शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी पथकांची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:55 IST

बीड : जिल्ह्यात २०१९ आणि २०२० या दोन वर्षात झालेल्या समाधानकारक पावसामुळे दुष्काळ जाणवला नाही. मात्र, ...

बीड : जिल्ह्यात २०१९ आणि २०२० या दोन वर्षात झालेल्या समाधानकारक पावसामुळे दुष्काळ जाणवला नाही. मात्र, मे महिन्यात जवळपास सर्वच १४४ प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी झाला असून, ३३.३८ टक्के पाणीसाठा शिल्ल्क आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यात पथकांची नेमणूक केली आहे. पाणी उपसा रोखला नाही तर पाऊस सुरु होईपर्यंत काही गावांमध्ये टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दोन वर्षे सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस झाल्यामुळे जिल्ह्याची भूजल पातळी १० टक्क्यांनी वाढली आहे. पाच वर्षांत पहिल्यांदाच पातळी वाढली आहे. मध्यम १६ प्रकल्पात ३८.१८ टक्के, तर १२६ लघु पाटबंधारे प्रकल्पात २०.७७ टक्के जलसाठा आहे. बीड जिल्ह्यातील सर्व १४४ प्रकल्पात आजअखेर ३३.३८ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात गोदावरी आणि कृष्णा खोरे हे दोन्ही विभाग येतात. दरम्यान, पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी पाटबंधारे विभाग, महसूल व महावितरण विद्युत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाची नेमणूक केली आहे. त्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन अवैध पाणी उपसा होत असले तर, रोखण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. वेळप्रसंगी पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी, असेदेखील निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी भीषण दुष्काळी परिस्थिती होती. यावेळी जवळपास १ हजार टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर दोन वर्षे चांगला पाऊस झाल्यामुळे तसेच जलयुक्त शिवार योजना व सामाजिक संस्थांच्या मदतीने करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळीदेखील वाढली आहे. मात्र, चांगला पाऊस झाल्यानंतर जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे प्रकल्पांमधील पाणी उपसा सुरु झाला आहे. अवैध पाणी उपसा रोखला नाही तर पुन्हा एकदा टँकरची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

संयुक्त पथकांकडून कारवाई थंडावली

जिल्ह्यातील विविध तालुक्यातील प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात आहे. मात्र, स्थापन केलेल्या पथकांकडून कारवाया मात्र थंडावल्याचे चित्र आहे. बोटावर मोजण्याइतक्या कारवाया करण्यात आल्याची माहिती आहे. अशाच पद्धतीने पाणी उपसा सुरु असताना दुर्लक्ष केले तर, नागरिकांना येणाऱ्या काळात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

===Photopath===

040521\04_2_bed_11_04052021_14.jpg

===Caption===

अवैध पाणी उपसा