शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

बदाम उतरले, तेल भडकले, कांदा महागला, बटाटा स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 4:30 AM

बीड : किराणा बाजारात एकीकडे सुका मेव्यात बदामाचे भाव २०० ते २५० रुपयांनी घसरले तर खाद्यतेलात मात्र तेजीची उसळी ...

बीड : किराणा बाजारात एकीकडे सुका मेव्यात बदामाचे भाव २०० ते २५० रुपयांनी घसरले तर खाद्यतेलात मात्र तेजीची उसळी सुरूच आहे. भाज्यांची समाधानकारक आवक होत असल्याने भाव आवाक्यात आहे. उन्हाळा जाणवत असल्याने फळांना मागणी वाढली आहे.

सरत्या आठवड्यात दोन दिवस घसरणीनंतर तेलाने पुन्हा उसळी मारली. तूर डाळीने शंभरी ओलांडली असून इतर डाळी मात्र स्थिर आहेत. चहा पत्तीचे वाढलेले दर कायम आहेत.

सुकामेव्याला मागणी नसल्याने बदामाचे भाव किलोमागे २५० रुपयांनी तुटले.

भाजीबाजारात दररोज आवक चांगली होत असल्याने दरांवर फारसा परिणाम झालेला नाही. पांढरा आणि लाल कांद्याचे दर किलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत. मेथी, पालक, करडी, शेपूला मागणी असून, दर्जानुसार भाव आहेत. शेवग्याचे भाव मागील दहा दिवसांत चांगलेच घसरले आहेत. वांगीचे भाव मात्र तेजीत आहेत. कोबीच्या दरात घसरण कायम आहे.

फळांच्या बाजारात हिरव्या आणि काळ्या द्राक्षांची आवक वाढली आहे. उन्हाळा जाणत असल्याने रसदार फळांना मागणी वाढली आहे. कलिंगड, खरबुजांची स्थानिक भागातून आवक होत आहे. केळीचे दर स्थिर असून सफरचंदाचे भाव तेजीत आहेत. लालबाग, बदाम आंब्याची आवक पुणे, मुंबईच्या बाजारातून होत आहे.

---------

सोयाबीन, सूर्यफूल तेल ५ रुपयांनी वाढले. तूरडाळ ९५ वरून १०५ रुपये किलो होती. उडद डाळीत किलोमागे ८ रुपये वाढ झाली. बदामाचा भाव दर्जानुसार ५०० ते ६०० रुपये किलो होता. साखर, तांदूळ, खोबरे, साबुदाण्याचे भाव स्थिर होते.

-------

गवारीची शंभरी

कांदा ३०वरून ४० ते ५० रुपये किलो झाला. बटाटे २० रुपये किलोवर स्थिर आहेत. गवारने चांगलाच भाव खाल्ला असून ८० ते १०० रुपये किलो विकली. नवीन चिंचेचे भाव १०० रुपये किलो होते. मेथी, पालक, करडीची जुडी २५० रुपये, तर कोथिंबीर १५० रुपये शेकडा होती. शेवगा, दोडके, भेंडी, वांगी ४० रुपये किलो होते.

-----------

रसदारी फळांची मागणी

सफरचंदाचा भाव १५० ते १८० रुपये किलो होता. संत्रीच्या दरात १० रुपयांनी वाढ होऊन ५० रुपये किलो भाव होता. मोसंबी ६०, तर कलिंगड १० रुपये किलो होता. अंजीर १००, तर चिकू ६० रुपये किलो होते. द्राक्षांची मागणी वाढल्याने भाव ७० ते १०० रुपये किलो होता.

----

शेतातून शहरात माळवं आणण्यासाठी १०० रुपये खर्च होतो. दिवसभर बसावे लागते. जो दर मिळेल तो स्वीकारावा लागतो. आमचा नाईलाज आहे. -- परमेश्वर खोड, भाजीविक्रेता, शिरसमार्ग

---

तेलाचे दर वाढतच आहेत. बदामाचे भाव उतरले आहेत. नवा गहू येणार असल्याने भाव कमी होतील. सध्या ग्राहकी मात्र शांत आहे. - कन्हय्या सारडा, किराणा व्यापारी.

----

उन्हाळ्यामुळे कलिंगड, अनानस, द्राक्ष, खरबुजाला मागणी वाढली आहे. केळीचे भाव स्थिर आहेत. डाळिंबाची आवक नसून ग्राहक चौकशी करतात. - नबील बागवान, फळविक्रेता.