शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

रस्ता, नाल्यांच्या अर्धवट कामाने नागरिकांत संताप - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : शहरातील मोरेवाडीलगत असलेल्या नगर परिषदेच्या हद्दीतील एकात्मता कॉलनीत रस्ता व नाली बांधकाम गेल्या अनेक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : शहरातील मोरेवाडीलगत असलेल्या नगर परिषदेच्या हद्दीतील एकात्मता कॉलनीत रस्ता व नाली बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. या परिसरातील रहिवाशांनी पाठपुरावा करूनही नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्षच होत आहे. त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.

एकात्मता कॉलनीच्या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते व नाल्यांचे काम रखडलेल्या स्थितीत आहेत. जिथे नाल्या झाल्या तेथील सांडपाणी बाहेर काढून दिलेले नाही. त्यामुळे हे पाणी मोकळ्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात साठते. या घाण पाण्यामुळे जागोजागी डबकी साचली आहेत. त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. याशिवाय या डबक्यातील पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे साथीचे आजार निर्माण झाले आहेत. रस्ता न झाल्याने पावसाळ्यात रहिवाशांना चिखलातून यावे-जावे लागते. याचा मोठा त्रास महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. नगर परिषद प्रशासनाकडे नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या; परंतु याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले.

मोरेवाडीलगत असलेली एकात्मता कॉलनी गेल्या २० वर्षांपासून नगरपालिका हद्दीत समाविष्ट आहे. एकात्मता कॉलनीच्या पूर्वेकडील भागातही सांडपाणी वाहून नेण्यासाठी नालीचे काम अद्यापही झालेले नाही. अगोदरच कोरोना, डेंग्यूची साथ आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. या समस्यांसंदर्भात या प्रभागाच्या नगरसेवकांकडे पाठपुरावा करूनही त्यांनी दुर्लक्षच केले. या परिसरात निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे रोगराई होऊन १९ वर्षीय युवकाचा बळी गेलेला आहे. यासंदर्भात येथील रहिवासी असलेल्या नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदनही दिले आहे.

निवेदनावर रामकृष्ण पवार, संतोष कदम, महारुद्र पाळवदे, जालिंदर सोळके, कल्याण सोनवणे, श्रीधर उडाळकर, रामदास शिंदे, रामकिसन अंबाड, प्रभाकर कांबळे, सुनील मस्के, सतीश पांचाळ, प्रभाकर देशमाने, राजाभाऊ स्वामी, पंकज खांडेकर, उद्धव कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

....

...तर कर का करायचा? सलग पाच वर्षे पाठपुरावा करूनही जर पायाभूत सुविधा उपलब्ध होत नसतील तर माजलगाव नगर परिषदेला कसलाही कर आकारणी करण्याचा अधिकार नाही. या प्रभागाचे नगरसेवक फक्त मते मागण्यासाठीच येतात. त्यांना कर्तव्याचा विसर पडलेला आहे.

-रामकृष्ण पवार, ज्येष्ठ नागरिक, एकात्मता कॉलनी, अंबाजोगाई.

210821\5531img-20210821-wa0102.jpg

माजलगाव शहरातील एकात्मता कॉलनीमधील नाले व रस्त्यांची झालेली दुरवस्था.