शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

बीड जिल्ह्यात धरणांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:42 AM

बीड जिल्ह्यातील ९० प्रकल्पामधील जलसाठा मृतावस्थेत गेला आहे. तसेच १० तलावांमध्ये पाण्याचा थेंब देखील शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे पावसाळ््याच्या तोंडावर पाणीटंचाईचे संकट जाणवू लागले आहे.

बीड : जिल्ह्यातील ९० प्रकल्पामधील जलसाठा मृतावस्थेत गेला आहे. तसेच १० तलावांमध्ये पाण्याचा थेंब देखील शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे पावसाळ््याच्या तोंडावर पाणीटंचाईचे संकट जाणवू लागले आहे.

बीड जिल्ह्यात २ मोठे, १६ मध्यम, १२६ लघु असे १४४ प्रकल्प आहेत. त्यापैकी ९० प्रकल्पांचा जलसाठा मृतावस्थेत गेला आहे, तर १० प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लकच नाही. माजलगांव, मांजरा हे दोन मोठे प्रकल्प तर सिंदफणा, बिंदुसरा, बेलपारा, महासांगवी, मेहेकरी, कडा, कडी, रूटी, कांबळी, वाण, बोरणा, कुंडलीका, बोधेगाव, सरस्वती, वाघेबाभूळगांव असे १६ लघु प्रकल्प आहेत.

या सर्व प्रकल्पांच्या पाण्यावर शेती व पिण्यासाठी वापर केला जातो. जिल्ह्यात उद्योगांची संख्या कमी असल्यामुळे संपूर्ण पाणी हे शेतीसाठी व घरगुती वापरासाठी केला जातो. गत वर्षी पावसाळ््याच्या शेवटच्या दिवसांमध्ये जिल्ह्यात १०८.२ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे संपूर्ण धरणे, तलाव, तळे तुडूंब भरली होती. मात्र, यावर्षीच्या पावसाळ््याच्या सुरुवातीला या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा केवळ ६.६४ टक्के शिल्लक आहे.

जिल्ह्यातील १४४ प्रकल्पाची पाणी क्षमता ११३७ दलघमी आहे. पैकी २९३.५१६ दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी ५९.२५० दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे.प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे व पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. तसेच अनेक गावांमध्ये सांडपाण्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी गावकºयांना पायपीट करावी लागत आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईMarathwadaमराठवाडा