शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बारकोड प्रणालीमुळे ऊस वाहतूक यंत्रणेला लागली शिस्त; तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या वेळ आणि श्रमाची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 16:33 IST

गाळप हंगामात ऊस वाहतूक  करणार्‍या वाहनांकडून वजन काट्यांवर आपला पहिला नंबर लागून लवकर रिकामे व्हावे, यासाठी मोठी ओढा-ताण होत असे.

ठळक मुद्देबारकोडिंगचा राज्यभरात जय महेश कारखान्यांचा पहिला उपक्रम वाहनांचा वजनाअभावी जामिंग होवून वेळ जात होता.

- पुरूषोत्तम करवा

माजलगाव  : तालुक्यातील एन.एस.एल. ग्रुपच्या जय महेश शुगर इंडिस्ट्रीज या खाजगी साखर कारखान्यांने कारखाना परिसरात ऊस वाहतूक  करणार्‍यां वाहनांची वजन काठ्यावर होणारी जामिंग रोखण्यासाठी बारकोड प्रणालीचा वापर केला आहे. बारकोड प्रणाली वापर करणारा जय महेश कारखाना हा राज्यातील पहिला ठरला आहे. तर ऊस वाहतुकीत होणार्‍या अनागोंदीपणाला शिस्त लागली आहे.

तालुक्याती एन.एस.एल.गु्रपच्या जय महेश कारखाना हा सातत्याने शेतकर्‍यांना अधिकाअधिक भाव देण्या बरोबरच विवीध सेवा देण्याचे काम करण्यात अग्रेसर राहिलेला आहे. गाळप हंगामात ऊस वाहतूक  करणार्‍या वाहनांकडून वजन काट्यांवर आपला पहिला नंबर लागून लवकर रिकामे व्हावे, यासाठी मोठी ओढा-ताण होत असे. यातून ऊस वाहतुकदारांमध्ये लहान-मोठे वाद निर्माण होत होते. त्यातून इतर वाहनांचा वजनाअभावी जामिंग होवून वेळ जात होता. याचा परिणाम कारखान्यांच्या दैनंदिन गाळपावर होत होता. त्यामुळे कारखान्यांने हा प्रकार रोखण्यासाठी नवीन शक्कल लढवली. 

कारखान्यांचे उपाध्यक्ष गिरीष लोखंडे यांनी जी वाहने कारखान्यांस ऊस पुरवठा करतात त्यावर अत्याधुनिक अशी बारकोड यंत्रणा राबवण्याचे ठरवले. त्यानूसार 400 ट्रॅक्टर व 200 बैलगाड्या यांना बारकोड लावण्यात आले. ही वाहने कारखान्यांवर ऊस घेवून आल्यावर वजन काट्यावर येताच त्यांचे स्कॅनींग करण्यात येते. यानंतर वजनांची पावती संबधित ऊस वाहतुक करणार्‍या वाहन मालकास मिळते. तसेच शेतकर्‍यांना मोबाईलवर संदेश जातो. याबरोबरच शेतकर्‍यांच्या शेतातून वाहन बाहेर निघताच कारखान्यांच्या ऑफिसवर थांबून पावती घ्यावी लागत होते. परंतू आता बारकोड प्रणालीमुळे पावती शेतकर्‍यांना मोबाईलवर जाग्यावरच उपलब्ध होत आहे. त्यामुळे स्लिप बॉयच्या पाठीमागे लागण्याची शेतकर्‍यांना गरज राहिलेली नाही, हे या प्रणालीमुळे शेतकर्‍यांच्या अधिक फायद्याचे ठरत आहे.

वजन काटा 'सीसीटीव्ही'च्या निगराणीखालीजय महेश शुगर इंडस्ट्रिजला आलेला ऊसाचे वजन काट्यावर  पारदर्शकपणा दिसून येत आहे. जर कुणास शंका आली तर तेथे वजनाच्या मणके ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कुणी वजन काट्यावर आक्षेप नोंदवला तर त्यांच्या शंकेचे निरसन केले जाते. वजन काट्यावर सीसीटीव्ही बसवण्यात आलेले असल्याने पारदर्शकता दिसुन येत आहे.

बारकोड प्रणालीमुळे ऊस वाहतुकीस शिस्तएन.एस.एल. ग्रुपच्या जय महेश शुगर इंडिस्ट्रीज शेतकर्‍यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करते. त्याचाच भाग म्हणून बारकोड प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे कारखान्यांवर वजनासाठी होणारी ओढा-ताण, वाद थांबले आहेत. त्यामुळे सुरळीत गाळप होत आहे.- गिरीष लोखंडे, उपाध्यक्ष, जय महेश शुगर इंडिस्ट्रीज

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीडSugar factoryसाखर कारखाने