शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

"भाजप बुथप्रमुखाच्या हत्येनंतर कुटुंबाच्या भेटीपेक्षा बावनकुळेंना सेटलमेंटची भेट महत्त्वाची वाटली"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 17:59 IST

आमचे गावकरी गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा बोला, असं मला सांगत होते. पण मी आजपर्यंत बोललो नव्हतो, असं देशमुख म्हणाले.

BJP Chandrashekhar Bawankule: भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घडवून आणणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी निशाणा साधला आहे. "१० वर्षांपासून भाजपचे बुथप्रमुख असणाऱ्या संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यापेक्षा चंद्रशेखर बावनकुळे यांना मुंडे आणि धस यांची सेटलमेंटसाठी भेट घडवून आणणं महत्त्वाचं वाटलं, याचा आम्हाला खेद वाटतो," अशा शब्दांत धनंजय देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, "बुथप्रमुख हा कोणत्याही पक्षाचा पाया असतो. संतोष अण्णा देशमुख हे १० वर्षांपासून भाजपचे बुथप्रमुख म्हणून काम करत होते. पण त्यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना भेटण्यापेक्षा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना राजकीय नेत्यांच्या भेटी घडवून आणणं महत्त्वाचं वाटलं. आमचे गावकरी गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा बोला, असं मला सांगत होते. पण मी आजपर्यंत बोललो नव्हतो," असं देशमुख म्हणाले.

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी आगामी काळात काय पावलं उचलायची, हे ठरवण्यासाठी आज मस्साजोगच्या गावकऱ्यांनी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

"... तर टोकाचं पाऊल उचलणार"

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटला, तर आम्ही कुटुंब टोकाचे पाऊल उचलू. याला शासन जबाबदार राहील, असा इशारा सरपंच संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिला आहे.

सरपंच हत्या प्रकरणाचे सर्व पुरावे पोलिस आणि तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहेत. असे असताना कोणीही दगाफटका करू नये. ही आपली प्रामाणिक इच्छा आहे. आष्टी येथील भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीने आपल्या मनात कसलीही चलबिचल झालेली नाही; परंतु या प्रकरणात एखादा आरोपी वाचविण्यासाठी कोणीही दगाफटका करू नये. सर्व आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, ही आपली प्रामाणिक इच्छा असल्याचेही देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण