शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

पहिल्याच पावसामध्ये बीड शहर अंधारात...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:05 AM

शुक्रवारी मध्यरात्री पावसाने सर्वत्र हजेरी लावली. मात्र पाऊस सुरू होताच बीड शहरातील वीज गायब झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शुक्रवारी मध्यरात्री पावसाने सर्वत्र हजेरी लावली. मात्र पाऊस सुरू होताच बीड शहरातील वीज गायब झाली. पहाटेपर्यंत वीज न आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मान्सूनपूर्व कामे न झाल्याने पहिल्याच पावसात महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला. याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना सहन करावा लागला. विशेष म्हणजे हा प्रकार नेहमीच होत असतानाही कसल्याच उपाययोजना केल्या जात नसल्याचे समोर आले आहे.बीड जिल्ह्यात महावितरणचा गलथान कारभार ग्राहकांसाठी त्रासदायक ठरू पाहत आहे. महावितरणने पाऊस पडण्यापूर्वी लोंबकाळलेल्या तारा ताणने, वाकलेले खांब सरळ करणे, तारावर आलेले झाडांचे फाटे तोडणे यासाह इतर कामे करणे आवश्यक होती. मात्र काही ठिकाणीच हे कामे करण्यात आली. ज्या ठिकाणी केली त्या ठिकाणीही थातुरमातूर कामे केल्याचा आरोप आहे. यामुळेच पहिल्याच पावसात महावितरणचा कारभार चव्हाट्यावर आला. शुक्रवारी थोडावेळच पाऊस झाला तर संपूर्ण बीड शहर अंधारात राहिले. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.म्हणे, पहिला पाऊस असल्याने अडचणबीड शहरातील खंडीत वीजपुरठ्याबद्दल अधीक्षक अभियंता संजय सरग यांना संपर्क केला असता त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना विचारा, असे सांगून हात झटकले. अधिकाऱ्यांच्या अशा टोलवाटोलवीमुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे.याबाबत कार्यकारी अभियंता ए.आर.पाटील म्हणाले, पहिला पाऊस असल्याने वीज खंडीत झाली असेल. पहिले एक दोन पावसात अशी अडचण होतच असते. नंतर होणार नाही. वीज पुरवठा खंडीत होऊ नये, ग्राहकांच्या तक्रारी येऊ नयेत, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासंदर्भात सर्व अभियंत्यांची सोमवारी बैठक बोलावल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

 

टॅग्स :Rainपाऊसelectricityवीजmahavitaranमहावितरण