शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

वाण धरणात ५ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:35 IST

परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पात सध्या ५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. शहरात पाण्याची नासाडी होऊ नये याची दक्षता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपरळीकरांना पाच दिवसांनी मिळते पाणी : दोन महिने पुरेल एवढाच साठा; २९ कोटींची वाढीव योजना

संजय खाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पात सध्या ५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. शहरात पाण्याची नासाडी होऊ नये याची दक्षता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.सध्या परळी शहरात पाच दिवसाला नळ योजनेचे पाणी नागरिकांना नगरपरिषदेच्या वतीने पुरविण्यात येत आहे. अनेक प्रभागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, त्याठिकाणी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे टँकरने पाण्याची सोय करण्यात येत आहे. शहरातील कृष्णानगर, बसवेश्वर कॉलनी, आझादनगर, प्रियानगर, बँक कॉलनी या भागात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणचे बोअर ही आटले असल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची ही वेळ आली आहे. शहरापासून जवळ असलेल्या नागापूरच्या वाण धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणामध्ये ५ टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा दोन महिने पुरेल एवढा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.सध्या पिण्याच्या पाण्याची गंभीर स्थिती निर्माण होऊ लागल्याने नगरपरिषद आठ दिवसाला एकदा पाणीपुरवठा करण्याच्या विचारात असल्याचे समजते. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.यासंदर्भात नगराध्यक्ष सरोजनी सोमनाथआप्पा हालगे यांनी सांगितले की, नागापूरच्या वाण धरणीची पाणी पातळी खूप कमी झाली आहे. पाणी खोल गेल्याने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे, गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी उकळून पाणी प्यावे असे आवाहनही केले आहे.शहरात २९ कोटीच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम मंद गतीने चालू आहे. योजनेचे पाणी अद्यापही अनेक प्रभागात पोहोचले नाही असा आरोप भाजपचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र ओझा यांनी केला आहे. लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित करुन सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणीही केली आहे. तुळजाईनगर व संत नरहरी मंदिर परिसरात या योजनेचे पाणी येत नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. नवीन नळ योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल व या योजनेचे पाणी नागरिकांना मिळेल तसेच अनेक प्रभागात नवीन नळ योजनेतून पाणी पुरविले जात असल्याचा दावा नगराध्यक्ष हालगे यांनी केला आहे.जिल्हा परिषद सदस्यांचे दुर्लक्ष४शहरालगत असलेल्या बसेश्वर कॉलनीतील पाण्याचे बोअर आटले आहेत त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागातील लोकांना पाण्यासाठी शहरात यावे लागत आहे.४जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे व पंचायत समितीचे दुर्लक्ष झाल्याने या भागातील नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडत आहे त्यामुळे नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे.परळीत वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम २०११ मध्ये सुरू झालेले आहे. प्रत्यक्षात हे काम मे २०१४ मध्ये पूर्ण करायचे होते. मुदत संपून पाच वर्षे झाली तरी योजना अपूर्णच आहे. रोड फोडणे आणि पाईप टाकणे असे काम सध्या पाणीपुरवठा विभाग करीत आहे. सभापती हे घरी बसून या विभागाचा कारभार करतात. नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाजपचे शहर अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केला आहे अनेक प्रभागात या योजनेचे पाणी अद्यापही आलेले नाही. विशेष म्हणजे पाणीपुरवठा विभागाच्या खात्यात शासनाने रक्कम टाकली आहे. खात्यात पैसे असूनही या योजनेचे काम नगर परिषद करत नाही याकडेही लोहिया यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईDamधरण