शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

कोळपणी करताना ताणतारेचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यासह बैलजोडीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 14:00 IST

शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर; ताणतारेत विद्युत पुरवठा उतरून झाली दुर्घटना

- संतोष स्वामी

दिंद्रुड (बीड) : शेतीत कोळपत असताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने एक शेतकरी व दोन बैल ठार झाल्याची घटना आज, सोमवारी १ जुलै रोजी दुपारी बारा वाजेदरम्यान माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड शिवारात घडली. बालासाहेब बाबासाहेब डापकर (४०. रा.संगम ता. धारूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

संगम येथील शेतकरी बालासाहेब बाबासाहेब डापकर हे दिंद्रुड शिवारातील शेतात आज सकाळी कामासाठी गेले होते. सकाळी ११ वाजे दरम्यान कोळपणी करत असताना औताच्या लोखंडी कोळप्याचा शेतातील खांबाच्या ताणतारेला स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसून शेतकरी बालासाहेब डापकर आणि दोन्ही बैलांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला. तर शेतकरी डापकर यांच्यासोबत असलेले दोन सालगडी विजेच्या धक्क्याने दूर फेकले गेले.

ताण तारेला असलेली चिमणी फुटलेली दिसत आहे. त्यामुळे वीज ताणतारे उतरून ही दुर्घटना घडून शेतकऱ्याचा मृत्यू महावितरणच्या निष्काळजीपणाने झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान, धारूर तालुक्यात पंधरवड्यातील ही दुसरी घटना आहे. १५ जून रोजी शिंगणवाडी येथील तरुण शेतकरी देखील तान तारेला स्पर्श झाल्याने दगावल्याची घटना घडली होती.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रBeedबीड