शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

धनंजय मुंडेंकडून शेतकऱ्यांच्या ८३ कोटींची लूट; किरीट सोमय्यांची जगमित्र कारखान्यातील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 16:04 IST

Kirit Somaiya Vs Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी पुस येथे जगमित्र साखर कारखान्याची उभारणी करण्यासाठी शेतकर्‍यांकडून १० वर्षापूर्वी  ८३ कोटी रूपये  भागभांडवल म्हणून जमा केले. आज दहा वर्षे लोटली  तरीही साखर कारखान्याची उभारणी झाली नाही.

अंबाजोगाई-: बीड जिल्ह्याचे पालकमंत्री  धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी साखर कारखान्याच्या नावावर शेतकर्‍यांची ८३ कोटी रूपयांची लुट केली. या लुटीसाठी शेतकर्‍यांच्या जमिनी घेतल्या. तर ज्यांनी जमिनी दिल्या नाहीत अशा मयत व्यक्तींच्या नावानेही खोटी स्वाक्षरी केली. या सर्व बाबींचा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या सर्व घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आपण ईडीकडे केली आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांनी अंबाजोगाई येथे  आयोजित पत्रकार परिषदेत केला.

डॉ.किरीट सोमय्या गुरूवारी सकाळी अंबाजोगाईत दाखल झाले. त्यांनी नगर परिषदेच्या विलासराव देशमुख सभागृहात कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यास उपस्थिती दर्शविली. त्यानंतर ते पुस येथील जगमित्र साखर कारखान्याच्या परिसराला भेट दिली. या नंतर त्यांनी बर्दापुर पोलिस स्टेशनमध्ये जावून या प्रकरणाचा तपास प्रामाणिकपणे झाला पाहिले अशी मागणी केली. त्यानंतर ते अंबाजोगाईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

सोमय्या म्हणाले की, राज्यातील मंत्री धनंजय मुंडे यांनी पुस येथे जगमित्र साखर कारखान्याची उभारणी करण्यासाठी शेतकर्‍यांकडून १० वर्षापूर्वी  ८३ कोटी रूपये  भागभांडवल म्हणून जमा केले. आज दहा वर्षे लोटली  तरीही साखर कारखान्याची उभारणी झाली नाही. हा सर्व पैसा, जमीन कुठे गेली? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. मुंडे यांनी या जमिनी घेताना मृत व्यक्तीच्या नावाने स्वाक्षरी केल्याची तक्रार दाखल आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने चार दिवसापुर्वीच दिले आहेत. तर आपण ही या घोटाळ्या बाबत ईडीकडे पत्र पाठवून चौकशीची मागणी केली आहे. ठाकरे व पवार यांचे पोलिस खाते आता कशा पद्धतीने या प्रकरणाची चौकशी करते? ही मी पाहणार आहे. मुंडे ज्या मतदार संघातील आहेत.त्याच हद्दीत पोलीस ठाणे असल्याने होणाऱ्या पोलीस तपासा बाबत आपण राज्याचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या सरकारच्या काळात दिवसेंदिवस भ्रष्टाचार व घोटाळे यांची मालिका सुरूच आहे. आलीबाबा व चाळीस चोर अशा या सरकारमधील काही मंत्री जेलमध्ये, काही मंत्री हॉस्पीटलमध्ये तर काहीजण बेलवर आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ते स्वतःच घोटाळे व भ्रष्टाचार करत असल्याने त्यांचे मंत्रीमंडळही याच कामात व्यस्त आहेत. महाराष्ट्रात घोटाळे बाजांजी मालिका सुरूच आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार, हसन मुश्रीफ, खा.भावना गवळी, अर्जुन खोतकर, धनंजय मुंडे, प्रताप सरनाईक,अनिल परब, संजय राऊत, नवाब मलिक या सर्व लोकांचे घोटाळे आपण बाहेर काढले. यांचा भ्रष्टाचार जनतेसमोर आणला. राज्यातील साडेबारा कोटी जनता, शेतकरी, विविध समस्यांनी त्रस्त असताना आघाडी सरकारमधील मंत्र्यांची जनतेकडून लुट सुरूच आहे. हे राज्य भ्रष्टाचार युक्त असून ते भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी माझी लढाई सुरूच राहील असे सोमय्या यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस आ.नमिता मुंदडा,अक्षय मुंदडा,भाजपा चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,प्रवक्ते राम कुलकणी,भाजपा चे तालुका अध्यक्ष अच्युत गंगणे उपस्थित होते.

‘ईनको मिर्ची लगी तो मै क्या करू?’धनंजय मुंडे यांच्या साखर कारखान्यातील घोटाळा उघड करण्यासाठी मी अंबाजोगाईला निघालो असताना मला सोशल मिडीया व विविध माध्यमातून धमक्या येवू लागल्या. अंबाजोगाईत आल्यानंतर तुमचं स्वागत मिर्ची पावडरने केले जाईल अशा धमक्या दिल्या. अशा धमक्यांना आपण भिक घालत नसुन ईनको मिर्ची लगी तो मै क्या करू?  अशा शब्दात त्यांनी धमक्या देणारांची खिल्ली उडविली.

संजय राउत यांची अवस्था ‘चोर मचाये शोर’संजय राउत ईडीची नोटीस आल्यानंतर मोठमोठ्याने आरडा ओरडा करत होते. नोटीस फाडुन टाकल्याचे नाटक त्यांनी मिडीया समोर केले. मात्र रात्रीच ईडीच्या कार्यालयात जावून 55 लाखांचा चेक देवून आले. चोरीचा माल परत केल्याने चोरी माफ होत नसते. अशी टिका राउत यांच्यावर करीत संजय राउत म्हणजे ‘चोर मचाये शोर‘ अशीच त्यांची स्थिती असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेKirit Somaiyaकिरीट सोमय्याSugar factoryसाखर कारखानेBeedबीड