शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
3
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
4
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
5
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
6
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
7
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
8
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
9
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
10
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
11
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
12
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
13
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
14
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
15
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
16
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
17
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
18
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
19
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
20
Crime: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल!

कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:23 IST

.... कड्याचा पाणीप्रश्न कधी मिटणार कडा : आष्टी तालुक्यातील कडा गावात गेल्या तीस वर्षांत अनेक पाणी योजना झाल्या. परंतु ...

....

कड्याचा पाणीप्रश्न कधी मिटणार

कडा : आष्टी तालुक्यातील कडा गावात गेल्या तीस वर्षांत अनेक पाणी योजना झाल्या. परंतु येथील योजना पाण्याअभावी बंद पडल्या. तीस वर्षांपूर्वी कडा येथे पिण्याच्या पाण्याची जी परिस्थिती होती, तीच आज आहे. याला लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत आहे. तरी कडा येथेही कायमस्वरूपी पाणी योजना राबवावी, अशी मागणी होत आहे.

....

पिंपरखेड-वाघळूज तांडा रस्ता दुरुस्तीची मागणी

धानोरा : पिंपरखेड ते वाघळूज तांडा दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम तीन वर्षांपूर्वी मंजूर केले होते. हे काम आतापर्यंत का झाले नाही? असा सवाल नागरिकांतून होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांना मुश्कील होते. तरी या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

....

रस्ता रुंदीकरणाची मागणी

धानोरा : मांदळी-धानोरा-सावरगाव रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या रस्त्यावरून श्रीक्षेत्र मांदळी, सावरगाव येथील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ, मढी, पैठण येथे भाविक मोठ्या प्रमाणात जातात. यामुळे गेल्या काही वर्षांत या रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. तरी या रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

...

रेल्वे पुलाखालील रस्त्यांमुळे वाहतुकीस अडथळा

बीड : जिल्ह्यात नगर-परळी रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. या कामात अनेक ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग काढले आहेत. काही ठिकाणी पुलांची कामे पूर्ण झाली आहेत, तर अनेक महामार्गावर असणारे पूलही पूर्णत्वास आले आहेत. परंतु या पुलाखालील रस्त्यावर खड्डे, गतिरोधक तयार केले आहेत. हे गतिरोधक लेव्हलमध्ये नसल्याने अनेक चारचाकी वाहने, दुचाकीस्वारांना अंदाज येत नाही. यामुळे या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तरी या ठिकाणी रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

.....

शाळा परिसरात गवत वाढले

बीड : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा अनेक दिवसांपासून बंद आहेत. यामुळे शाळेचे वर्ग अनेक दिवस उघडले नाही. तसेच शाळेच्या आवारात स्वच्छता केलेली नाही. तरी शाळा परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी पालकांतून होत आहे.

.....

पिकांना जीवदान

बीड : पाटोदा तालुक्यातील सौताडा, धनगर जवळका परिसरात गेल्या चार दिवसांत काही ठिकाणी भीज पाऊस झाला, तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. खरिपाच्या पेरणीनंतर पावसाने १५ दिवस दडी मारली होती. दरम्यान, गेल्या चार-पाच दिवसांत काही ठिकाणी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

......