शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

साडेतीन टन कांदा विकून हाती भोपळा, शेतकऱ्यालाच १८०० रुपयांची करावी लागली पदरमोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 12:15 IST

७० हजार रुपये खर्च करून पदरात १ रुपयाही नाही पडला; तिकिटालाही पैसे उरले नव्हते

बीड : बाजारात भाव पडल्याने कांद्याने उत्पादक शेतकरी आणि कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आणले आहे. साडेतीन टन कांदा विक्री करून पदरात काहीच पडले नाही, उलट अडत व्यापाऱ्याला १८०० रुपये देण्याची वेळ बीड तालुक्यातील जैताळवाडी येथील भागवत सोपान डांबे या शेतकरी कुटुंबावर आली. ७० हजार रुपये खर्च करून कांद्याचा एक रुपयाही पदरात न पडल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने आम्ही जगायचे कसे ? मुलाचे शिक्षण करायचे कसे, असा प्रश्न व्यवस्थेला केला आहे.

जैताळवाडी येथील भागवत डांबे यांनी दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली. महागाचे बियाणे, लागवडीचा खर्च, खुरपणी, फवारणी खते आणि कापणीचा खर्च असा ७० हजार रुपये खर्च केला. १२० गोण्यात भरून कांदा सोलापूरच्या बाजारात पाठवला. कांदा विक्री केल्यानंतर हाती पडलेली पट्टी पाहून आणि आणखी १८३२ रुपये जमा करण्याचे अडत्याने सांगितल्याने भागवत डांबे व मुलाला धक्काच बसला. गावाकडून पैसे मागवून घेतले. तिकिटासाठी शंभर रुपयेदेखील उरले नव्हते. रिकाम्या हाताने आलेल्या भागवतरावांच्या डोळ्यातील अश्रू पाहून कुटुंबही रात्रभर रडले. जगायचे कसे? असा प्रश्न या शेतकरी कुटुंबाने केला.

काहीच हाती लागले नाहीकांदा चांगला निघाल्याने किमान दीड लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा त्यांना होती. यातून मुलांचे शिक्षण, लग्न, घरप्रपंच चालवता येईल, असे वाटले होते; पण काहीच हाती लागले नाही.- भागवत डांबे, शेतकरी, जैताळवाडी

लेकरांनी कष्ट केले, आता चिंतालेकरांनी काबाडकष्ट करून कांदा पिकवला. त्याने दिवस रात्र मेहनत केली. काढण्यासाठी मजूर मिळत नव्हते. मीही मदत केली. खर्च खूप झाला; पण त्याच्या हातात काहीच पडले नाही. सोलापूरहून येताना भीक मागून दुसऱ्याकडून पैसे घेऊन माझे लेकरू आले आता इकडे तिकडे फिरत आहे. घर चालवायची चिंता त्याला सतावत असल्याचे भगवान डांबे यांच्या आई कमलबाई यांनी सांगितले.

साडेतीन टन कांदा विकून रुपया मिळत नसेल तर जगायचे कसे?कांद्याच्या उत्पन्नातून माझे शिक्षण होईल अशी अपेक्षा होती. मात्र, कांद्याचे बिल आणि पट्टी पाहिल्यानंतर आम्हाला धक्का बसला. उलट अठराशे रुपये अडत व्यापाराला देऊन रिकामे यावे लागले. साडेतीन टन कांदा त्यातून एक रुपया मिळाला नसेल तर आम्ही जगायचे कसे सांगा, असा प्रश्न शेतकरी पुत्र संदीप डांबे याने केला.

कांद्याला मिळाला ५० रुपये क्विंटल भाव१) भगवानराव डांबे १५५० किलो कांद्याचे ७७५ रुपये आले. बाजारातील हमाली, तोलाई आणि इतर खर्च २१५८ रुपये झाला.त्यांना मायनस पट्टी मिळाली. शेतकऱ्याला पदरचे १३८३ रुपये अडत्याला द्यावे लागले.

कांद्याला मिळाला १०० रुपये क्विंटल भाव२) डांबे यांनी २०११ किलो कांदा विकला असता शंभर रुपये क्विंटल भाव मिळाला. फक्त २१३५.२० रुपये पट्टी आली. अडत्याकडील हमाली, तोलाई आणि इतर खर्च २५८३.८९ आला. ४४८.६९ रुपये शेतकऱ्याला पदरचे भरावे लागले.

टॅग्स :FarmerशेतकरीonionकांदाBeedबीड