शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
3
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
4
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
5
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
6
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
7
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
8
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
9
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
10
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
11
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
12
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
13
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
14
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
15
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
16
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
17
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
18
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
19
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
20
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन टन कांदा विकून हाती भोपळा, शेतकऱ्यालाच १८०० रुपयांची करावी लागली पदरमोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 12:15 IST

७० हजार रुपये खर्च करून पदरात १ रुपयाही नाही पडला; तिकिटालाही पैसे उरले नव्हते

बीड : बाजारात भाव पडल्याने कांद्याने उत्पादक शेतकरी आणि कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आणले आहे. साडेतीन टन कांदा विक्री करून पदरात काहीच पडले नाही, उलट अडत व्यापाऱ्याला १८०० रुपये देण्याची वेळ बीड तालुक्यातील जैताळवाडी येथील भागवत सोपान डांबे या शेतकरी कुटुंबावर आली. ७० हजार रुपये खर्च करून कांद्याचा एक रुपयाही पदरात न पडल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने आम्ही जगायचे कसे ? मुलाचे शिक्षण करायचे कसे, असा प्रश्न व्यवस्थेला केला आहे.

जैताळवाडी येथील भागवत डांबे यांनी दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली. महागाचे बियाणे, लागवडीचा खर्च, खुरपणी, फवारणी खते आणि कापणीचा खर्च असा ७० हजार रुपये खर्च केला. १२० गोण्यात भरून कांदा सोलापूरच्या बाजारात पाठवला. कांदा विक्री केल्यानंतर हाती पडलेली पट्टी पाहून आणि आणखी १८३२ रुपये जमा करण्याचे अडत्याने सांगितल्याने भागवत डांबे व मुलाला धक्काच बसला. गावाकडून पैसे मागवून घेतले. तिकिटासाठी शंभर रुपयेदेखील उरले नव्हते. रिकाम्या हाताने आलेल्या भागवतरावांच्या डोळ्यातील अश्रू पाहून कुटुंबही रात्रभर रडले. जगायचे कसे? असा प्रश्न या शेतकरी कुटुंबाने केला.

काहीच हाती लागले नाहीकांदा चांगला निघाल्याने किमान दीड लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा त्यांना होती. यातून मुलांचे शिक्षण, लग्न, घरप्रपंच चालवता येईल, असे वाटले होते; पण काहीच हाती लागले नाही.- भागवत डांबे, शेतकरी, जैताळवाडी

लेकरांनी कष्ट केले, आता चिंतालेकरांनी काबाडकष्ट करून कांदा पिकवला. त्याने दिवस रात्र मेहनत केली. काढण्यासाठी मजूर मिळत नव्हते. मीही मदत केली. खर्च खूप झाला; पण त्याच्या हातात काहीच पडले नाही. सोलापूरहून येताना भीक मागून दुसऱ्याकडून पैसे घेऊन माझे लेकरू आले आता इकडे तिकडे फिरत आहे. घर चालवायची चिंता त्याला सतावत असल्याचे भगवान डांबे यांच्या आई कमलबाई यांनी सांगितले.

साडेतीन टन कांदा विकून रुपया मिळत नसेल तर जगायचे कसे?कांद्याच्या उत्पन्नातून माझे शिक्षण होईल अशी अपेक्षा होती. मात्र, कांद्याचे बिल आणि पट्टी पाहिल्यानंतर आम्हाला धक्का बसला. उलट अठराशे रुपये अडत व्यापाराला देऊन रिकामे यावे लागले. साडेतीन टन कांदा त्यातून एक रुपया मिळाला नसेल तर आम्ही जगायचे कसे सांगा, असा प्रश्न शेतकरी पुत्र संदीप डांबे याने केला.

कांद्याला मिळाला ५० रुपये क्विंटल भाव१) भगवानराव डांबे १५५० किलो कांद्याचे ७७५ रुपये आले. बाजारातील हमाली, तोलाई आणि इतर खर्च २१५८ रुपये झाला.त्यांना मायनस पट्टी मिळाली. शेतकऱ्याला पदरचे १३८३ रुपये अडत्याला द्यावे लागले.

कांद्याला मिळाला १०० रुपये क्विंटल भाव२) डांबे यांनी २०११ किलो कांदा विकला असता शंभर रुपये क्विंटल भाव मिळाला. फक्त २१३५.२० रुपये पट्टी आली. अडत्याकडील हमाली, तोलाई आणि इतर खर्च २५८३.८९ आला. ४४८.६९ रुपये शेतकऱ्याला पदरचे भरावे लागले.

टॅग्स :FarmerशेतकरीonionकांदाBeedबीड