शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

एकत्रिकरणामधील पतीच्या नावावरील ७ एकर क्षेत्र गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:34 IST

आष्टी : एकत्रिकरणामधील पतीच्या नावावरील ७ एकर क्षेत्र गायब असून, एकत्रिकरणामध्ये गेलेली जमीन वारसांच्या नावे घेण्यात यावी, अशी ...

आष्टी : एकत्रिकरणामधील पतीच्या नावावरील ७ एकर क्षेत्र गायब असून, एकत्रिकरणामध्ये गेलेली जमीन वारसांच्या नावे घेण्यात यावी, अशी मागणी सुजानाबाई उत्तम जरे व उषा चंद्रकांत नांगरे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सुजानाबाई जरे या उत्तम विठोबा जरे यांची पत्नी, तर उषा नांगरे ही मुलगी आहे. त्यांना मौजे मातकुळी येथे जुना सर्व्हे नं. १३२ / अ व नवीन सर्व्हे नं. ८२९मध्ये एकूण ८ एकर १२ गुंठे शेतजमीन आहे. ही शेतजमीन ते अद्यापपर्यंत वहिवाट करीत असून, त्यातील पिकांचा उपभोग घेत आहेत. या जमिनीचे मूळ मालक अर्जदार जरे यांचे सावत्र चुलत सासरे रंगनाथ जरे हे अर्जदार नांगरे यांचे आजोबा होते. त्यांना कोणीही अपत्य नसल्यामुळे ते मयत झाल्यानंतर वरील सर्व जमीन आमच्या ताब्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. १९९०मध्ये जमीन एकत्रिकरणामध्ये ताब्यातील ८ एकर १२ गुंठे जमिनीपैकी अर्जदाराचा मुलगा देविदास उत्तम जरे यांच्या नावे २३ आर. जमीन व माझी सून संगीता देविदास जरे हिच्या नावे २० आर. जमीन आलेली आहे. तसेच उर्वरित जमीन ही भावकीतील दिलीप महादेव जरे, नवनाथ महादेव जरे, सतीश सदाशिव जरे, गणेश सदाशिव जरे, धनंजय सदाशिव जरे यांच्या नावे ४ एकर जमीन आणि अनिल विठोबा जरे, भीमराव विठोबा जरे व शामराव विठोबा जरे यांचा मुलगा रंगनाथ उर्फ प्रकाश शामराव जरे यांच्या नावे ३ एकर जमीन एकत्रिकरणामध्ये गेली आहे. परंतु या जमिनीवर अद्यापपर्यंत आपला ताबा असून, वहिती करून खात असल्याचे सुजानाबाई जरे व उषा नांगरे यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच फेर नं. १८४२ अन्वये सर्व्हे नं. ८२९मध्ये चुकीने विहिरीची नोंद झाली होती ती विहीर ८३१मध्ये होती. हा फेरफार रद्द करण्याबाबत उपविभागीय अधिकारी, पाटोदा यांच्याकडे अपील दाखल केलेले असून, अपिलाची कारवाई सुरू आहे. एकत्रिकरणामध्ये गेलेली जमीन आपल्या नावे करावी म्हणून जरे व नांगरे यांनी वेळोवेळी आष्टी तहसील कार्यालय, मंडल अधिकारी व जिल्हाधिऱ्यांकडे अर्ज केलेले आहेत. परंतु त्यावर कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे एकत्रिकरणामध्ये गेलेली आमची जमीन वारसांच्या नावे घेण्याची मागणी निवेदनात केली आहे. मात्र, सरकारी काम आणि सहा महिने थांब, असा अनुभव अर्जदारांना येत आहे.