शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

एकत्रिकरणामधील पतीच्या नावावरील ७ एकर क्षेत्र गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:34 IST

आष्टी : एकत्रिकरणामधील पतीच्या नावावरील ७ एकर क्षेत्र गायब असून, एकत्रिकरणामध्ये गेलेली जमीन वारसांच्या नावे घेण्यात यावी, अशी ...

आष्टी : एकत्रिकरणामधील पतीच्या नावावरील ७ एकर क्षेत्र गायब असून, एकत्रिकरणामध्ये गेलेली जमीन वारसांच्या नावे घेण्यात यावी, अशी मागणी सुजानाबाई उत्तम जरे व उषा चंद्रकांत नांगरे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सुजानाबाई जरे या उत्तम विठोबा जरे यांची पत्नी, तर उषा नांगरे ही मुलगी आहे. त्यांना मौजे मातकुळी येथे जुना सर्व्हे नं. १३२ / अ व नवीन सर्व्हे नं. ८२९मध्ये एकूण ८ एकर १२ गुंठे शेतजमीन आहे. ही शेतजमीन ते अद्यापपर्यंत वहिवाट करीत असून, त्यातील पिकांचा उपभोग घेत आहेत. या जमिनीचे मूळ मालक अर्जदार जरे यांचे सावत्र चुलत सासरे रंगनाथ जरे हे अर्जदार नांगरे यांचे आजोबा होते. त्यांना कोणीही अपत्य नसल्यामुळे ते मयत झाल्यानंतर वरील सर्व जमीन आमच्या ताब्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. १९९०मध्ये जमीन एकत्रिकरणामध्ये ताब्यातील ८ एकर १२ गुंठे जमिनीपैकी अर्जदाराचा मुलगा देविदास उत्तम जरे यांच्या नावे २३ आर. जमीन व माझी सून संगीता देविदास जरे हिच्या नावे २० आर. जमीन आलेली आहे. तसेच उर्वरित जमीन ही भावकीतील दिलीप महादेव जरे, नवनाथ महादेव जरे, सतीश सदाशिव जरे, गणेश सदाशिव जरे, धनंजय सदाशिव जरे यांच्या नावे ४ एकर जमीन आणि अनिल विठोबा जरे, भीमराव विठोबा जरे व शामराव विठोबा जरे यांचा मुलगा रंगनाथ उर्फ प्रकाश शामराव जरे यांच्या नावे ३ एकर जमीन एकत्रिकरणामध्ये गेली आहे. परंतु या जमिनीवर अद्यापपर्यंत आपला ताबा असून, वहिती करून खात असल्याचे सुजानाबाई जरे व उषा नांगरे यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच फेर नं. १८४२ अन्वये सर्व्हे नं. ८२९मध्ये चुकीने विहिरीची नोंद झाली होती ती विहीर ८३१मध्ये होती. हा फेरफार रद्द करण्याबाबत उपविभागीय अधिकारी, पाटोदा यांच्याकडे अपील दाखल केलेले असून, अपिलाची कारवाई सुरू आहे. एकत्रिकरणामध्ये गेलेली जमीन आपल्या नावे करावी म्हणून जरे व नांगरे यांनी वेळोवेळी आष्टी तहसील कार्यालय, मंडल अधिकारी व जिल्हाधिऱ्यांकडे अर्ज केलेले आहेत. परंतु त्यावर कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे एकत्रिकरणामध्ये गेलेली आमची जमीन वारसांच्या नावे घेण्याची मागणी निवेदनात केली आहे. मात्र, सरकारी काम आणि सहा महिने थांब, असा अनुभव अर्जदारांना येत आहे.