शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी पथकांची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:55 IST

बीड : जिल्ह्यात २०१९ आणि २०२० या दोन वर्षात झालेल्या समाधानकारक पावसामुळे दुष्काळ जाणवला नाही. मात्र, ...

बीड : जिल्ह्यात २०१९ आणि २०२० या दोन वर्षात झालेल्या समाधानकारक पावसामुळे दुष्काळ जाणवला नाही. मात्र, मे महिन्यात जवळपास सर्वच १४४ प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी झाला असून, ३३.३८ टक्के पाणीसाठा शिल्ल्क आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यात पथकांची नेमणूक केली आहे. पाणी उपसा रोखला नाही तर पाऊस सुरु होईपर्यंत काही गावांमध्ये टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दोन वर्षे सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस झाल्यामुळे जिल्ह्याची भूजल पातळी १० टक्क्यांनी वाढली आहे. पाच वर्षांत पहिल्यांदाच पातळी वाढली आहे. मध्यम १६ प्रकल्पात ३८.१८ टक्के, तर १२६ लघु पाटबंधारे प्रकल्पात २०.७७ टक्के जलसाठा आहे. बीड जिल्ह्यातील सर्व १४४ प्रकल्पात आजअखेर ३३.३८ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात गोदावरी आणि कृष्णा खोरे हे दोन्ही विभाग येतात. दरम्यान, पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी पाटबंधारे विभाग, महसूल व महावितरण विद्युत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाची नेमणूक केली आहे. त्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन अवैध पाणी उपसा होत असले तर, रोखण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. वेळप्रसंगी पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी, असेदेखील निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी भीषण दुष्काळी परिस्थिती होती. यावेळी जवळपास १ हजार टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर दोन वर्षे चांगला पाऊस झाल्यामुळे तसेच जलयुक्त शिवार योजना व सामाजिक संस्थांच्या मदतीने करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळीदेखील वाढली आहे. मात्र, चांगला पाऊस झाल्यानंतर जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे प्रकल्पांमधील पाणी उपसा सुरु झाला आहे. अवैध पाणी उपसा रोखला नाही तर पुन्हा एकदा टँकरची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

संयुक्त पथकांकडून कारवाई थंडावली

जिल्ह्यातील विविध तालुक्यातील प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात आहे. मात्र, स्थापन केलेल्या पथकांकडून कारवाया मात्र थंडावल्याचे चित्र आहे. बोटावर मोजण्याइतक्या कारवाया करण्यात आल्याची माहिती आहे. अशाच पद्धतीने पाणी उपसा सुरु असताना दुर्लक्ष केले तर, नागरिकांना येणाऱ्या काळात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

===Photopath===

040521\04_2_bed_11_04052021_14.jpg

===Caption===

अवैध पाणी उपसा