शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

ऐन दिवाळीत काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : ऐन दिवाळीत तीन अपघातात पाच जण ठार झाले तर बीडमध्ये एकाच कुटूंबातील तिघांचा संशयास्पद ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ऐन दिवाळीत तीन अपघातात पाच जण ठार झाले तर बीडमध्ये एकाच कुटूंबातील तिघांचा संशयास्पद मृत्यू झाला. गुढी पाडवा व भाऊबिजेच्या दिवशी या घटना घडल्या.‘शिवशाही’च्या धडकेततरुणाचा मृत्यूगेवराई : दिवाळी सणासाठी दुचाकीवरून स्वत:च्या गावाकडे निघालेल्या तरुणाचा भरधाव शिवशाही बसच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री बीड - गेवराई रोडवर पाडळसिंगी येथे झाला. केशव बाबासाहेब नागरे (वय ३३, रा. वाघलखेडा ता. अंबड, जि. जालना) असे मयत तरुणाचे नाव आहे. बारामती येथे एका कंपनीत कामाला असणारे केशव नागरे हे गुरुवारी रात्री दुचाकीवरून (एमएच २१ एएम ८६५८) दिवाळी सणासाठी स्वत:च्या गावाकडे निघाले होते.रात्री १० वाजता बीड - गेवराई मार्गावर पाडळसिंगी जवळ सोमाणी जिनिंगसमोर आले असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या शिवशाही बसने (एमएच ०६ बीडब्ल्यू १३१८) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात केशव नागरे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी गेवराई पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, सततच्या अपघातांमुळे शिवशाही बससेवा वादाच्या भोव-यात सापडली आहे.साखरेच्या ट्रकखाली दबून चौघे ठारलोकमत न्यूज नेटवर्कगंगामसला : माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती कारखान्यातून साखरेची पोती घेऊन परभणीकडे जाणार ट्रक पलटी झाला. त्यामुळे साखरेच्या पोत्याखाली दबून दयानंद गणेश सोळंके (४०) संगीता दयानंद सोळंके (३६) राजनंदिनी दयानंद सोळंके (७) पृथ्वीराज दयानंद सोळंके (५) या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शहरापासून ३ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गावरील एच.पी. गोडावून जवळ घडली. या प्रकरणी चालक रुपेश फिरताराम यादवला ट्रकसह तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे.सोळंके कुटुंब माजलगाव शहरात राहत होते. पाडव्यानिमित्त ते गंगामसला येथील मोरेश्वराचे दर्शन घेऊन माजलगावला येत होते. शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर एच.पी. गॅस गुडवून जवळ आले असता समोरून साखरेचे पोते घेऊन येणा-या ट्रक चालकाने कट मारला. यामुळे ट्रक (सी.जि.०८ए.सी./३३४१) पलटी झाला. याच ट्रकखाली सोळंके कुटूंब सापडले आणि चौघांचा पोत्याखाली दबून जागीच मृत्यू झाला. तर इर्शाद उर्फ बाबु हे या अपघातात जखमी झाल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील संत नामदेव नगर भागात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दाम्पत्यासह त्यांच्या चिमुकल्या मुलीचा यामध्ये समावेश आहे. पतीने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले असले तरी पत्नी व मुलीच्या मृत्यूचे गुढ कायम असून पोलिसांनी शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवला आहे. तपासानंतर याचे गुढ उलगडणार असून याप्रकरणाची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.गणेश शिंदे (२६), शितल (२३) व श्रावणी (४) अशी मयतांची नावे आहेत. गणेश शिंदे हे आई-वडील, पत्नी व मुलीसह संत नामदेव नगर भागात वास्तव्यास आहेत. बीडमध्ये ते काम करायचे. पाडव्याच्या दिवशी सर्व कुटूंब जेवण करून आपापल्या खोलीत झोपले. सकाळी गणेश यांचे वडील सुर्यभान शिंदे हे उठले. बाजुलाच असलेल्या शेवग्याच्या झाडाजवळ त्यांना गणेश उभा असल्याचे दिसले. जवळ जावून पाहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरड केली. त्यांनी घरात धाव घेत सुन शितलला आवाज दिला. मात्र घरातून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. आत जावून पाहिले असता शितल व नात श्रावणी हे दोघेही पलंगावर मृतावस्थेत पडलेले दिसले. त्यांनी तात्काळ परिसरातील लोकांमार्फत पोलिसांना माहिती दिली. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोनि शिवलाल पुर्भे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. येथे शवविच्छेदन झाले. गणेशने आत्महत्या केल्याचे स्पष्ट असून शितल व श्रावणीचा व्हिसेरा राखीव ठेवला आहे. अहवाल आल्यानंतरच त्यांचा मृत्यू कशाने झाला, हे स्पष्ट होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू