शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

बंधाऱ्यांची वेळेत दुरुस्ती नाही; पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 16:54 IST

ब्र.येळंब, नि.मायंबातून लाखो लिटर पाणी वाया

ठळक मुद्देशिरूर तालुक्यात सिंचन वाढणार तरी कसे? नदीकाठच्या शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही

- जालिंदर नन्नवरे

शिरूर कासार   :  पाटबंधारे विभाग आणि नेते मंडळीच्या दुर्लक्षामुळे तालुक्यांमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण होत असते. कुचकामी धोरणामुळे तालुक्यातील बंधारे दुरुस्तीअभावी केवळ शोभेची वास्तू बनले आहेत. दरवाजे नसल्याने भर पावसाळ्यात या बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाया जाताना दिसत आहे.

संपूर्ण तालुक्यांमध्ये दुष्काळ व पाणी टंचाई निवारणार्थ कोल्हापुरी व शिवकालीन बंधारे मोठ्या प्रमाणावर उभारले गेले आहेत. परंतु त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासन पातळीवर निधी उपलब्ध नसल्याने बंधाऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. यामध्ये पाणीसाठा होण्याऐवजी लाखो लिटर पाणी डोळ्यादेखत वाया जाताना दिसत आहे. तालुक्यातील मुख्य नदी असलेल्या सिंदफणा नदीवर सद्यस्थितीत एकही बंधारा सुस्थितीत नसल्याने नदीमध्ये पाण्याचा एकही थेंबही साठवून राहत नाही. पयार्याने या प्रमुख नदीचा काडीचाही उपयोग नदीकाठच्या गावांना व शेतकऱ्यांना  होत नाही.

खोलीकरण रखडलेशिरूर शहराची तहान भागवणारा सिद्धेश्वर बंधारा गाळाने भरला आहे. सद्यस्थितीत बंधाऱ्यात पाणीसाठा कमी प्रमाणात होत असल्याने तो लवकरच कोरडा पडत आहे. यामुळे गाळ उपसा करून खोलीकरण करणे निकडीचे आहे. याकडेही पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे, असून हा कारभार पाटोद्यावरून चालतो.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुरुस्तीचा पाठपुरावामागील वर्षी नव्याने स्थापन झालेल्या महाआघाडीच्या सरकारकडे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी जलसंधारण मंत्र्यांकडे दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला आहे. परंतु विभागाला दुरुस्तीचे आदेश प्राप्त झाले नसल्याने अद्यापही बंधाऱ्यांची दुरुस्ती रखडलेली आहे. अनेक वर्षापासून दरवाजे नसल्यामुळे पाणी वाहून जात असल्यामुळे उन्हाळ्यात नदीचे पात्र कोरडेठाक असते.

या बंधाऱ्यांना दुरुस्तीअभावी गळती- सिंदफणा नदीवर ब्रह्मनाथ येळंब, निमगाव व साक्षाळपिंप्री येथील भव्य बंधाऱ्यांची दुरुस्ती रखडल्याने दयनीय अवस्था झाली आहे.- आर्वी येथील उथळा नदीवरील दोन बंधारे कित्येक वषार्पासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.- यासह ग्रामीण भागात उभारलेले लहान लहान बंधारे देखील दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.- याचबरोबर सिंदफणा बंधाऱ्यावरील खोलीकरणही रखडलेले आहे.

गावाच्या पायथ्याला असलेला भव्य कोल्हापुरी बंधारा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे बंधाऱ्याचा मूळ हेतू मावळला असून, हा बंधारा केवळ सध्या शोभेची वास्तू बनला आहे.- विनायक थोरात, सामाजिक कार्यकर्ते, ब्र. येळंब

संबंधित बंधारे पाटबंधारे विभागाने निर्माण केलेले असून त्याची दुरुस्ती करण्यासाठी विशेष निधीची तरतूद विभागाकडे नाही. त्यामुळे या बंधाऱ्यांची दुरुस्ती रखडलेली आहे. संबंधित विभागाने या बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.- पठाण ए.के, जलसंधारण शाखा अभियंता, पाटोदा - शिरूर 

टॅग्स :WaterपाणीBeedबीडDamधरण