शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

आष्टी तालुक्यास अवकाळी पावसाचा तडाखा; घरावर वीज कोसळली, फळबागांचे मोठे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 11:57 IST

कांदा, गहू, संत्रा, लिंबू, डाळींब, आंबा बागेतील काढणीस आलेल्या फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

- अविनाश कदम आष्टी ( बीड) : शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाहीत. त्यात सोमवारी आणि मंगळवारी तालुक्यात अचानक पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्यासमोर दुहेरी संकट आले आहे. अवकाळी पावसाने तालुक्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच एका घरावर वीज कोसळल्याची घटना पुढे आली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

कांदा, गहू, संत्रा, लिंबू, डाळींब, आंबा बागेतील काढणीस आलेल्या फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.  धामणगाव, मातकुळी, बाळेवाडीसह सात ते आठ गावात वादळ वाऱ्यासह पावसाने सर्वाधिक नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी बांधवाकडून होत आहे.

तालुक्यातील कारखेल बु.येथे आप्पसाहेब तुकाराम साळुंके यांच्या राहत्या घरावर मंगळवारी सकाळी 12  वाजेच्या सुमारास वीज पडली. त्यावेळी सर्व कुटुंब घरामध्ये होते. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पत्नी वच्‍छलाबाई आप्पासाहेब साळुंखे यांना डोक्याला किरकोळ मार लागला. या परिसरात पहिल्यांदाच राहत्या घरावर वीज पडल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

आष्टी तालुक्यातील बाळेवाडीसह काही गावांमधील झालेल्या शेतातील नुकसान झाले त्या भागांची आष्टी तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी पाहणी केली. सोमवारी व मंगळवारी वादळ वाऱ्यासह पाऊस पडल्याने साठ ते आठ गावांतील फळबागासह काही पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी अधिकारी तरटे यांनी दिली. नुकसानीबाबत महसूल आणि कृषीच्या संयुक्त पथकाच्या पाहणीत अधिक समजेल. शेतकऱ्यांनी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस वादळ वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.

कृषी विभागाचे आवाहनज्या विमा धारक शेतकऱ्यांचे सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी झालेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांनी Crop insurance या ॲप्लिकेशनव्दारे विमा कंपनीला 72 तासांच्या आत तक्रार द्यायची आहे. त्यात नुकसानीचे कारण unseasonable Rain हा पर्याय निवडायचा आहे असे आवाहन तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊस