीड मार्गावरील कडा नदीची पातळी सतत वाढत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. “पूराच्या पाण्यावरून कोणत्याही परिस्थितीत वाहन नेऊ नये, सेल्फी किंवा स्टंटबाजी करू नये. प्रशासनाला सहकार्य करा,” असे आवाहन तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरBeedबीड