शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

पहिल्याच पावसामध्ये बीड शहर अंधारात...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:06 IST

शुक्रवारी मध्यरात्री पावसाने सर्वत्र हजेरी लावली. मात्र पाऊस सुरू होताच बीड शहरातील वीज गायब झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शुक्रवारी मध्यरात्री पावसाने सर्वत्र हजेरी लावली. मात्र पाऊस सुरू होताच बीड शहरातील वीज गायब झाली. पहाटेपर्यंत वीज न आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मान्सूनपूर्व कामे न झाल्याने पहिल्याच पावसात महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला. याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना सहन करावा लागला. विशेष म्हणजे हा प्रकार नेहमीच होत असतानाही कसल्याच उपाययोजना केल्या जात नसल्याचे समोर आले आहे.बीड जिल्ह्यात महावितरणचा गलथान कारभार ग्राहकांसाठी त्रासदायक ठरू पाहत आहे. महावितरणने पाऊस पडण्यापूर्वी लोंबकाळलेल्या तारा ताणने, वाकलेले खांब सरळ करणे, तारावर आलेले झाडांचे फाटे तोडणे यासाह इतर कामे करणे आवश्यक होती. मात्र काही ठिकाणीच हे कामे करण्यात आली. ज्या ठिकाणी केली त्या ठिकाणीही थातुरमातूर कामे केल्याचा आरोप आहे. यामुळेच पहिल्याच पावसात महावितरणचा कारभार चव्हाट्यावर आला. शुक्रवारी थोडावेळच पाऊस झाला तर संपूर्ण बीड शहर अंधारात राहिले. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.म्हणे, पहिला पाऊस असल्याने अडचणबीड शहरातील खंडीत वीजपुरठ्याबद्दल अधीक्षक अभियंता संजय सरग यांना संपर्क केला असता त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना विचारा, असे सांगून हात झटकले. अधिकाऱ्यांच्या अशा टोलवाटोलवीमुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे.याबाबत कार्यकारी अभियंता ए.आर.पाटील म्हणाले, पहिला पाऊस असल्याने वीज खंडीत झाली असेल. पहिले एक दोन पावसात अशी अडचण होतच असते. नंतर होणार नाही. वीज पुरवठा खंडीत होऊ नये, ग्राहकांच्या तक्रारी येऊ नयेत, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासंदर्भात सर्व अभियंत्यांची सोमवारी बैठक बोलावल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

 

टॅग्स :Rainपाऊसelectricityवीजmahavitaranमहावितरण