शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसामध्ये बीड शहर अंधारात...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:06 IST

शुक्रवारी मध्यरात्री पावसाने सर्वत्र हजेरी लावली. मात्र पाऊस सुरू होताच बीड शहरातील वीज गायब झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शुक्रवारी मध्यरात्री पावसाने सर्वत्र हजेरी लावली. मात्र पाऊस सुरू होताच बीड शहरातील वीज गायब झाली. पहाटेपर्यंत वीज न आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मान्सूनपूर्व कामे न झाल्याने पहिल्याच पावसात महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला. याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना सहन करावा लागला. विशेष म्हणजे हा प्रकार नेहमीच होत असतानाही कसल्याच उपाययोजना केल्या जात नसल्याचे समोर आले आहे.बीड जिल्ह्यात महावितरणचा गलथान कारभार ग्राहकांसाठी त्रासदायक ठरू पाहत आहे. महावितरणने पाऊस पडण्यापूर्वी लोंबकाळलेल्या तारा ताणने, वाकलेले खांब सरळ करणे, तारावर आलेले झाडांचे फाटे तोडणे यासाह इतर कामे करणे आवश्यक होती. मात्र काही ठिकाणीच हे कामे करण्यात आली. ज्या ठिकाणी केली त्या ठिकाणीही थातुरमातूर कामे केल्याचा आरोप आहे. यामुळेच पहिल्याच पावसात महावितरणचा कारभार चव्हाट्यावर आला. शुक्रवारी थोडावेळच पाऊस झाला तर संपूर्ण बीड शहर अंधारात राहिले. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.म्हणे, पहिला पाऊस असल्याने अडचणबीड शहरातील खंडीत वीजपुरठ्याबद्दल अधीक्षक अभियंता संजय सरग यांना संपर्क केला असता त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना विचारा, असे सांगून हात झटकले. अधिकाऱ्यांच्या अशा टोलवाटोलवीमुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे.याबाबत कार्यकारी अभियंता ए.आर.पाटील म्हणाले, पहिला पाऊस असल्याने वीज खंडीत झाली असेल. पहिले एक दोन पावसात अशी अडचण होतच असते. नंतर होणार नाही. वीज पुरवठा खंडीत होऊ नये, ग्राहकांच्या तक्रारी येऊ नयेत, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासंदर्भात सर्व अभियंत्यांची सोमवारी बैठक बोलावल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

 

टॅग्स :Rainपाऊसelectricityवीजmahavitaranमहावितरण