शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

बीड जिल्ह्यात तीन महिन्यात ५२ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:26 AM

बीड : जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यात शासन व प्रशासन दोन्ही अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी ...

ठळक मुद्देमदत तोकडी : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब मदतीपासून वंचित, ‘उभारी’ ची बैठक नाही

बीड : जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यात शासन व प्रशासन दोन्ही अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी एप्रिल महिना अखेरपर्यंत ५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामधील बहुतांश शेतकऱ्यांनी दुष्काळी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे कारण पुढे आले आहे.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थती व प्रशासनाची उदासिनता यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजना कमी पडत आहेत. मागील दोन वर्ष सलग कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच कापसावर बोंडअळीचा प्रदुर्भाव झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचीत सापडले आहेत. तसेच कर्ज माफ केल्याची घोषणा शासनाने केली. मात्र, अद्यापपर्यंत अनेक शेतकरी पात्र असूनही त्यांच्या नावे शेतीसाठी कर्ज दिसत आहे. तसेच नवीन कर्ज देण्यास बँकांकडून अडवणूक केली जात आहे. त्यामुळे आर्थिक अडचण व सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीची झालेली अवस्था तसेच हाताला काम नसल्यामुळे शेतकºयांमध्ये नैराश्य असल्याचे दिसून येत आहे. ते दूर करण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणारे प्रयत्न तोकडे पडत आहेत.आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या कुटुंबाला विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाच्या वतीने ‘उभारी’ योजना सुरु केलेली आहे. यामधून आत्मत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला विहीर, घरकुल, शेतीसाठीच्या विविध योजना देण्यात येतात. मात्र, दोन महिन्यांपासून उभारीची बैठक झाली नसल्याची देखील सूत्रांची माहिती आहे.मागील वर्षी १९१ शेतकरी आत्महत्यामगील वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत १९१ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यापैकी १५० शेतकरी मदतीसाठी पात्र झाले होते तसेच त्यांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे.तसेच उभारी अतंर्गत विविध योजना देखील दिल्याचे दिसून येत आहे. मात्र, अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील अधिकाºयांकडून कागदपत्रे देण्यासाठी योग्य सहकार्य केले जात नाही.सदरील कारणास्तव अनेक जण योजनांच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांकडून सांगण्यात आले.अनुदानाचे तात्काळ वाटप करण्याची मागणीदुष्काळी अनुदानाची रक्कम व शासनाकडून पाठवण्यात आलेले विविध अनुदानाची रक्कम जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने वाटप केली जात नाही.ही गंभीर बाब असून प्रशासनाकडून डीडीसी बँकेवर कारवाई करुन तात्काळ अनुदानाचे वाटप करावे अशी मागणी शेतकºयांमधून करण्यात येत आहे.

टॅग्स :Beedबीडfarmer suicideशेतकरी आत्महत्या