शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

ऊसतोड मजूरांचा संप मागे, लढा मात्र कायम सुरु राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:36 AM

लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूक दार संघटनेच्या वतीने, ऊसतोड मजूर, मुकादमांच्या विविध मागण्या मान्य होईपर्यंत हातात कोयता न घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान ऊसतोड मजूरांचा संप मागे घेण्याचा निर्णय शनिवारी पत्रकार परिषदेत संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्देकेशव आंधळे : निर्णय घेण्यासाठी ३० आॅक्टोबरचा अल्टीमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूक दार संघटनेच्या वतीने, ऊसतोड मजूर, मुकादमांच्या विविध मागण्या मान्य होईपर्यंत हातात कोयता न घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान ऊसतोड मजूरांचा संप मागे घेण्याचा निर्णय शनिवारी पत्रकार परिषदेत संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार केशव आंधळे म्हणाले, संप जरी मागे घेतला असला, तरी मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरुच राहणार आहे.पत्रकारपरिषदेस गोरक्ष रसाळ, संघटनेचे अघ्यक्ष श्रीमंत जायभाये व इतर मुकादम उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आंधळे म्हणाले, दुष्काळी परिस्थिती आहे. मजूरांच्या हाताला काम देणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतात उभा असलेला ऊस कारखान्याला जाणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे हा संप मागे घेण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेतला आहे. महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड मजूरांचे प्रश्न सुटणार आहेत. आम्ही केलेल्या मागण्यापैकी अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत. ज्या मागण्या मान्य झाल्या नाहीत त्यासाठी संघटना कायम लढत राहील. ऊसतोड मजूरांच्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शासनाकडे वेळोवेळी पाठपुरवा केला आहे. एक वेळ लवादाचे अध्यक्ष, सर्व सदस्य व मुख्यमंत्र्याशी चर्चा केली आहे. लवकरच महामंडळाचा देखील प्रश्न निकाली लागेल अशी आशा आंधळे यांनी यावेळी व्यक्त केली.महामंडळाऐवजी काढला योजनेचा अध्यादेशऊसतोड मजूरांच्या मजूरीचा वाढ करण्याचा निर्णय शासनाने तात्काळ घ्यावा, यासाठी शासनाला ३० आॅक्टोबर ही शेवटची तारीख देत आहोत, मागण्या मान्य झाल्या नाही तर, साखर संघाच्या इमारतीसमोर धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी संघटनेतर्फे देण्यात आला. ऊसतोड मजूरांना ४०० रुपये मजूरी मिळावी, त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी, मजूरांना जिवन सुरक्षा योजना लागू करावी, यासह इतर सर्व लाभ ऊसतोड मजूरांना मिळावेत या मागण्यांसाठी संघटनेने संप पुकारला होता.सावरगाव येथील दसरा मेळाव्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घोषणा केली होती. लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना १९ तारखेचा दिवस मावळण्याच्या आत होईल व महामंडळासाठी १०० कोटी रुपये निधीची तरतूद केली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, महामंडळाची घोषणा झाली नाही व शुक्रवारी १९ आॅक्टोबर रोजी शासनाच्या वतीने ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार समाजिक सुरक्षा’ ही योजना राबवण्याचा अध्यादेश काढला.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखाने