शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये आता रस्त्यावर कचरा टाकल्यास ५०० रूपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 23:23 IST

शहर स्वच्छतेसाठी बीड नगर पालिकेने कडक पाऊले उचलली आहेत. रस्त्यावर कचरा टाकल्यास ५०० रूपये दंड आकारला जात आहे.

शहर स्वच्छतेसाठी बीड पालिकेने उचलली कडक पाऊलेलोकमत न्यूज नेटवर्कबीड : घर, परीसर स्वच्छ करून तिथे निघालेला कचरा उघड्यावर किंवा रस्त्यावर टाकत असाल तर थांबा.. कारण आता रस्त्यावर कचरा टाकणे महागात पडत आहे. शहर स्वच्छतेसाठी बीड नगर पालिकेने कडक पाऊले उचलली आहेत. रस्त्यावर कचरा टाकल्यास ५०० रूपये दंड आकारला जात आहे. या कारवाईस सुरूवातही झाली आहे. यामुळे रस्त्यावर घाण करताना नागरिकांनी विचार करण्याची गरज आहे.

बीड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी बीड पालिका सरसावली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयांची उद्दिष्ट पूर्ण करुन पालिका आघाडीवर राहिली. त्याचबरोबर स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करुन यश मिळविले. त्यामुळे बीड शहर स्वच्छ झाल्याचा दावा पालिकेने केला. असे असले तरी काही नागरिकांकडून मात्र आजही स्वच्छतेबद्दल काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर किंवा नाल्यांमध्ये कचरा टाकणे असे प्रकार वारंवार निदर्शनास येत आहेत. त्यामुळे बीड शहरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी शहर स्वच्छतेसाठी जागरुक होऊन घंटागाडी, कचराकुंडी यातच कचरा टाकावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी केले आहे.

दरम्यान, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर शासनाने कारवाई करण्याचे निर्देश यापूर्वीच दिलेले आहेत, परंतु बीड शहरात आतापर्यंत एकही कारवाई झालेली नव्हती. परंतु बुधवारी एक कारवाई करुन पालिकेने खाते उघडले. मुख्याधिकारी डॉ. जावळीकर हे बुधवारी सकाळी शहराची पाहणी करत असताना त्यांना शहरातील जवाहर कॉलनीत दोन पुरुष रस्त्यावर कचरा टाकत असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ कर्मचाºयांमार्फत त्यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावला. दरम्यान, या कारवाईमुळे घाण करणाºयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

ओला व सुका कचरा वेगळा कराओला व सुका कचरा वेगळा करण्यासंदर्भात पालिकेकडून वारंवार आवाहन केले जात आहे. परंतु याकडे काही नागरिक आजही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी वेगवेगळा कचरा करावा, असे आवाहन डॉ. जावळीकर यांनी केले आहे. दरम्यान, ओल्या कचºयापासून पालिकेकडून सेंद्रीय खत निर्मिती केली जात आहे. आतापर्यंत ८ टन खत निर्मिती झाल्याचे स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले.

कचरा घंटागाडी किंवा कुंडीतच टाकावाघरातून किंवा परिसरातून निघालेला कचरा घेण्यासाठी पालिकेची घंटागाडी गल्लोगल्ली सकाळी व संध्याकाळी येते. तसेच बाजारपेठ व इतर कॉम्प्लेक्सच्या ठिकाणी कुंडी ठेवली जाते. नागरिकांनी यामध्येच कचरा टाकावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये ओला व सुका कचरा वेगळा करावा, असेही सांगण्यात आले.

रात्रीही घालावी लागणार गस्तस्वच्छता विभागाचे कर्मचारी पहाटेपासूनच कामाला सुरुवात करतात. तसेच दिवसभरात पाहणी करताना नागरिक कचरा टाकत असल्याचे दिसतील, परंतु रात्रीच्या वेळी रस्त्यावर कचरा टाकणाºयांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पालिकेने पथके नियुक्त करुन पोलिसांप्रमाणेच कचरा टाकणा-यांवरही वॉच ठेवण्यासाठी गस्त घालण्याची गरज आहे.

वेळोवेळी नाल्यांची सफाई करण्याची मागणीकचºयासंदर्भात पालिकेने कडक पावले उचलली असली तरी शहरातील अनेक भागातील नाल्या वेळच्या वेळी काढल्या जात नाहीत, त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतो. पालिकेने नाल्यांची सफाई करावी शिवाय कचराकुंड्या भरल्यानंतर त्या वेळेत उचलाव्यात, अशी मागणीही नागरिकांतून केली जात आहे. पालिकेकडून सहकार्य मिळाल्यास नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

‘सीओं’चे आवाहनरस्त्यावर कचरा टाकणाºयांना नियमाप्रमाणे ५०० रु. दंड आकारला जात आहे. यापूर्वी अनेकवेळा जनजागृती केलेली आहे. यापुढे जनजागृतीबरोबरच कारवाई सुरुच राहील. नागरिकांनीही घंटागाडी, कुंडीतच कचरा टाकावा. ओला व सुका कचरा वेगळा करावा, बीड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पालिकेला सहकार्य करण्याबरोबरच जागरुक रहावे. तक्रारी असल्यास थेट संपर्क करावा.- डॉ. धनंजय जावळीकर, मुख्याधिकारी न.प.बीड.

टॅग्स :BeedबीडGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMarathwadaमराठवाडा